शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मीनगरात मजुराची निर्घृण हत्या

By admin | Updated: December 23, 2016 01:27 IST

बेरोजगार असल्याचे टोमणे सहन न झाल्यामुळे दोघांनी एका मजुराची निर्र्घृण हत्या केली.

टोमणे मारल्याचा राग : दोघांना अटक नागपूर : बेरोजगार असल्याचे टोमणे सहन न झाल्यामुळे दोघांनी एका मजुराची निर्र्घृण हत्या केली. हरिदास महादेवराव शेंदरे (वय ५१) असे मृताचे नाव आहे. तर त्याला मारणाऱ्या आरोपींची नावे गौतम ऊर्फ गोलू उबाळे आणि रूपेश लांजेवार अशी आहेत. त्यांना पोलिसांनी रात्री अटक केली. लक्ष्मीनगरसारख्या शांत भागात गुरुवारी रात्री ७ च्या सुमारास झालेल्या या हत्येच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गोपालनगरात राहणारा हरिदास शेंदरे हा कार वॉशिंग आणि लॉनमध्ये साफसफाईचे काम करायचा. त्याला प्रफुल्ल आणि शेखर ही दोन मुले आहेत. प्रफुल्ल एका इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनीत कार्यरत असून, शेखर मेट्रो प्रकल्पात कामाला आहे. शेंदरेची पत्नी धुणीभांडी करते. रोज रात्रीच्या वेळी तो लक्ष्मीनगरातील जैन मंदिराजवळ एका लॉन्ड्री(ईस्त्री)वाल्याकडे येऊन बसायचा. तेथे कुसाटे नामक केबल आॅपरेटर आणि अन्य काही जण येऊन बसायचे. कधी ही मंडळी येथेच बसून दारू प्यायची तर कधी ते बाहेरून दारू पिऊन येथे बसून चकाट्या पिटायचे. आरोपी गौतम हा एका नामांकित स्कूलच्या व्हॅनवर चालक म्हणून कार्यरत होता. (त्याचे वडील आणि भाऊसुद्धा वाहनचालकच आहेत.) वर्षभरापूर्वी अपघात झाल्याने गौतमचा पाय जायबंदी झाला. त्याच्या पायात रॉड टाकण्यात आल्यामुळे त्याला वाहन चालविता येत नव्हते. त्यामुळे तो बेरोजगार झाला. आरोपी गौतम हा सुद्धा आपल्या मित्रासोबत लॉन्ड्रीवाल्याजवळ येऊन बसायचा. गौतम आणि केबल आॅपरेटरमध्ये अजिबात पटत नव्हते. दारू पिल्यानंतर कुसाटे गौतमला टोमणे मारायचा. कामधंदा करीत नाही, दारू पिऊन फुकट मस्ती करतो, असे म्हणायचा. चारचौघात नेहमीच तो अपमान करीत असल्याने गौतम त्याला धडा शिकविण्याच्या तयारीत होता. त्यानुसार त्याने आपल्या एका मित्राकडून गुप्ती आणली होती. हत्यासत्र थांबेना! गेल्या सात दिवसातील हत्येची ही आठवी घटना आहे. १७ डिसेंबरपासून नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरीश बावणे या निष्पाप तरुणाच्या हत्येपासून उपराजधानीत हत्यासत्र सुरू झाले. ते थांबायला तयार नाही. त्याच दिवशी अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बग्गा कौरतीची हत्या झाली. त्यानंतर जरीपटक्यातील लव्हप्रीत कौर, हुडकेश्वरमध्ये पंकज तिवारी, अयाज कुरेशी तसेच आणखी एकाची हत्या झाली. बुधवारी लकडगंजमध्ये गोलू गच्चीवाले याची हत्या झाली. आता शांत आणि सुशिक्षितांचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्मीनगर, बजाजनगरसारख्या भागात शेंदरेची हत्या झाल्याने गुन्हेगारांची पिलावळ उपराजधानीतील सर्वच भागात वळवळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.