शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कोरोनावर लिंबू, संत्री, मोसंबीचा उतारा ! ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:08 IST

नागपूर : उन्हाळा तापायला लागला की लिंबूच्या मागणीत साहजिकच वाढ हाेते. उन्हातून आल्यावर लिंबूपाणी किंवा सरबताचा गारवा ताप शमविण्यास ...

नागपूर : उन्हाळा तापायला लागला की लिंबूच्या मागणीत साहजिकच वाढ हाेते. उन्हातून आल्यावर लिंबूपाणी किंवा सरबताचा गारवा ताप शमविण्यास दिलासादायक ठरताे. मात्र, यावेळी मागणी वाढण्याचे कारण वेगळे आहे व ते म्हणजे काेराेनाचे हाेय. लिंबूच नाही तर संत्रा आणि माेसंबीचीही मागणी वाढली आहे. काेराेनाविरुद्ध राेगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ही फळे प्रभावी ठरत असल्याने अनेकांच्या राेजच्या आहारात यांचा समावेश हाेत आहे. मागणी असल्याने दरही दुपटीने वाढले आहेत. मात्र, पुरवठा कमी हाेत असल्याने तिही चिंता व्यापाऱ्यांना लागली आहे.

दरवर्षी जानेवारीपासून संत्र्याची माेठ्या प्रमाणात आवक हाेत असते. नागरिकांच्या आहारात संत्र्याचा समावेश असल्याने त्याला मागणी असते; पण सध्या काेराेनामुळे लाेकांमध्ये अधिक जागृती येत असल्याचे दिसते. त्यामुळे यावेळी संत्रा, माेसंबीकडे लाेकांचा अधिक कल वाढल्याचे संत्रा विक्रेत्यांनी सांगितले. एकीकडे मागणी दुपटीने वाढली आणि आवकही कमी असल्याने संत्रा, माेसंबीचे दर दुपटीने वाढल्याचे ठाेक व्यापारी राजेश छाबरानी यांनी सांगितले.

महिन्याचे दर संत्रा माेसंबी लिंबू

जानेवारी-फेब्रुवारी ४०-५० २५-३०

मार्च ६०-७० ५०-६०

एप्रिल ८०-१०० ७०-८०

यावर्षी आवक घटली

राजेश छाबरानी यांनी सांगितले, विदर्भात नागपूर, अमरावती आणि काही प्रमाणात मध्यप्रदेशातून संत्र्याची आवक हाेते. माेसंबी आंध्र प्रदेशातून आणली जाते. यावर्षी माेसंबीची आवक सामान्य आहे; पण मागणी वाढल्याने दर वधारले आहेत. मात्र, संत्र्याचे उत्पादन २५ टक्क्यांनी घटले आहे. उत्पादन घटल्याने संत्र्याची आवक खूप कमी झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांजवळ माल कमी आला आहे. ग्राहकांची निराशा हाेत आहे. लिंबूची आवक नागपूर जिल्ह्यातूनच हाेते व ती सामान्य आहे.

संत्रा, माेसंबी व लिंबू ही लिंबूवर्गीय फळे असल्याने त्यात व्हिटॅमिन-सी चे प्रमाण अधिक असते, जे राेगप्रतिकारशक्ती वाढविण्यास लाभदायक आहे. लिंबाचा रस गूळ किंवा खडीसाखर टाकून घेतल्यास सर्दीसाठी उत्तम ठरताे. उन्हाळ्यात ताप शमविण्यासाठीही ते चांगले असतात.

- प्राची माहूरकर, वनस्पती तज्ज्ञ

काेराेनाच्या नवीन स्ट्रेनमध्ये डाेळे येणे, लूज माेशन, पाेटदुखी यासारखी लक्षणे असल्याचे दिसून येत आहे. यासाठी लिंबू आणि माेसंबीचा ज्यूस लाभदायक ठरताे. सर्दीने नाक बुजले असल्यास तिन्ही फळांचा रस खडीसाखर टाकून दिल्यास नाक खुले करण्यास मदत हाेते. शिवाय पचन क्षमता वाढविणे, भूक लागणे व राेगप्रतिकारशक्ती वाढविण्यास तिन्ही फळे लाभदायक आहेत. मात्र, आंबटपणा असल्याने कफ वाढण्यासही कारणीभूत ठरतात. त्यामुळे आहारात त्यांचे प्रमाण अधिक नसावे, याची काळजी घेणेही गरजेचे आहे.

- डाॅ. गायत्री खुरसुंगे, आयुर्वेद तज्ज्ञ