शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

रणभूमीतील दिग्गज; रामटेकच्या गडावर पी. व्ही. नरसिंहराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 11:30 IST

एकेकाळी भारताच्या माजी पंतप्रधानांनी दोनवेळा प्रतिनिधित्व केलेला रामटेक हा विदर्भातील लक्षवेधी मतदार संघ आहे. १९८४ आणि १९८९ या दोन निवडणुकांमध्ये पी.व्ही.नरसिंहराव यांनी रामटेक लोकसभा मतदार संघातून नशीब अजमाविले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकेकाळी भारताच्या माजी पंतप्रधानांनी दोनवेळा प्रतिनिधित्व केलेला रामटेक हा विदर्भातील लक्षवेधी मतदार संघ आहे. १९८४ आणि १९८९ या दोन निवडणुकांमध्ये पी.व्ही.नरसिंहराव यांनी रामटेक लोकसभा मतदार संघातून नशीब अजमाविले होते. यात रामटेकच्या मतदारांनी त्यांना डोक्यावर घेतले. १९८४ मध्ये नरसिंहराव यांनी रामटेक हा काँग्रेससाठी सर्वात सुरक्षित मतदार संघ असल्याने येथून लढले होते. समाजवादी काँग्रेसचे शंकरराव गेडाम हे त्यांचे प्रतिस्पर्धी होते. या निवडणुकीत ४ लाख ६० हजार ५७० असे एकूण मतदान झाले होते. त्यापैकी नरसिंहराव यांना २ लाख ९० हजार ९०५ मते मिळाली होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी शंकरराव गेडाम यांना १ लाख ४ हजार ९३३ मते मिळाली होती. पी. व्ही. नरसिंहराव हे १ लाख ८५ हजार ९७२ अशा विक्रमी मताधिक्क्याने निवडून आले होते. यावेळी पी.व्ही.नरसिंहराव यांना एकूण मतांच्या ६५ टक्के मते मिळाली होती. तिसऱ्या क्रमांकावर रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार अरविंद तारेकर होते. त्यांना केवळ २६ हजार ३०१ मते मिळाली होती.या निवडणुकीत एकूण १५ अपक्ष उमेदवार मैदानात होते. रामटेकमधून निवडून येताच नरसिंहराव हे केंद्रात मानव संसाधन मंत्री झाले. १९८९ च्या निवडणुकीत पी.व्ही.नरसिंहराव हे दुसऱ्यांदा रामटेक लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार होते. यावेळी जनता दलाचे पांडुरंग हजारे यांच्याशी त्यांचा सामना झाला. हजारे यांनी नरसिंहराव यांना या निवडणुकीत घाम फोडला. या निवडणुकीत ५ लाख ८९ हजार ९७२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी नरसिंहराव यांना २ लाख ५७ हजार ८०० मते मिळाली होती. मतांची ही टक्केवारी ४५.४५ होती. पांडुरंग हजारे यांना २ लाख २३ हजार ३३० मते मिळाली होती आणि मतांची टक्केवारी ३९.३८ होती. नरसिंहराव यांचा ३४ हजार ४७० मतांनी निसटता विजय झाला होता. तिसºया क्रमांकावर खोरिपचे पृथ्वीराज बोरकर होते, त्यांना २१ हजार १४० मते मिळाली होती. बसपाचे मा.मु.देशमुख यांनी १५ हजार ८५१ मते मिळवीत काँग्रेसच्या मताधिक्क्याला येथे ब्रे्रक लावला होता, हे विशेष. यानंतर आंध्र प्रदेशच्या नडियाल लोकसभा मतदार संघातून प्रतिनिधित्व करीत नरसिंहराव देशाचे पंतप्रधान झाले. ते २१ जून १९९१ ते १६ मे ११९६ या काळात पंतप्रधान होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९