शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

लाेडशेडिंग कधीही, कुठलंही टाइमटेबल नाही; नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2022 21:46 IST

Nagpur News राज्यात दहा वर्षांनंतर पुन्हा सुरू झालेल्या लोडशेडिंगला आता आठवडा होत आला आहे, परंतु अजूनही कुठलाही टाइमटेबल तयार झालेला नाही. नागरिक आधीच त्रस्त आहेत.

नागपूर : राज्यात दहा वर्षांनंतर पुन्हा सुरू झालेल्या लोडशेडिंगला आता आठवडा होत आला आहे, परंतु अजूनही कुठलाही टाइमटेबल तयार झालेला नाही. नागरिक आधीच त्रस्त आहेत. यातच महावितरण लोडशेडिंगच्या नावावर कधी-केव्हाही अर्धा ते दीड तासापर्यंत बत्ती गुल करीत आहे.

विशेष म्हणजे, दहा वर्षांपूर्वी जेव्हा लोडशेडिंग करण्यात आली होती. तेव्हा त्याचा एक टाइमटेबल ठरलेला होता. अर्धी लोडशेडिंग दिवसा व अर्धी सायंकाळी होत होती. राज्य नियामक आयोगाकडेही याची माहिती दिली जात होती, परंतु यावेळी सर्व परिस्थिती बदललेली आहे. कुठलीही वेळ निश्चित नाही. कंपनीच्या अधिकाऱ्यांचा असा तर्क आहे की, अचानक मागणी वाढली व पुरवठा कमी झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तातडीने निर्णय घ्यावा लागला, परंतु आता तर एक आठवडा झाला आहे. महावितरणचे अधिकारीही म्हणत आहेत की, लाेडशेडिंग उन्हाळाभर राहील. अशा परिस्थितीत पूर्वी प्रमाणे लोडशेडिंगचे टाइमटेबल असणे आवश्यक आहे.

गुरुवारी मौदा व सावनेर येथील काही फीडरवर लोडशेडिंग करण्यात आली. अधा तास बत्ती गुल होती, परंतु नागरिकांना याची कुठलीही पूर्व माहिती देण्यात आली नव्हती. नागरिकांचे म्हणणे आहे की, किमान लोडशेडिंगची एक वेळ माहिती झाली, तर नियोजन करण्यास बरे राहील, परंतु महावितरण ऐकायला तयार नाही. कंपनीचे म्हणणे आहे की, ही आपत्कालीन स्थिती आहे. लवकरच समस्या सोडविली जाईल. त्यामुळेच टाइमटेबल तयार नाही.

मौदा-सावनेरमध्ये बत्ती गुल

शुक्रवारी सकाळी मौदा व सावनेरमधील काही फीडरवर लोडशेडिंग झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली. कंपनी सूत्रांचा असा दावा आहे की, जिल्ह्यातील १४ फीडरवर लोडशेडिंग होत आहे. अनेक ठिकाणी दुपारीही लोडशेडिंग करण्यात आली. दरम्यान, वीज खरेदी वाढल्याने परिस्थितीत थोडी सुधारणा झाल्याचा दावा महावितरणने केला आहे.

इंसुलेटर फेल, दक्षिण-पश्चिम नागपुरात अंधार

दक्षिण-पश्चीम नागपुरातील जयताळा व नेल्को सोसायटीमध्ये गुरुवारी रात्री ९ वाजता अचानक बत्ती गुल झाली. यासोबतच रात्रीही लोडशेडिंग सुरू झाल्याची चर्चा पसरली, परंतु या संदर्भात महावितरणने स्पष्ट केले आहे की, इन्सुलेटर फेल झाल्याने वीज गेली होती. जवळपास ८ ट्रान्सफार्मर यामुळे ठप्प झाले होते. इन्सुलेटरची दुरुस्ती केल्यानंतर वीजपुरवठा सुरू करण्यात आला. दरम्यान, यामुळे सुभाषनगर, कामगार कॉलनीपासून तर जयताळापर्यंत अंधार पसरला होता.

टॅग्स :electricityवीज