शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

भूस्खलनाचा धोका!

By admin | Updated: August 9, 2014 00:05 IST

बुलडाणा शहराच्या सिमारेषेवरील वस्त्या धोकेदायक; माळीण गावाच्या पुनरावृत्तीचा धोका.

सिद्धार्थ आराख /बुलडाणाबुलडाणा शहराच्या सिमारेषेवर जवळपास १0 वस्त्या अशा आहेत की एखादी नैसर्गीक आपत्ती आल्यास येथेही पुणे जिल्ह्यातील माळीण गावाची पुनरावृत्ती होऊ शकते. माळीण गावावर डोंगर कोसळल्यामुळे हे गाव पुर्णत: मलब्याखाली गेले. बुलडाणा शहराच्या आजूबाजूला डोंगर दर्‍यामध्ये ज्या वस्त्या आहेत तेथे भुस्सखलन झाल्यास ही घरे दरीमध्ये कोसळण्याची भिती आहे. असे झाल्यास या भागात बचाव पथकाला घटनास्थळावर पोहचणे सुध्दा जिकरीचे होईल.अशी स्थिती या परिसराची आहे. या संभाव्य आपत्तीचा धोका ओळखून प्रशासनाने उपाय योजना करणे गरजेचे आहे. किमान अशा धोकादायक झोपड्या वाढणार नाही याची काळजी प्रशासनाने घेणे आवश्यक झाले आहे. दिवसेंदिवस दरीच्या काठावरील घरांची गर्दी वाढतच आहे.*टेकड्यांची झीज धोकादायकशहराच्या पश्‍चिम व दक्षिणेकडील टेकड्यांची झीज झाली आहे. जुन्या सागर व्हिडीओच्या पाठीमागील भाग, सम्राट अशोक नगरचा काही भाग तर इकडे मुठ्ठे ले-आऊटच्या काही भागातील टेकड्यावर सुध्दा अशी धोकादायक घरे आहेत. तर सागवन रस्त्यावरील टेकड्यावर प्लॉट पाडून लोकांनी घरे बांधली आहेत. असाच प्रकार सुंदरखेड विजय नगर भागासह संगम तलावाच्या काठावर आहे. या भागात सुध्दा अनेकांची घरे टेकड्यांच्या पायथ्याशी गेले आहेत. हा भाग फारसा धोकादायक नसला तरी हळु हळु या टेकड्यांची झीज झाल्यास या घरांना धोका होऊ शकतो. यासाठी रहिवासीयांनी स्वत: पुढाकार घेऊन सुरक्षित स्थळी जाणे गरजेचे आहे.*कपार खोदून बांधली घरेबुलडाणा शहराच्या उत्तरेकडील भागात आतारी नामक वस्ती आहे. वनखात्याच्या जमीनीवर डोंगर दर्‍यामध्ये लोकांनी अवैधरित्या घरे बांधून येथे अतिक्रमण केले आहे. हा परिसर सुध्दा धोकादायक आहे. त्यापुढे हिंदु स्मशानभुमिला लागून अनेक लोकांनी टेकडीच्या पायथ्याशी झोपड्या बांधल्या आहेत. त्याला लागूनच पुढे भीमनगर मधील अनेक नागरीकांनी डोंगर कपार्‍यात अवैध घरे बांधली आहेत. त्यांच्या घरापर्यंत जाणे म्हणजे कसरत करावी लागते. बाजूलाच सिनेमा टॉकीजच्या पाठीमागील भागात सुध्दा टेकड्यांच्या कपार्‍यामध्ये अनेकांची घरे आहेत. *सपाटीकरण करून बांधल्या झोपड्याबुलडाणा शहराच्या पुर्वेकडील भागात क्रांती नगरला लागून असलेल्या कत्तलखान्याच्या पाठीमागे मोठी दरी आहे. या दरीच्या पुढे जंगल आहे. या कत्तलखान्याच्या खाली दरीत आता जमीन सपाट करून लोकांनी अवैधरित्या घरे बांधून वस्ती केली आहे. विशेष म्हणजे या भागात जाण्यासाठी चांगला रस्ता नाही. त्याला लागूनच असलेल्या मिर्झा नगर भागात सुध्दा दरीमध्ये जावाई नगर म्हणून स्वतंत्र वस्ती तयार करण्यात आली आहे.या दरीच्या खालच्या भागात टेकड्यांचे सपाटीकरण करून लोकांनी टीनपत्र्यांची घरे बांधली आहेत. आग लागल्यास किंवा दुर्दैवाने एखादी नैसर्गीक आपत्ती कोसळल्यास या भागात कोणतेही वाहान जावू शकत नाही. रस्ता नाही, नाल्या नाहीत त्यामुळे लोकांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत.*नगर पालिका मात्र अनभिज्ञबुलडाणा पालिकेच्या क्षेत्रात असलेल्या या वस्त्यांची मात्र पालिकेच्या दप्तरी कोणतीही नोंद नाही. अशा धोकादायक वस्त्या आहेत काय? असल्यास त्यांची काय स्थिती आहे. तेथील नागरीकांच्या जिविताला काही धोका होऊ शकतो काय, याची सुध्दा महिती पालिकेला नाही. बुलडाणा नगर पालिका मुख्याधिकारी संजीव ओव्हळ यांनी डोंगर दर्‍यामध्ये अवैधरित्या घरे बांधलेल्या नागरीकांची स्वतंत्र अशी नोंद नसल्याचे सांगीतले. माळीणच्या घटनेनंतर अशा धोकादायक घराची नोंद ठेवण्यासाठी आता स्वतंत्र व्यवस्था करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.