शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
2
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
3
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
4
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
5
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
6
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
7
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
8
गब्बर सिंगला डायलॉग शिकवल्यावरुन ट्रोल होतायेत महागुरु, नक्की काय म्हणाले होते?; पाहा Video
9
Jyeshtha Amavasya 2025: घरातले आजारपण, भांडणतंटा काढता पाय घेत नसेल तर ज्येष्ठ अमावास्येला करा 'हे' उपाय!
10
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
11
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
12
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
13
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
14
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
15
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
17
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
18
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
19
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
20
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!

सार्वजनिक संपत्तीच्या विद्रुपीकरणात नेत्यांचाच पुढाकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:11 IST

- नेतेच कर्तव्याला देतात हुलकावणी : उड्डाण पुलाच्या पिलरवर प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे तर विद्युत जनित्रावर नाना पटोलेंचे पोस्टर ...

- नेतेच कर्तव्याला देतात हुलकावणी : उड्डाण पुलाच्या पिलरवर प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे तर विद्युत जनित्रावर नाना पटोलेंचे पोस्टर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महानगरपालिकेच्या कायद्यानुसार सार्वजनिक संपत्तींचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर दंडासह कठोर कारवाईची तरतूद आहे. अधामधात ही कारवाई होताना दिसूनही येते; मात्र जेव्हा राज्यसरकारमधील नेतेच सार्वजनिक संपत्तींच्या विद्रुपीकरणास जबाबदार ठरत असतील तर हा कायदा कुणासाठी, नेत्यांना व कार्यकर्त्यांना या शिक्षेत विशेष सवलत आहे का, असे प्रश्न सर्वसामान्यांना उपस्थित होतात.

शहर आता विकासाच्या प्रगतीपथावर स्वार झाले आहे. मेट्रो, लांब उड्डाण पूल, रस्त्यांचे सिमेंटीकरण आदी शहराच्या सौंदर्यात भर पाडत आहेत. त्या सौंदर्याला नेतेच गालबोट लावत आहेत. लोकमत चौक येथील उड्डाण पुलाच्या पिलरवर माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी खासदार प्रफुल्ल पटेल व खासदार सुप्रिया सुळे यांचे अभिनंदन करणारे पोस्टर चिकटवले आहेत. थोडे पुढे गेले तर रहाटे कॉलनी चौक ते कृपलानी चौकादरम्यान असलेल्या विद्युत जनित्रावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पोस्टर चिटकवण्यात आले आहे. आता हे पोस्टर चिटकवण्यासाठी संबंधित नेत्यांनी सांगितले नसेलही; मात्र सर्वत्र कायदा-सुव्यवस्थेचा गवगवा करणाऱ्या शासनयंत्रणेतील पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच आणि विशेष म्हणजे खुद्द माजी आमदार असलेल्या प्रकाश गजभिये यांनाही याचे भान नसावे, हा चिंतनाचा विषय ठरतो. असली जाहिरातबाजी शहरातील अनेक स्थळांवरील सार्वजनिक मालमत्तेवर दिसून येते. सर्वसामान्यांना त्यांच्या अधिकाराची जाणिव करवून देण्याचे आव आणणारे नेतेच, जाणिवाशून्य असतील तर यांच्यावर नागरिकांनी विश्वास तरी कसा ठेवावा, हा प्रमुख प्रश्न आहे.

---------

उजेडात टेटर अन् अंधारात खेटर

शहराचे सौंदर्य खुलवले जात असताना प्रशासनावर सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे, विद्रुपीकरण करण्यास आळा घालणे आदी जबाबदाऱ्यांचा अतिरिक्त भार आला आहे. त्यासाठीची स्वतंत्र अशी यंत्रणाही आहे. मात्र, ही यंत्रणा ‘उजेडात टेटर अन् अंधारात खेटर’ होऊन बसल्याचेच दिसून येते. कारवाईचा केवळ बागुलबुवाच केला जातो.

----------

उच्च न्यायालयाने दखल घ्यावी!

देशातील विविध प्रश्नांवर सरकारचे दुर्लक्ष होताना आढळले की सर्वोच्च व उच्च न्यायालय स्वत:च संबंधित प्रश्नांवर याचिका दाखल करवून घेते. तसेच ते प्रश्न सोडविण्यासाठी सरकारला आवश्यक आदेश देत असते. त्यामुळे नागपुरातील सौंदर्यीकरणाचे विद्रुपीकरण हा विषयही आता न्यायालयानेच हाताळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

.........