शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

रणभूमीतील दिग्गज ; जतिराम बर्वेंचा एक विक्रम असाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 16:16 IST

रामटेकच्या रणभूमीत भोसले घरण्याची संसदेत एन्ट्री असो वा माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांचा विजय. रामटेक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक भारतीय राजकारणात विशिष्ट महत्त्व ठेवणारी ठरली आहे.

ठळक मुद्देराज्यात पहिल्या तर देशात दुसऱ्या मताधिक्याचे विजयी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रामटेकच्या रणभूमीत भोसले घरण्याची संसदेत एन्ट्री असो वा माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांचा विजय. रामटेक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक भारतीय राजकारणात विशिष्ट महत्त्व ठेवणारी ठरली आहे. १९८० मध्ये अशीच एक ऐतिहासिक नोंद या मतदारसंघात झाली. ती म्हणजे राज्यात सर्वाधिक जास्त मतांनी निवडून येण्याची. हा विक्रम केला आहे काँग्रेसचे जतिराम बर्वे यांनी.१९७७ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर संसदेत पोहोचणाऱ्या बर्वे यांना कॉँग्रेसने पुन्हा एकदा १९८० मध्ये रामटेकच्या रणभूमीत उतरविले. तेव्हा त्यांच्याविरोधात जनता पार्टीचे राजेंद्रबाबू देशमुख, जनता पार्टी (एस)चे पुरुषोत्तम राऊत, काँग्रेस (अर्स)चे चंद्रकांत राऊत यांच्यासह अपक्ष उमेदवार म्हणून प्रभाकरराव तिडके, देवराव मेश्राम, रामकृष्ण दाणी, कोठीराम गजभिये, काशिनाथ कराडे हे उमेदवार रिंगणात होते. त्यात जतिराम बर्वे यांनी २ लाख ७३ हजार ९५७ मते घेत राजेंद्रबाबू देशमुख यांचा २ लाख १४ हजार ७६३ मतांच्या फरकाने पराभव केला. त्यावेळी देशमुख यांना ५९ हजार १९४ मतांवरच समाधान मानावे लागले होते. या निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त मताधिक्याने विजयी होण्याचा मान बर्वे यांना जातो. १९८० च्या निवडणुकीत इंदिरा गांधी देशात सर्वाधिक जास्त मताधिक्याने निवडून आल्या होत्या. त्यांनी त्यावेळी रायबरेली (उत्तर प्रदेश) आणि मेडक (आंध्र प्रदेश) अशा दोन लोकसभा मतदार क्षेत्रातून निवडणूक लढविली होती. यातील मेडक या मतदारसंघातून त्यांनी २ लाख १९ हजार १२४ मतांच्या फरकाने जनता पार्टीच्या एस. जयपाल रेड्डी यांचा पराभव केला. इंदिरा गांधी यांना ३ लाख १ हजार ५७७ तर रेड्डी यांना ८२ हजार ४५३ मते मिळाली होती. रायबरेलीत त्यांना २ लाख २३ हजार ९०३ मते मिळाली. त्यांच्याविरोधातील जनता पार्टीच्या विजया राजे सिंधीया यांनी ५० हजार २४९ मते घेतली. पारंपरिक मतदारसंघ असलेल्या रायबरेलीतून मात्र त्या केवळ १ लाख ७३ हजार ६५४ मतांनी विजयी झाल्या.१९८० च्या निवडणुकीत देशात पहिल्या क्रमांकाचे मताधिक्याने विजयी होण्याचा मान इंदिरा गांधी यांना तर महाराष्ट्रातून पहिल्या आणि देशातून दुसºया क्रमांकाच्या मताधिक्याने विजयी होण्याचा मान हा रामटेक लोकसभा क्षेत्रातून विजयी झालेल्या जतिराम बर्वे यांच्या नावाने आहे.असे असले तरी यापूर्वीचा रामटेक लोकसभा क्षेत्राचा १९७१ च्या निवडणुकीतील विक्रम मात्र जतिराम बर्वे हे मोडू शकले नाही. त्या निवडणुकीत काँग्रेसचे अमृत सोनार हे २ लाख ३१ हजार ७४२ मतांनी विजयी झले होते.सोनार यांना २ लाख ८० हजार ५४ तर फॉरवर्ड ब्लॉकचे आनंदराव कळमकर यांनी ४८ हजार ३१२ मते पडली होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक