शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

विदर्भात तुरीचे उत्पादन कमी, कृत्रिम भाववाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 10:56 IST

गेल्यावर्षी तुरीला भाव न मिळाल्यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी तुरीऐवजी कापूस आणि सोयाबीनच्या लागवडीवर भर दिला. शेतकऱ्यांनी तुरीची लागवड कमी तर केलीच पण पोषक हवामानाअभावी तुरीचा उतारासुद्धा कमी येण्याचा अंदाज आहे.

ठळक मुद्दे१५ दिवसानंतर खरे भाव कळणारअधिकाऱ्यांनी कारवाई करावी

मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्यावर्षी तुरीला भाव न मिळाल्यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी तुरीऐवजी कापूस आणि सोयाबीनच्या लागवडीवर भर दिला. शेतकऱ्यांनी तुरीची लागवड कमी तर केलीच पण पोषक हवामानाअभावी तुरीचा उतारासुद्धा कमी येण्याचा अंदाज आहे. नवीन तूर १५ दिवसानंतर बाजारात येणार आहे. व्यापाऱ्यांनी ही बाब हेरून १० दिवसांपासून स्वत:जवळील तूर डाळीचा जुना साठा बाजारात आणून कृत्रिम भाववाढ सुरू केली आहे. भाववाढीवर आतापासूनच अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियंत्रण आणावे, अशी मागणी ग्राहक संघटनांनी लोकमतशी बोलताना केली.१५ दिवसापूर्वी किरकोळ बाजारात ७० ते ७५ रुपयांला विकण्यात येणाऱ्या तूर डाळीचे भाव सध्या ८० ते ८५ रुपयांवर पोहोचले आहेत. यंदा तूर डाळीचे उत्पादन कमी होण्याचे मौखिक वृत्त पसरवून व्यापारी स्वत:ची पोळी शेकून संघटितरीत्या दरदिवशी भाव वाढवित आहेत. त्या तुलनेत शेतकऱ्यांना नवीन तुरीला ४५०० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना जास्त किमतीत तूर डाळ खरेदी करावी लागत आहे. आतापासून व्यापाऱ्यांवर लगाम न लावल्यास व्यापारी संघटितरीत्या आणखी भाव वाढवतील आणि निवडणुकीच्या तोंडावर सरकारच्या नाकीनऊ येईल, अशी शक्यता अ.भा. ग्राहक पंचायतचे विदर्भ संघटन मंत्री गजानन पांडे यांनी व्यक्त केली.अडीच ते तीन वर्षांपूर्वी व्यापाऱ्यांनी मागणी आणि पुरवठ्यात तफावत असल्याचे सांगून तूर डाळीचे भाव कृत्रिमरित्या प्रति किलो १८० रुपयांपर्यंत नेले होते. त्यामुळे तूर डाळ गरीब आणि सामान्यांच्या ताटातून गायब झाली होती. यावर सरकारने तात्काळ निर्णय घेत विदेशातून डाळ मागविली होती. शिवाय कमी भावात रेशन दुकानांमध्ये विकली होती. शेतकऱ्यांनीही दुसऱ्या हंगामात विक्रमी लागवड करून पीक घेतले होते. परिणामी दोन हंगामात तूर डाळीचे भाव प्रचंड प्रमाणात खाली आले होते.गेल्यावर्षीच्या हंगामात तूर प्रति क्विंटल ३२०० ते ३४०० रुपये आणि तूर डाळीला ठोक बाजारात गुणवत्तेनुसार ५० ते ५५ रुपये भाव होते. किरकोळ दुकानांमध्ये चांगल्या प्रतीची डाळ ६० ते ६५ रुपयांत अनेक महिने उपलब्ध होती. स्वताईनंतरही उठाव कमी होता. त्यामुळे अनेक दालमिल बंद झाल्या होत्या. त्याप्रमाणे विक्रमी उत्पादनामुळे सर्वच डाळींचे भाव अर्ध्यापेक्षा कमी किमतीवर आले होते. पण व्यापारी पुन्हा एकदा संधी साधून तूर डाळीच्या किमती कृत्रिमरीत्या वाढवित आहे. त्याचा फटका केवळ ग्राहकांना बसत आहे.आयात सुरू करावीशेतकऱ्यांच्या पिकाला चांगले भाव मिळावेत म्हणून केंद्र सरकारने तूर आणि डाळीच्या आयातीवर निर्बंध लावले आणि अन्य डाळींवर आयात शुल्क वाढविले. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकाला चांगले भाव मिळेल, ही सरकारची अपेक्षा फोल ठरली. शेतकऱ्यांना तुरीला भाव मिळालाच नाही. शिवाय बाजारात डाळीला उठावही नव्हता. यंदाच्या हंगामात तूर पूर्णपणे बाजारात आली नाहीच, त्यानंतरही व्यापारी १५ दिवसांपासून तूर डाळीचे भाव वाढवित आहेत. व्यापारी या महिन्यात तूरडाळीचे भाव प्रति किलो १०० रुपयांवर नेण्याच्या तयारीत आहेत. भाव वाढवून व्यापारी नफा कमवित आहेत. भाववाढीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने आतापासून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पांडे यांनी केली.

भाववाढीचे विरोधकांना मिळणार हत्यारतूरडाळ सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कांद्याच्या भाववाढीने दिल्लीतील भाजपा सरकारला सत्तेतून जावे लागले होते. अडीच ते तीन वर्षांपूर्वी तूरडाळीच्या किमती १८० रुपयांवर गेल्याचे सर्वांनाच ज्ञात आहे. सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे सुरू झाले आहे. व्यापाऱ्यांनी संघटितपणे तूरडाळीच्या किमती पूर्वीप्रमाणे १५० रुपयांवर नेल्यास सरकारला आयातीला वेळ मिळणार नाही. शिवाय शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळवून देण्याच्या नादात सरकारला पुढे तूरडाळीच्या किमतीत नियंत्रण मिळविणे कठीण होईल आणि भाववाढीचे विरोधकांना आयतेच हत्यार मिळेल, अशी शक्यता पांडे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :agricultureशेती