शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

लाेडशेडिंग कधीही, कुठलंही टाइमटेबल नाही; नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2022 21:46 IST

Nagpur News राज्यात दहा वर्षांनंतर पुन्हा सुरू झालेल्या लोडशेडिंगला आता आठवडा होत आला आहे, परंतु अजूनही कुठलाही टाइमटेबल तयार झालेला नाही. नागरिक आधीच त्रस्त आहेत.

नागपूर : राज्यात दहा वर्षांनंतर पुन्हा सुरू झालेल्या लोडशेडिंगला आता आठवडा होत आला आहे, परंतु अजूनही कुठलाही टाइमटेबल तयार झालेला नाही. नागरिक आधीच त्रस्त आहेत. यातच महावितरण लोडशेडिंगच्या नावावर कधी-केव्हाही अर्धा ते दीड तासापर्यंत बत्ती गुल करीत आहे.

विशेष म्हणजे, दहा वर्षांपूर्वी जेव्हा लोडशेडिंग करण्यात आली होती. तेव्हा त्याचा एक टाइमटेबल ठरलेला होता. अर्धी लोडशेडिंग दिवसा व अर्धी सायंकाळी होत होती. राज्य नियामक आयोगाकडेही याची माहिती दिली जात होती, परंतु यावेळी सर्व परिस्थिती बदललेली आहे. कुठलीही वेळ निश्चित नाही. कंपनीच्या अधिकाऱ्यांचा असा तर्क आहे की, अचानक मागणी वाढली व पुरवठा कमी झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तातडीने निर्णय घ्यावा लागला, परंतु आता तर एक आठवडा झाला आहे. महावितरणचे अधिकारीही म्हणत आहेत की, लाेडशेडिंग उन्हाळाभर राहील. अशा परिस्थितीत पूर्वी प्रमाणे लोडशेडिंगचे टाइमटेबल असणे आवश्यक आहे.

गुरुवारी मौदा व सावनेर येथील काही फीडरवर लोडशेडिंग करण्यात आली. अधा तास बत्ती गुल होती, परंतु नागरिकांना याची कुठलीही पूर्व माहिती देण्यात आली नव्हती. नागरिकांचे म्हणणे आहे की, किमान लोडशेडिंगची एक वेळ माहिती झाली, तर नियोजन करण्यास बरे राहील, परंतु महावितरण ऐकायला तयार नाही. कंपनीचे म्हणणे आहे की, ही आपत्कालीन स्थिती आहे. लवकरच समस्या सोडविली जाईल. त्यामुळेच टाइमटेबल तयार नाही.

मौदा-सावनेरमध्ये बत्ती गुल

शुक्रवारी सकाळी मौदा व सावनेरमधील काही फीडरवर लोडशेडिंग झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली. कंपनी सूत्रांचा असा दावा आहे की, जिल्ह्यातील १४ फीडरवर लोडशेडिंग होत आहे. अनेक ठिकाणी दुपारीही लोडशेडिंग करण्यात आली. दरम्यान, वीज खरेदी वाढल्याने परिस्थितीत थोडी सुधारणा झाल्याचा दावा महावितरणने केला आहे.

इंसुलेटर फेल, दक्षिण-पश्चिम नागपुरात अंधार

दक्षिण-पश्चीम नागपुरातील जयताळा व नेल्को सोसायटीमध्ये गुरुवारी रात्री ९ वाजता अचानक बत्ती गुल झाली. यासोबतच रात्रीही लोडशेडिंग सुरू झाल्याची चर्चा पसरली, परंतु या संदर्भात महावितरणने स्पष्ट केले आहे की, इन्सुलेटर फेल झाल्याने वीज गेली होती. जवळपास ८ ट्रान्सफार्मर यामुळे ठप्प झाले होते. इन्सुलेटरची दुरुस्ती केल्यानंतर वीजपुरवठा सुरू करण्यात आला. दरम्यान, यामुळे सुभाषनगर, कामगार कॉलनीपासून तर जयताळापर्यंत अंधार पसरला होता.

टॅग्स :electricityवीज