शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

नागपूर तालुक्यातील पाच शाळांमध्ये पाचपेक्षाही कमी विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 10:49 IST

शासनाने २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा मानस बाळगला आहे. यात सर्वाधिक शाळा काटोल तालुक्यातील बंद होणार आहेत. कारण काटोलमध्ये ४७ शाळेंची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे.

ठळक मुद्दे जि.प. शाळांची दुरवस्था४७ शाळांचा पट २० च्या खाली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनाने २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा मानस बाळगला आहे. यात सर्वाधिक शाळा काटोल तालुक्यातील बंद होणार आहेत. कारण काटोलमध्ये ४७ शाळेंची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. तर नागपूर तालुक्यात पाच शाळांमध्ये पाचपेक्षा कमी विद्यार्थ्यांचा पट आहे.शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात ३८७ शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. गेल्या सत्रामध्ये नागपूर जिल्ह्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या २४ शाळा बंद करून त्यातील विद्यार्थ्यांचे इतर शाळेत समायोजन केले होते. यंदाही पाच हजारावर शाळा बंद करण्याचे सरकारचे टार्गेट आहे. त्याची झळ नागपूर जिल्ह्यालाही बसण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यात शिक्षण विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार ० ते ५ पट संख्या असलेल्या ३४, ६ ते १० पटसंख्या असलेल्या ९४ व ११ ते १९ पटसंख्या असलेल्या २५९ शाळांचा समावेश आहे. तशा जिल्ह्यात १५५५ शाळा आहेत. शासनाने ठरविलेल्या टार्गेटनुसार शाळा बंद पाडल्यास मोठ्या संख्येने शिक्षिक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे.शासन स्तरावरूनच होणार शाळा बंदगत सहा-आठ महिन्यांपूर्वी नागपूर जि.प.च्या शिक्षण विभागाने शिक्षण समितीमध्ये कमी पटसंख्येच्या १०-१२ शाळा बंद करण्याचा मुद्दा ठेवला होता. मात्र, याला जि.प.तील पदाधिकारी-सदस्यांनी विरोध दर्शविल्याची माहिती आहे. २०१७-१८ मध्ये तत्त्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी २४ शाळा बंद केल्या होत्या. त्यानंतर त्याला विरोध झाल्याचे लक्षात घेता शासनाने वर्ष २०१८-१९ मध्ये आपल्या स्तरावरूनच जिल्ह्यातील १६ कमी पटसंख्येच्या शाळा बंद केल्याची माहिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा बंद करताना तो विषय समिती व सर्वसाधारण सभेमध्ये ठेऊन त्याला मान्यता घ्यावी लागते. मात्र, लोकप्रतिनिधीकडून शाळा बंद करण्याला विरोध होतो. त्यामुळे आता शाळा समायोजन करण्यासाठी शासन स्थानिक पातळीवरून प्रयत्न न करता थेट आपल्या स्तरावरूनच हा कार्यक्रम राबविणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र