शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

भाषेला झळाळी अन् साहित्याचे रक्षण व्हावे; साहित्यिकांच्या उमेदवारांकडून अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 10:54 IST

राजकीय पक्ष-उमेदवारांना वैचारिक अधिष्ठान असावे, मराठी भाषेची कळवळ असावी आणि साहित्याच्या रक्षणासाठी व संवर्धनासाठी त्यांच्याकडून प्रयत्न व्हावे... अशी आशा आहे.

ठळक मुद्देगरज वैचारिक अधिष्ठानाची

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साहित्यिक, तसे स्वत:च्या भावविश्वात रमणारे आणि त्यांच्या हातात जो कुणी सापडला, त्यावर थेट प्रहार करणारे म्हणूनच विख्यात आहेत. राजकारण, निवडणुका हे विषय त्यांच्यासाठी कायम शुद्र वाटत आले आहेत. म्हणूनच, या विषयावर बोलणे म्हणजे नुसता वेळ दवडण्यासारखे त्यांना वाटत असते. अशातही त्यांना राजकीय पक्ष-उमेदवारांना वैचारिक अधिष्ठान असावे, मराठी भाषेची कळवळ असावी आणि साहित्याच्या रक्षणासाठी व संवर्धनासाठी त्यांच्याकडून प्रयत्न व्हावे... अशी आशा आहे.साहित्यातून समाजाचे प्रतिबिंब उमटते आणि समाजातील चांगल्या-वाईट गोष्टींचे मंथन करण्याचा मार्ग प्रशस्त होतो. समाज हा साहित्याचा केंद्रबिंदू राहिला आहे आणि प्रत्येक घटनांकडे साहित्यिक आपले लक्ष ठेवून असतो. असे असले तरी राजकारणावर ठामपणे मत मांडणारा साहित्यिक वर्ग अभावानेच दिसून येतो. बऱ्याच साहित्यकृतींमध्ये राजकारण म्हणजे केवळ विडंबनाचा विषय म्हणून पुढे आला आहे. विनोदनिर्मिती किंवा अतिशय कु्रर चेहरा... या दोन परस्पर भिन्न पातळ्यांवरच राजकारणावर साहित्यातून प्रकाश टाकला गेल्याचे बव्हंशी दिसून येते. मात्र, राजकीय पटलावरचे समीक्षण अतिशय उणिवेने साहित्यातून दिसून येते. वैचारिक मतभेद, सौंदर्यबोध होणारे अलंकारिक विषय, सामाजिक गटातटाचे भावविश्व, धार्मिक, आध्यात्मिक विषय हाताळण्यावरच त्यांचा भर राहिला आहे. राजकीय विषय हे त्यांच्यासाठी कायम हीन ठरलेले आहेत. अशात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ मधून असलेल्या अपेक्षा काही साहित्यिकांनी व्यक्त केल्या, त्या महत्त्वाच्या ठरतात.मराठी विद्यापीठाच्या गेली ८५ वर्षे प्रलंबित मागणीसह प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर राजकीय इच्छाशक्तीचे बळ मराठीच्या मागण्यांमागे उभे करण्यात महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीने प्रयत्न केले आहे. गेली ४५ वर्षे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देणे आणि मराठी विद्यापीठ उभारण्याच्या मागणीकडे दुर्लक्षच झाले आहे. एवढा पाठपुरावा करूनही, त्याचा फारसा फरक पडलेला दिसत नाही. उमेदवारांनी आपल्या जाहीरनाम्यात मराठीविषयीच्या सर्व प्रलंबित मागण्यांना स्थान द्यावे आणि तसे स्पष्ट अभिवचन द्यावे, अशी आमची मागणी आहे. जे उमेदवार तसे वचन देतील, त्यांनाच मराठी भाषाप्रेमींनी मतदान केले जावे.- डॉ. श्रीपाद जोशी, माजी अध्यक्ष अ. भा. मराठी साहित्य महामंडळ.

मराठी भाषेची हेळसांड सामान्यांपासून ते राजकीय पक्ष आणि शासनाकडूनही सातत्याने केली जात आहे. मराठी भाषा प्रबळ व्हावी यासाठी लिखित साहित्यासोबतच श्रवणीय उपक्रमांना आधार देण्याचे प्रयत्न सरकारकडून व्हावे. त्यासाठीचे खंबीर आश्वासन उमेदवारांकडून मिळावे, अशी अपेक्षा आहे. मात्र, त्याच त्या जुन्या रटाळगाण्यांमध्ये मतदार आणि उमेदवार दोघेही गुरफटल्याचे दिसून येते. साहित्यसंदर्भात कार्य करणाºया जिल्हास्तरावरील संस्थांना अगदी राज्य शासनापासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत शासकीय योजना पोहोचवून देण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे.श्रीपाद कोठे, ज्येष्ठ साहित्यिक

सांस्कृतिक जाणिवेवर उमेदवारांनी भर द्यावा काही एक-दोन नेते सोडले तर बºयाच खासदार-आमदारांना साहित्य व सांस्कृतिक क्षेत्राबाबत अनास्थाच दिसून येते. मतदारांना हवे असलेली आश्वासने देणे आणि त्या पूर्ण-अपूर्ण ठेवत सत्तेत बसणे, एवढेच त्यांचे कर्तव्य राहिले आहे. त्यासाठी सांस्कृतिक जाणीव असलेला उमेदवार हवा. राजकीय पक्षांनीही तशी जाण त्यांच्यात निर्माण करावी. लोकांसोबत दांडगा संवाद नसल्यानेच, अनेक उमेदवार साहित्य-सांस्कृतिक क्षेत्राकडे दुर्लक्ष करतात. संस्कृतीवर प्रेम दिसून येत नाही. उमेदवार कोणत्याही पक्षाचा का असेना, त्याने आपल्या संस्कृतीबद्दल गोडवे गाण्यास काय हरकत आहे?-अनिल शेंडे, प्रसिद्ध कवी.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019