शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

नागपूर तालुक्यातील पाच शाळांमध्ये पाचपेक्षाही कमी विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 10:49 IST

शासनाने २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा मानस बाळगला आहे. यात सर्वाधिक शाळा काटोल तालुक्यातील बंद होणार आहेत. कारण काटोलमध्ये ४७ शाळेंची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे.

ठळक मुद्दे जि.प. शाळांची दुरवस्था४७ शाळांचा पट २० च्या खाली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनाने २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा मानस बाळगला आहे. यात सर्वाधिक शाळा काटोल तालुक्यातील बंद होणार आहेत. कारण काटोलमध्ये ४७ शाळेंची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. तर नागपूर तालुक्यात पाच शाळांमध्ये पाचपेक्षा कमी विद्यार्थ्यांचा पट आहे.शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात ३८७ शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. गेल्या सत्रामध्ये नागपूर जिल्ह्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या २४ शाळा बंद करून त्यातील विद्यार्थ्यांचे इतर शाळेत समायोजन केले होते. यंदाही पाच हजारावर शाळा बंद करण्याचे सरकारचे टार्गेट आहे. त्याची झळ नागपूर जिल्ह्यालाही बसण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यात शिक्षण विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार ० ते ५ पट संख्या असलेल्या ३४, ६ ते १० पटसंख्या असलेल्या ९४ व ११ ते १९ पटसंख्या असलेल्या २५९ शाळांचा समावेश आहे. तशा जिल्ह्यात १५५५ शाळा आहेत. शासनाने ठरविलेल्या टार्गेटनुसार शाळा बंद पाडल्यास मोठ्या संख्येने शिक्षिक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे.शासन स्तरावरूनच होणार शाळा बंदगत सहा-आठ महिन्यांपूर्वी नागपूर जि.प.च्या शिक्षण विभागाने शिक्षण समितीमध्ये कमी पटसंख्येच्या १०-१२ शाळा बंद करण्याचा मुद्दा ठेवला होता. मात्र, याला जि.प.तील पदाधिकारी-सदस्यांनी विरोध दर्शविल्याची माहिती आहे. २०१७-१८ मध्ये तत्त्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी २४ शाळा बंद केल्या होत्या. त्यानंतर त्याला विरोध झाल्याचे लक्षात घेता शासनाने वर्ष २०१८-१९ मध्ये आपल्या स्तरावरूनच जिल्ह्यातील १६ कमी पटसंख्येच्या शाळा बंद केल्याची माहिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा बंद करताना तो विषय समिती व सर्वसाधारण सभेमध्ये ठेऊन त्याला मान्यता घ्यावी लागते. मात्र, लोकप्रतिनिधीकडून शाळा बंद करण्याला विरोध होतो. त्यामुळे आता शाळा समायोजन करण्यासाठी शासन स्थानिक पातळीवरून प्रयत्न न करता थेट आपल्या स्तरावरूनच हा कार्यक्रम राबविणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र