शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
4
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
5
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
7
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
9
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
10
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
11
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
12
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
13
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
14
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
15
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
16
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
17
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
18
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
19
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
20
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

लोकांना बौद्ध धम्मात जाण्यापासून रोखण्यासाठीच ‌‘लव्ह जिहाद’चा कायदा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशात मोठ्या प्रमाणावर लोक बौद्ध धम्माकडे आकर्षित होत आहेत. लोकांना विशेषत: मागासवर्गीयांना बौद्ध धम्माकडे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : देशात मोठ्या प्रमाणावर लोक बौद्ध धम्माकडे आकर्षित होत आहेत. लोकांना विशेषत: मागासवर्गीयांना बौद्ध धम्माकडे जाण्यापासून रोखण्यासाठीच ‘‌लव्ह जिहाद’चा कायदा आणण्यात आला असल्याचे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी येथे व्यक्त केले. एका कार्यक्रमासाठी ते नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते.

मुस्लीम समाजातील मुले हिंदू मुलींना आपल्या प्रेम जाळात अडकवून त्यांना मुस्लीम बनवतात, असे भाजप व संघ विचारधारेतील लोक नेहमी सांगत असतात. याला त्यांनी ‘लव्ह जिहाद’ असे नावसुद्धा दिले आहे. इतकेच नव्हे तर उत्तर प्रदेशातील भाजप सरकारने लव्ह जिहादचा कायदाही केला आहे. यासंदर्भात राजरत्न आंबेडकर यांनी मात्र लव्ह जिहादचा मुस्लिमांशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, हिंदू धर्म सोडून मुस्लीम धर्म स्वीकारणाऱ्यांची संख्या अपवाद सोडली तर फारशी दिसून येत नाही. उलट बौद्ध धम्माची दीक्षा घेणारे हजारोंच्या संख्येने आढळून येतात. अलीकडेच हाथरस हत्याकांड घडले. त्यातील पीडित वाल्मीकी समाजातील ५० सदस्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. बौद्ध धम्माची दीक्षा घेणारे केवळ ५० लोकच होते परंतु ही घटना मोठी होती. वाल्मीकी समाज शेड्यूल कास्ट हिंदू असून तो पारंपरिक सामाजिक रचनेत नेहमीच आपण म्हणून तसे वागणारा आज आपला धर्म सोडून जात असल्याने उत्तर प्रदेशातील भाजप सरकारला मोठा धक्का बसला. त्यामुळेच त्यांनी तडकाफडकी हा कायदा आणल्याचेही राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले. यावेळी राजाभाऊ टाकसाळे उपस्थित हाेते.

बॉक्स

शेतकऱ्यांचे आंदोलन हे लोकशाही वाचवण्यासाठी

केंद्राने केलेला कायदा हा शेतकरी विरोधातच नव्हे तर तो संविधानाच्या विरोधातही आहे. कारण शेती हा राज्याचा विषय असून केंद्राने यात हस्तक्षेप केला आहे. त्यामुळे दिल्लीच्या सिंघू सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन हे आता केंद्र सरकारविरोधात नाही तर ते एकूणच देशाची लोकशाही वाचवण्यासाठी सुरू आहे.

त्यामुळे हे आंदोलन प्रत्येक नागरिकाचे आंदोलन आहे. देशातीलच नव्हे तर जगभरातील बौद्ध व आंबेडकरी समाज या आंदोलकांसोबत आहे, असेही राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले.