शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

सार्वजनिक संपत्तीच्या विद्रुपीकरणात नेत्यांचाच पुढाकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:11 IST

- नेतेच कर्तव्याला देतात हुलकावणी : उड्डाण पुलाच्या पिलरवर प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे तर विद्युत जनित्रावर नाना पटोलेंचे पोस्टर ...

- नेतेच कर्तव्याला देतात हुलकावणी : उड्डाण पुलाच्या पिलरवर प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे तर विद्युत जनित्रावर नाना पटोलेंचे पोस्टर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महानगरपालिकेच्या कायद्यानुसार सार्वजनिक संपत्तींचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर दंडासह कठोर कारवाईची तरतूद आहे. अधामधात ही कारवाई होताना दिसूनही येते; मात्र जेव्हा राज्यसरकारमधील नेतेच सार्वजनिक संपत्तींच्या विद्रुपीकरणास जबाबदार ठरत असतील तर हा कायदा कुणासाठी, नेत्यांना व कार्यकर्त्यांना या शिक्षेत विशेष सवलत आहे का, असे प्रश्न सर्वसामान्यांना उपस्थित होतात.

शहर आता विकासाच्या प्रगतीपथावर स्वार झाले आहे. मेट्रो, लांब उड्डाण पूल, रस्त्यांचे सिमेंटीकरण आदी शहराच्या सौंदर्यात भर पाडत आहेत. त्या सौंदर्याला नेतेच गालबोट लावत आहेत. लोकमत चौक येथील उड्डाण पुलाच्या पिलरवर माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी खासदार प्रफुल्ल पटेल व खासदार सुप्रिया सुळे यांचे अभिनंदन करणारे पोस्टर चिकटवले आहेत. थोडे पुढे गेले तर रहाटे कॉलनी चौक ते कृपलानी चौकादरम्यान असलेल्या विद्युत जनित्रावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पोस्टर चिटकवण्यात आले आहे. आता हे पोस्टर चिटकवण्यासाठी संबंधित नेत्यांनी सांगितले नसेलही; मात्र सर्वत्र कायदा-सुव्यवस्थेचा गवगवा करणाऱ्या शासनयंत्रणेतील पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच आणि विशेष म्हणजे खुद्द माजी आमदार असलेल्या प्रकाश गजभिये यांनाही याचे भान नसावे, हा चिंतनाचा विषय ठरतो. असली जाहिरातबाजी शहरातील अनेक स्थळांवरील सार्वजनिक मालमत्तेवर दिसून येते. सर्वसामान्यांना त्यांच्या अधिकाराची जाणिव करवून देण्याचे आव आणणारे नेतेच, जाणिवाशून्य असतील तर यांच्यावर नागरिकांनी विश्वास तरी कसा ठेवावा, हा प्रमुख प्रश्न आहे.

---------

उजेडात टेटर अन् अंधारात खेटर

शहराचे सौंदर्य खुलवले जात असताना प्रशासनावर सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे, विद्रुपीकरण करण्यास आळा घालणे आदी जबाबदाऱ्यांचा अतिरिक्त भार आला आहे. त्यासाठीची स्वतंत्र अशी यंत्रणाही आहे. मात्र, ही यंत्रणा ‘उजेडात टेटर अन् अंधारात खेटर’ होऊन बसल्याचेच दिसून येते. कारवाईचा केवळ बागुलबुवाच केला जातो.

----------

उच्च न्यायालयाने दखल घ्यावी!

देशातील विविध प्रश्नांवर सरकारचे दुर्लक्ष होताना आढळले की सर्वोच्च व उच्च न्यायालय स्वत:च संबंधित प्रश्नांवर याचिका दाखल करवून घेते. तसेच ते प्रश्न सोडविण्यासाठी सरकारला आवश्यक आदेश देत असते. त्यामुळे नागपुरातील सौंदर्यीकरणाचे विद्रुपीकरण हा विषयही आता न्यायालयानेच हाताळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

.........