शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

दिल्लीवारीत आघाडीवर, आंदोलनाकडे मात्र पाठ

By admin | Updated: April 13, 2017 03:12 IST

दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी दिल्ली गाठली. नागपुरात लक्ष द्या, तेथे काँग्रेस मजबूत करा,

प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी अनुभवली गटबाजी : कशी होणार काँग्रेस बळकट? नागपूर : दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी दिल्ली गाठली. नागपुरात लक्ष द्या, तेथे काँग्रेस मजबूत करा, असे साकडे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना घातले. मात्र, दिल्लीहून नागपुरात परतताच त्याच नेत्यांनी पक्षाच्या कार्यक्रमापेक्षा गटबाजीला अधिक महत्व दिल्याचे दिसून आले. महाराष्ट्राचे भूमिपुत्र कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात नागपुरात प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसतर्फे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. मात्र, दिल्लीवारीत पुढाकार घेणाऱ्या नेत्यांनी राष्ट्रीय हिताच्या या आंदोलनाकडे पाठ फिरवत गटबाजीलाच अधिक महत्व दिल्याचे दिसून आले. पाकिस्तान विरोधात देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. भूमिपुत्राच्या बचावासाठी प्रदेश काँग्रेस मदतीसाठी धावली. बुधवारी राज्यभर स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी नागपुरात येत व्हेरायटी चौकात ही मोहीम राबिवली. शहर काँग्रेसचे पदाधिकारी व बहुतांश नगरसेवकांसह कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी झाले. मात्र, दिल्लीवारी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना स्वगृही होत असलेल्या पक्षाच्या या कार्यक्रमाचा विसर पडल्याचे पहायला मिळाले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेत दिल्लीवारी करणारे पदाधिकारी आघाडीवर होते. संघर्षयात्रा व्हेरायटी चौकातही आली होती. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण हे नागपुरात तीन तास असूनही व्हेरायटी चौकातील आंदोलनाला आले नव्हते. त्या नाराजीतून तर दिल्लीवारी करणारे नेते बुधवारी चव्हाण यांच्या उपस्थित झालेल्या स्वाक्षरी मोहिमेत अनुपस्थित राहिले नाहीत ना, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती. खरेतर महाराष्ट्राच्या पुत्रासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेत सर्वांनीच राजकीय मतभेद बाजूला सारून उपस्थित राहणे आवश्यक होते. पण तसे झाले नाहीत. गेल्यावेळी संघर्षयात्रेच्या कार्यक्रमात अनुपस्थित असलेले माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, शहर अध्यक्ष विकास ठाकरे या वेळी उपस्थित होते. तर माजी मंत्री नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी हे गेल्यावेळी व आताही अनुपस्थित होते. नागपुरातील काँग्रेस नेते आता कोणत्याही परिस्थिती एकत्र येण्यास तयार नाहीत, असेच काहीसे चित्र या दोन्ही आंदोलनावरून पुढे आले आहे. सर्वच राजकीय पक्षात मतभेद आहेत. परंतु इतर पक्षात कार्यक्रम असला की आपसातील मतभेद बाजूला सारून सर्वजण एकत्र येतात. काँग्रेसमध्ये मात्र दरी वाढतच चालली आहे. एकीकडे पक्ष बळकट करण्यासाठी पक्षश्रेष्ठीकडे तक्रार करायची व दुसरीकडे पक्षाच्या आंदोलनाला दांडी मारायची, ही परिस्थिती नागपुरात प्रदेशाध्यक्षांना अनुभवायला मिळाली. (प्रतिनिधी)