शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

शेतकरी विकासाचा केंद्रबिंदू व्हावा

By admin | Updated: December 30, 2016 02:38 IST

आपण शेतकऱ्यांविषयी खूप बोलतो, चर्चा करतो. मात्र खरंच आपल्याला शेतकरी कळला का? त्याच्यासोबत आपण कधीतरी संवाद साधतो का?

चर्चासत्र : शोभाताई फडणवीस यांचे प्रतिपादन नागपूर : आपण शेतकऱ्यांविषयी खूप बोलतो, चर्चा करतो. मात्र खरंच आपल्याला शेतकरी कळला का? त्याच्यासोबत आपण कधीतरी संवाद साधतो का? त्याला सन्मान देतो का? याचा विचार करण्याची गरज आहे. दरवर्षी बजेटमध्ये कृषीसाठी मोठ्या प्रमाणात तरतूद केली जाते, परंतु ती कधीच खर्च होत नाही. शासनाच्या विविध योजना आहेत, मात्र त्याही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे जोपर्यंत शेतकऱ्याला विकासाचा केंद्रबिंदू मानल्या जात नाही, तोपर्यंत शेतकरी हा सुखी होणार नाही, असे प्रतिपादन राज्याच्या माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी केले. भारताचे पहिले कृषिमंत्री तथा शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या ११८ व्या जयंती सप्ताहनिमित्त कृषी महाविद्यालय, नागपूर, अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रो इंजि. मित्र परिवारातर्फे ‘आगामी अंदाजपत्रकात कृषी, ग्रामीण व्यवस्था व कृषीवर आधारित उद्योगाकरिता तरतूद’ या विषयावर गुरुवारी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू शरद निंबाळकर, आयडीबीआय बँकेचे माजी संचालक अर्जुन घुगल, नारायण होले पाटील, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता एन. डी. पार्लावार व संजय वाघमारे उपस्थित होते. फडणवीस पुढे म्हणाल्या, निसर्गाने विदर्भाला खूप काही दिले आहे. येथे वर्धा, वैनगंगा व पैनगंगा सारख्या मोठमोठ्या नद्या आहेत. मात्र असे असताना येथील केवळ १३ टक्केच क्षेत्र ओलिताखाली आहे. शिवाय उर्वरित ८७ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. विदर्भातील नद्यांची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी आहे. त्यामुळे येथे धरणे आणि तलाव बांधणे आवश्यक होते. परंतु दुर्दैवाने त्याकडे दुर्लक्ष झाले. मात्र ‘जलयुक्त शिवार’ च्या माध्यमातून आता तो प्रयोग सुरू झाला आहे. त्याचा परिणामही दिसू लागला आहे. पाण्याचे नियोजन होणे आवश्यक आहे. याशिवाय शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आणि माफक दरात खते उपलब्ध झाले पाहिजे. असेही त्या म्हणाल्या. आज स्पर्धेच्या युगात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळालाच पाहिजे, अशीही त्यांनी यावेळी मागणी केली. कार्यक्रमाला शरद चांडक, प्रणय पराते, दिलीप मोहितकर व अजय तायवाडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मिलिंद राऊत यांनी केले. प्रणय पराते यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) डॉ. पंजाबराव देशमुख स्मारकाला ‘दमनी’ भेट अ‍ॅग्रोव्हेट संस्थेतर्फे महाराजबाग चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मारकाला एक ‘दमनी’ भेट देण्यात आली आहे. या ‘दमनी’चे गुरुवारी माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू शरद निंबाळकर, एन. डी. पार्लावार, प्रणय पराते, दिलीप मोहितकर, अजय तायवाडे, नारायण होले पाटील व व्ही. एस. टेकाडे उपस्थित होते. ती ‘दमनी’ मध्य प्रदेशातील बालाघाट येथून आणण्यात आली असून, ती ८० वर्षे जुनी आहे. त्या आकर्षण ‘दमनी’ला डॉ. पंजाबराव देशमुख स्मारकाशेजारी ठेवण्यात आले आहे.