शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

रणभूमीतील दिग्गज ; जतिराम बर्वेंचा एक विक्रम असाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 16:16 IST

रामटेकच्या रणभूमीत भोसले घरण्याची संसदेत एन्ट्री असो वा माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांचा विजय. रामटेक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक भारतीय राजकारणात विशिष्ट महत्त्व ठेवणारी ठरली आहे.

ठळक मुद्देराज्यात पहिल्या तर देशात दुसऱ्या मताधिक्याचे विजयी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रामटेकच्या रणभूमीत भोसले घरण्याची संसदेत एन्ट्री असो वा माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांचा विजय. रामटेक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक भारतीय राजकारणात विशिष्ट महत्त्व ठेवणारी ठरली आहे. १९८० मध्ये अशीच एक ऐतिहासिक नोंद या मतदारसंघात झाली. ती म्हणजे राज्यात सर्वाधिक जास्त मतांनी निवडून येण्याची. हा विक्रम केला आहे काँग्रेसचे जतिराम बर्वे यांनी.१९७७ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर संसदेत पोहोचणाऱ्या बर्वे यांना कॉँग्रेसने पुन्हा एकदा १९८० मध्ये रामटेकच्या रणभूमीत उतरविले. तेव्हा त्यांच्याविरोधात जनता पार्टीचे राजेंद्रबाबू देशमुख, जनता पार्टी (एस)चे पुरुषोत्तम राऊत, काँग्रेस (अर्स)चे चंद्रकांत राऊत यांच्यासह अपक्ष उमेदवार म्हणून प्रभाकरराव तिडके, देवराव मेश्राम, रामकृष्ण दाणी, कोठीराम गजभिये, काशिनाथ कराडे हे उमेदवार रिंगणात होते. त्यात जतिराम बर्वे यांनी २ लाख ७३ हजार ९५७ मते घेत राजेंद्रबाबू देशमुख यांचा २ लाख १४ हजार ७६३ मतांच्या फरकाने पराभव केला. त्यावेळी देशमुख यांना ५९ हजार १९४ मतांवरच समाधान मानावे लागले होते. या निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त मताधिक्याने विजयी होण्याचा मान बर्वे यांना जातो. १९८० च्या निवडणुकीत इंदिरा गांधी देशात सर्वाधिक जास्त मताधिक्याने निवडून आल्या होत्या. त्यांनी त्यावेळी रायबरेली (उत्तर प्रदेश) आणि मेडक (आंध्र प्रदेश) अशा दोन लोकसभा मतदार क्षेत्रातून निवडणूक लढविली होती. यातील मेडक या मतदारसंघातून त्यांनी २ लाख १९ हजार १२४ मतांच्या फरकाने जनता पार्टीच्या एस. जयपाल रेड्डी यांचा पराभव केला. इंदिरा गांधी यांना ३ लाख १ हजार ५७७ तर रेड्डी यांना ८२ हजार ४५३ मते मिळाली होती. रायबरेलीत त्यांना २ लाख २३ हजार ९०३ मते मिळाली. त्यांच्याविरोधातील जनता पार्टीच्या विजया राजे सिंधीया यांनी ५० हजार २४९ मते घेतली. पारंपरिक मतदारसंघ असलेल्या रायबरेलीतून मात्र त्या केवळ १ लाख ७३ हजार ६५४ मतांनी विजयी झाल्या.१९८० च्या निवडणुकीत देशात पहिल्या क्रमांकाचे मताधिक्याने विजयी होण्याचा मान इंदिरा गांधी यांना तर महाराष्ट्रातून पहिल्या आणि देशातून दुसºया क्रमांकाच्या मताधिक्याने विजयी होण्याचा मान हा रामटेक लोकसभा क्षेत्रातून विजयी झालेल्या जतिराम बर्वे यांच्या नावाने आहे.असे असले तरी यापूर्वीचा रामटेक लोकसभा क्षेत्राचा १९७१ च्या निवडणुकीतील विक्रम मात्र जतिराम बर्वे हे मोडू शकले नाही. त्या निवडणुकीत काँग्रेसचे अमृत सोनार हे २ लाख ३१ हजार ७४२ मतांनी विजयी झले होते.सोनार यांना २ लाख ८० हजार ५४ तर फॉरवर्ड ब्लॉकचे आनंदराव कळमकर यांनी ४८ हजार ३१२ मते पडली होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक