शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

ज्येष्ठांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग समाजकार्यासाठी होऊ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:10 IST

नागपूर : ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असते. जुन्या पिढीने अनुभवातून आयुष्य आणि समाज घडविला आहे. त्यांच्या ...

नागपूर : ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असते. जुन्या पिढीने अनुभवातून आयुष्य आणि समाज घडविला आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग समाजकायार्साठी आणि कुटुंबातही होऊ द्या, असे आवाहन वरिष्ठ नागरिक परिसंघाच्यावतीने आयोजित जागतिक वरिष्ठ नागरिक दिन समारंभात रविवारी करण्यात आले.

वरिष्ठ नागरिक परिसंघ विदर्भ प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला महामंत्री वसंत पिंपळापुरे, भामसंघाचे राष्ट्रीय सचिव रवींद्र हिंमते, विदर्भ महामंत्री सुधीर डबीर, कोषाध्यक्ष चंद्रकांत देशपांडे उपस्थित होते.

भामसंचे महामंत्री विनयकुमार सिन्हा यांनी ज्येष्ठ नागरिकांना मान सन्मानाने जीवन जगू द्या, अशी अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, मुलांनी वृद्ध आईवडिलांना आयुष्यात योग्य स्थान व सन्मान दिला पाहिजे. त्यांच्या सन्मानाने जीवन जगण्याच्या अधिकाराचे हनन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. वसंत पिंपळापुरे म्हणाले, भारतात २०११ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार वरिष्ठ नागरिकांची संख्या १०.४० कोटी होती. त्यात महिला ५.३ कोटी तर पुरूष ५.१ कोटी होते. वर्ष २०२६ पर्यंत ही संख्या २० कोटी झालेली असेल. हा एक मोठा अनुभवी वर्ग आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग समाजकार्यासाठी होऊ शकतो.

भामसंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जगदीश्वर राव यांनी जेष्ठ नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याचे दायित्व केंद्र आणि राज्य सरकारने प्रामाणिकपणे पार पाडावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. रवींद्र हिमते यांनी समारोपिय मार्गदर्शन केले. संचालन सुधीर डबीर यांनी तर आभार चंद्रकांत देशपांडे यांनी मानले.