शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक संपत्तीच्या विद्रुपीकरणात नेत्यांचाच पुढाकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:11 IST

- नेतेच कर्तव्याला देतात हुलकावणी : उड्डाण पुलाच्या पिलरवर प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे तर विद्युत जनित्रावर नाना पटोलेंचे पोस्टर ...

- नेतेच कर्तव्याला देतात हुलकावणी : उड्डाण पुलाच्या पिलरवर प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे तर विद्युत जनित्रावर नाना पटोलेंचे पोस्टर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महानगरपालिकेच्या कायद्यानुसार सार्वजनिक संपत्तींचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर दंडासह कठोर कारवाईची तरतूद आहे. अधामधात ही कारवाई होताना दिसूनही येते; मात्र जेव्हा राज्यसरकारमधील नेतेच सार्वजनिक संपत्तींच्या विद्रुपीकरणास जबाबदार ठरत असतील तर हा कायदा कुणासाठी, नेत्यांना व कार्यकर्त्यांना या शिक्षेत विशेष सवलत आहे का, असे प्रश्न सर्वसामान्यांना उपस्थित होतात.

शहर आता विकासाच्या प्रगतीपथावर स्वार झाले आहे. मेट्रो, लांब उड्डाण पूल, रस्त्यांचे सिमेंटीकरण आदी शहराच्या सौंदर्यात भर पाडत आहेत. त्या सौंदर्याला नेतेच गालबोट लावत आहेत. लोकमत चौक येथील उड्डाण पुलाच्या पिलरवर माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी खासदार प्रफुल्ल पटेल व खासदार सुप्रिया सुळे यांचे अभिनंदन करणारे पोस्टर चिकटवले आहेत. थोडे पुढे गेले तर रहाटे कॉलनी चौक ते कृपलानी चौकादरम्यान असलेल्या विद्युत जनित्रावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पोस्टर चिटकवण्यात आले आहे. आता हे पोस्टर चिटकवण्यासाठी संबंधित नेत्यांनी सांगितले नसेलही; मात्र सर्वत्र कायदा-सुव्यवस्थेचा गवगवा करणाऱ्या शासनयंत्रणेतील पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच आणि विशेष म्हणजे खुद्द माजी आमदार असलेल्या प्रकाश गजभिये यांनाही याचे भान नसावे, हा चिंतनाचा विषय ठरतो. असली जाहिरातबाजी शहरातील अनेक स्थळांवरील सार्वजनिक मालमत्तेवर दिसून येते. सर्वसामान्यांना त्यांच्या अधिकाराची जाणिव करवून देण्याचे आव आणणारे नेतेच, जाणिवाशून्य असतील तर यांच्यावर नागरिकांनी विश्वास तरी कसा ठेवावा, हा प्रमुख प्रश्न आहे.

---------

उजेडात टेटर अन् अंधारात खेटर

शहराचे सौंदर्य खुलवले जात असताना प्रशासनावर सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे, विद्रुपीकरण करण्यास आळा घालणे आदी जबाबदाऱ्यांचा अतिरिक्त भार आला आहे. त्यासाठीची स्वतंत्र अशी यंत्रणाही आहे. मात्र, ही यंत्रणा ‘उजेडात टेटर अन् अंधारात खेटर’ होऊन बसल्याचेच दिसून येते. कारवाईचा केवळ बागुलबुवाच केला जातो.

----------

उच्च न्यायालयाने दखल घ्यावी!

देशातील विविध प्रश्नांवर सरकारचे दुर्लक्ष होताना आढळले की सर्वोच्च व उच्च न्यायालय स्वत:च संबंधित प्रश्नांवर याचिका दाखल करवून घेते. तसेच ते प्रश्न सोडविण्यासाठी सरकारला आवश्यक आदेश देत असते. त्यामुळे नागपुरातील सौंदर्यीकरणाचे विद्रुपीकरण हा विषयही आता न्यायालयानेच हाताळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

.........