शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कोरोनावर लिंबू, संत्री, मोसंबीचा उतारा ! ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:08 IST

नागपूर : उन्हाळा तापायला लागला की लिंबूच्या मागणीत साहजिकच वाढ हाेते. उन्हातून आल्यावर लिंबूपाणी किंवा सरबताचा गारवा ताप शमविण्यास ...

नागपूर : उन्हाळा तापायला लागला की लिंबूच्या मागणीत साहजिकच वाढ हाेते. उन्हातून आल्यावर लिंबूपाणी किंवा सरबताचा गारवा ताप शमविण्यास दिलासादायक ठरताे. मात्र, यावेळी मागणी वाढण्याचे कारण वेगळे आहे व ते म्हणजे काेराेनाचे हाेय. लिंबूच नाही तर संत्रा आणि माेसंबीचीही मागणी वाढली आहे. काेराेनाविरुद्ध राेगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ही फळे प्रभावी ठरत असल्याने अनेकांच्या राेजच्या आहारात यांचा समावेश हाेत आहे. मागणी असल्याने दरही दुपटीने वाढले आहेत. मात्र, पुरवठा कमी हाेत असल्याने तिही चिंता व्यापाऱ्यांना लागली आहे.

दरवर्षी जानेवारीपासून संत्र्याची माेठ्या प्रमाणात आवक हाेत असते. नागरिकांच्या आहारात संत्र्याचा समावेश असल्याने त्याला मागणी असते; पण सध्या काेराेनामुळे लाेकांमध्ये अधिक जागृती येत असल्याचे दिसते. त्यामुळे यावेळी संत्रा, माेसंबीकडे लाेकांचा अधिक कल वाढल्याचे संत्रा विक्रेत्यांनी सांगितले. एकीकडे मागणी दुपटीने वाढली आणि आवकही कमी असल्याने संत्रा, माेसंबीचे दर दुपटीने वाढल्याचे ठाेक व्यापारी राजेश छाबरानी यांनी सांगितले.

महिन्याचे दर संत्रा माेसंबी लिंबू

जानेवारी-फेब्रुवारी ४०-५० २५-३०

मार्च ६०-७० ५०-६०

एप्रिल ८०-१०० ७०-८०

यावर्षी आवक घटली

राजेश छाबरानी यांनी सांगितले, विदर्भात नागपूर, अमरावती आणि काही प्रमाणात मध्यप्रदेशातून संत्र्याची आवक हाेते. माेसंबी आंध्र प्रदेशातून आणली जाते. यावर्षी माेसंबीची आवक सामान्य आहे; पण मागणी वाढल्याने दर वधारले आहेत. मात्र, संत्र्याचे उत्पादन २५ टक्क्यांनी घटले आहे. उत्पादन घटल्याने संत्र्याची आवक खूप कमी झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांजवळ माल कमी आला आहे. ग्राहकांची निराशा हाेत आहे. लिंबूची आवक नागपूर जिल्ह्यातूनच हाेते व ती सामान्य आहे.

संत्रा, माेसंबी व लिंबू ही लिंबूवर्गीय फळे असल्याने त्यात व्हिटॅमिन-सी चे प्रमाण अधिक असते, जे राेगप्रतिकारशक्ती वाढविण्यास लाभदायक आहे. लिंबाचा रस गूळ किंवा खडीसाखर टाकून घेतल्यास सर्दीसाठी उत्तम ठरताे. उन्हाळ्यात ताप शमविण्यासाठीही ते चांगले असतात.

- प्राची माहूरकर, वनस्पती तज्ज्ञ

काेराेनाच्या नवीन स्ट्रेनमध्ये डाेळे येणे, लूज माेशन, पाेटदुखी यासारखी लक्षणे असल्याचे दिसून येत आहे. यासाठी लिंबू आणि माेसंबीचा ज्यूस लाभदायक ठरताे. सर्दीने नाक बुजले असल्यास तिन्ही फळांचा रस खडीसाखर टाकून दिल्यास नाक खुले करण्यास मदत हाेते. शिवाय पचन क्षमता वाढविणे, भूक लागणे व राेगप्रतिकारशक्ती वाढविण्यास तिन्ही फळे लाभदायक आहेत. मात्र, आंबटपणा असल्याने कफ वाढण्यासही कारणीभूत ठरतात. त्यामुळे आहारात त्यांचे प्रमाण अधिक नसावे, याची काळजी घेणेही गरजेचे आहे.

- डाॅ. गायत्री खुरसुंगे, आयुर्वेद तज्ज्ञ