शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

लाेडशेडिंग कधीही, कुठलंही टाइमटेबल नाही; नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2022 21:46 IST

Nagpur News राज्यात दहा वर्षांनंतर पुन्हा सुरू झालेल्या लोडशेडिंगला आता आठवडा होत आला आहे, परंतु अजूनही कुठलाही टाइमटेबल तयार झालेला नाही. नागरिक आधीच त्रस्त आहेत.

नागपूर : राज्यात दहा वर्षांनंतर पुन्हा सुरू झालेल्या लोडशेडिंगला आता आठवडा होत आला आहे, परंतु अजूनही कुठलाही टाइमटेबल तयार झालेला नाही. नागरिक आधीच त्रस्त आहेत. यातच महावितरण लोडशेडिंगच्या नावावर कधी-केव्हाही अर्धा ते दीड तासापर्यंत बत्ती गुल करीत आहे.

विशेष म्हणजे, दहा वर्षांपूर्वी जेव्हा लोडशेडिंग करण्यात आली होती. तेव्हा त्याचा एक टाइमटेबल ठरलेला होता. अर्धी लोडशेडिंग दिवसा व अर्धी सायंकाळी होत होती. राज्य नियामक आयोगाकडेही याची माहिती दिली जात होती, परंतु यावेळी सर्व परिस्थिती बदललेली आहे. कुठलीही वेळ निश्चित नाही. कंपनीच्या अधिकाऱ्यांचा असा तर्क आहे की, अचानक मागणी वाढली व पुरवठा कमी झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तातडीने निर्णय घ्यावा लागला, परंतु आता तर एक आठवडा झाला आहे. महावितरणचे अधिकारीही म्हणत आहेत की, लाेडशेडिंग उन्हाळाभर राहील. अशा परिस्थितीत पूर्वी प्रमाणे लोडशेडिंगचे टाइमटेबल असणे आवश्यक आहे.

गुरुवारी मौदा व सावनेर येथील काही फीडरवर लोडशेडिंग करण्यात आली. अधा तास बत्ती गुल होती, परंतु नागरिकांना याची कुठलीही पूर्व माहिती देण्यात आली नव्हती. नागरिकांचे म्हणणे आहे की, किमान लोडशेडिंगची एक वेळ माहिती झाली, तर नियोजन करण्यास बरे राहील, परंतु महावितरण ऐकायला तयार नाही. कंपनीचे म्हणणे आहे की, ही आपत्कालीन स्थिती आहे. लवकरच समस्या सोडविली जाईल. त्यामुळेच टाइमटेबल तयार नाही.

मौदा-सावनेरमध्ये बत्ती गुल

शुक्रवारी सकाळी मौदा व सावनेरमधील काही फीडरवर लोडशेडिंग झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली. कंपनी सूत्रांचा असा दावा आहे की, जिल्ह्यातील १४ फीडरवर लोडशेडिंग होत आहे. अनेक ठिकाणी दुपारीही लोडशेडिंग करण्यात आली. दरम्यान, वीज खरेदी वाढल्याने परिस्थितीत थोडी सुधारणा झाल्याचा दावा महावितरणने केला आहे.

इंसुलेटर फेल, दक्षिण-पश्चिम नागपुरात अंधार

दक्षिण-पश्चीम नागपुरातील जयताळा व नेल्को सोसायटीमध्ये गुरुवारी रात्री ९ वाजता अचानक बत्ती गुल झाली. यासोबतच रात्रीही लोडशेडिंग सुरू झाल्याची चर्चा पसरली, परंतु या संदर्भात महावितरणने स्पष्ट केले आहे की, इन्सुलेटर फेल झाल्याने वीज गेली होती. जवळपास ८ ट्रान्सफार्मर यामुळे ठप्प झाले होते. इन्सुलेटरची दुरुस्ती केल्यानंतर वीजपुरवठा सुरू करण्यात आला. दरम्यान, यामुळे सुभाषनगर, कामगार कॉलनीपासून तर जयताळापर्यंत अंधार पसरला होता.

टॅग्स :electricityवीज