शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी विकासाचा केंद्रबिंदू व्हावा

By admin | Updated: December 30, 2016 02:38 IST

आपण शेतकऱ्यांविषयी खूप बोलतो, चर्चा करतो. मात्र खरंच आपल्याला शेतकरी कळला का? त्याच्यासोबत आपण कधीतरी संवाद साधतो का?

चर्चासत्र : शोभाताई फडणवीस यांचे प्रतिपादन नागपूर : आपण शेतकऱ्यांविषयी खूप बोलतो, चर्चा करतो. मात्र खरंच आपल्याला शेतकरी कळला का? त्याच्यासोबत आपण कधीतरी संवाद साधतो का? त्याला सन्मान देतो का? याचा विचार करण्याची गरज आहे. दरवर्षी बजेटमध्ये कृषीसाठी मोठ्या प्रमाणात तरतूद केली जाते, परंतु ती कधीच खर्च होत नाही. शासनाच्या विविध योजना आहेत, मात्र त्याही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे जोपर्यंत शेतकऱ्याला विकासाचा केंद्रबिंदू मानल्या जात नाही, तोपर्यंत शेतकरी हा सुखी होणार नाही, असे प्रतिपादन राज्याच्या माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी केले. भारताचे पहिले कृषिमंत्री तथा शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या ११८ व्या जयंती सप्ताहनिमित्त कृषी महाविद्यालय, नागपूर, अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रो इंजि. मित्र परिवारातर्फे ‘आगामी अंदाजपत्रकात कृषी, ग्रामीण व्यवस्था व कृषीवर आधारित उद्योगाकरिता तरतूद’ या विषयावर गुरुवारी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू शरद निंबाळकर, आयडीबीआय बँकेचे माजी संचालक अर्जुन घुगल, नारायण होले पाटील, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता एन. डी. पार्लावार व संजय वाघमारे उपस्थित होते. फडणवीस पुढे म्हणाल्या, निसर्गाने विदर्भाला खूप काही दिले आहे. येथे वर्धा, वैनगंगा व पैनगंगा सारख्या मोठमोठ्या नद्या आहेत. मात्र असे असताना येथील केवळ १३ टक्केच क्षेत्र ओलिताखाली आहे. शिवाय उर्वरित ८७ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. विदर्भातील नद्यांची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी आहे. त्यामुळे येथे धरणे आणि तलाव बांधणे आवश्यक होते. परंतु दुर्दैवाने त्याकडे दुर्लक्ष झाले. मात्र ‘जलयुक्त शिवार’ च्या माध्यमातून आता तो प्रयोग सुरू झाला आहे. त्याचा परिणामही दिसू लागला आहे. पाण्याचे नियोजन होणे आवश्यक आहे. याशिवाय शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आणि माफक दरात खते उपलब्ध झाले पाहिजे. असेही त्या म्हणाल्या. आज स्पर्धेच्या युगात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळालाच पाहिजे, अशीही त्यांनी यावेळी मागणी केली. कार्यक्रमाला शरद चांडक, प्रणय पराते, दिलीप मोहितकर व अजय तायवाडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मिलिंद राऊत यांनी केले. प्रणय पराते यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) डॉ. पंजाबराव देशमुख स्मारकाला ‘दमनी’ भेट अ‍ॅग्रोव्हेट संस्थेतर्फे महाराजबाग चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मारकाला एक ‘दमनी’ भेट देण्यात आली आहे. या ‘दमनी’चे गुरुवारी माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू शरद निंबाळकर, एन. डी. पार्लावार, प्रणय पराते, दिलीप मोहितकर, अजय तायवाडे, नारायण होले पाटील व व्ही. एस. टेकाडे उपस्थित होते. ती ‘दमनी’ मध्य प्रदेशातील बालाघाट येथून आणण्यात आली असून, ती ८० वर्षे जुनी आहे. त्या आकर्षण ‘दमनी’ला डॉ. पंजाबराव देशमुख स्मारकाशेजारी ठेवण्यात आले आहे.