शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

लोकांना बौद्ध धम्मात जाण्यापासून रोखण्यासाठीच ‌‘लव्ह जिहाद’चा कायदा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशात मोठ्या प्रमाणावर लोक बौद्ध धम्माकडे आकर्षित होत आहेत. लोकांना विशेषत: मागासवर्गीयांना बौद्ध धम्माकडे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : देशात मोठ्या प्रमाणावर लोक बौद्ध धम्माकडे आकर्षित होत आहेत. लोकांना विशेषत: मागासवर्गीयांना बौद्ध धम्माकडे जाण्यापासून रोखण्यासाठीच ‘‌लव्ह जिहाद’चा कायदा आणण्यात आला असल्याचे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी येथे व्यक्त केले. एका कार्यक्रमासाठी ते नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते.

मुस्लीम समाजातील मुले हिंदू मुलींना आपल्या प्रेम जाळात अडकवून त्यांना मुस्लीम बनवतात, असे भाजप व संघ विचारधारेतील लोक नेहमी सांगत असतात. याला त्यांनी ‘लव्ह जिहाद’ असे नावसुद्धा दिले आहे. इतकेच नव्हे तर उत्तर प्रदेशातील भाजप सरकारने लव्ह जिहादचा कायदाही केला आहे. यासंदर्भात राजरत्न आंबेडकर यांनी मात्र लव्ह जिहादचा मुस्लिमांशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, हिंदू धर्म सोडून मुस्लीम धर्म स्वीकारणाऱ्यांची संख्या अपवाद सोडली तर फारशी दिसून येत नाही. उलट बौद्ध धम्माची दीक्षा घेणारे हजारोंच्या संख्येने आढळून येतात. अलीकडेच हाथरस हत्याकांड घडले. त्यातील पीडित वाल्मीकी समाजातील ५० सदस्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. बौद्ध धम्माची दीक्षा घेणारे केवळ ५० लोकच होते परंतु ही घटना मोठी होती. वाल्मीकी समाज शेड्यूल कास्ट हिंदू असून तो पारंपरिक सामाजिक रचनेत नेहमीच आपण म्हणून तसे वागणारा आज आपला धर्म सोडून जात असल्याने उत्तर प्रदेशातील भाजप सरकारला मोठा धक्का बसला. त्यामुळेच त्यांनी तडकाफडकी हा कायदा आणल्याचेही राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले. यावेळी राजाभाऊ टाकसाळे उपस्थित हाेते.

बॉक्स

शेतकऱ्यांचे आंदोलन हे लोकशाही वाचवण्यासाठी

केंद्राने केलेला कायदा हा शेतकरी विरोधातच नव्हे तर तो संविधानाच्या विरोधातही आहे. कारण शेती हा राज्याचा विषय असून केंद्राने यात हस्तक्षेप केला आहे. त्यामुळे दिल्लीच्या सिंघू सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन हे आता केंद्र सरकारविरोधात नाही तर ते एकूणच देशाची लोकशाही वाचवण्यासाठी सुरू आहे.

त्यामुळे हे आंदोलन प्रत्येक नागरिकाचे आंदोलन आहे. देशातीलच नव्हे तर जगभरातील बौद्ध व आंबेडकरी समाज या आंदोलकांसोबत आहे, असेही राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले.