शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अनफिट वाहनांवर उत्तरासाठी शासनाला शेवटची संधी

By admin | Updated: June 18, 2015 02:25 IST

शहरात हजारो अनफिट वाहने धावत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढल्याचा दावा करणाऱ्या व इतर वाहतूकविषयक

नागपूर : शहरात हजारो अनफिट वाहने धावत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढल्याचा दावा करणाऱ्या व इतर वाहतूकविषयक समस्यांकडे लक्ष वेधणाऱ्या जनहित याचिकेवर उत्तर सादर करण्यासाठी शासनाला बुधवारी शेवटची संधी म्हणून दोन आठवड्यांचा वेळ मंजूर करण्यात आला. परमजितसिंग कलसी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ही याचिका दाखल केली आहे. अनफिट वाहने ताब्यात घेण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे. परंतु, वाहतूक पोलीस निष्क्रिय असल्यामुळे ट्रक, बस, आॅटो, ट्रॅक्टर, टँकर इत्यादी अनफिट वाहने बिनधास्त धावत आहेत. प्रादेशिक परिवहन विभाग दरवर्षी सुमारे ५ हजार कोटी रुपयांचा दंड व शुल्क वसुल करते. यानंतरही विभागाकडे क्रेन, डेटा कार्ड रिडर मशीन, ब्रिथ अ‍ॅनालायझर इत्यादी अत्यावश्यक साधने नाहीत. यामुळे कारवाई करताना अडचणी येतात. कारचालक बेल्ट बांधत नाहीत. शहरात सर्वत्र मोटर वाहतूक कायद्याची पायमल्ली होत आहे. महामार्गांवर वाहने उभी करण्यासाठी विशिष्ट अंतरावर जागा ठेवणे आवश्यक आहे. हा नियम पाळला जात नसल्यामुळे वाहणे रोडवर उभी ठेवली जातात. या वाहनांना धडक बसून अपघात होतात असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अंकुश तिरुख यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)