शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

गरिबाचा भूखंड झाला बेपत्ता!

By admin | Updated: April 28, 2016 02:57 IST

अर्धवट उपाशीपोटी राहून, पै पै जमवून एका गरीब व्यक्तीने २७ वर्षांपूर्वी विकत घेतलेला भूखंड बेपत्ता झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशांकडे दुर्लक्ष : तीन महिन्यानंतरही नोंदवला नाही ‘एफआयआर’राहुल अवसरे नागपूरअर्धवट उपाशीपोटी राहून, पै पै जमवून एका गरीब व्यक्तीने २७ वर्षांपूर्वी विकत घेतलेला भूखंड बेपत्ता झाला आहे. तीन महिन्यांपूर्वी या फसवेगिरीची तक्रार होऊनही पोलिसांनी ‘एफआयआर’ नोंदवून न घेता, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दिशानिर्देशांकडे दुर्लक्षच केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने ललिता कुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार या ६८/२००८ क्रमांकाच्या फौजदारी रिट याचिकेत दखलपात्र स्वरूपाचा अपराध दिसत असल्यास प्रथम खबरी अहवाल (एफआयआर) नोंदवणे अनिवार्य आहे, असा निवाडा देऊन दिशानिर्देश दिलेले आहेत. एखाद्या प्रकरणाच्या तक्रारीची चौकशीही सात दिवसांहून अधिक असू नये, विलंबाची वस्तुस्थिती आणि कारणाची नोंद पोलीस ठाण्यातील सामान्य नोंदपुस्तिकेत करणे अनिवार्य आहे, असेही दिशानिर्देशात नमूद करण्यात आलेले आहे.हुडकेश्वर आशीर्वादनगर येथे राहणाऱ्या महादेव व्यंकटी मलपेद्दीवार यांनी १९ एप्रिल १९८९ रोजी श्री शिवशक्ती गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या मौजा सोनेगाव येथील ८३ क्रमांकाचा २७३३ चौरस फुटाचा भूखंड विकत घेतला होता. रोजगारासाठी ते गुजरात राज्यातील सुरत येथे निघून गेले होते. सप्टेंबर २०१५ मध्ये ते नागपुरात परत आले. ते आपला भूखंड पाहण्यास गेले असता, तो बेपत्ता होता. भूखंडावर घर बांधलेले होते. मलपेद्दीवार यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर केला असता, खुद्द संस्थेच्या अध्यक्षाने एका महिलेला हा भूखंड ३ सप्टेंबर १९९४ रोजी विकल्याचे त्यांना समजले. आजच्या बाजारभावाप्रमाणे हा भूखंड एक कोटी रुपयांचा आहे. लागलीच मलपेद्दीवार यांनी १९ जानेवारी २०१६ रोजी सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस आयुक्त, उपायुक्त यांच्याकडेही तक्रारी केल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण जगताप यांनी १८ मार्च २०१६ रोजी मलपेद्दीवार यांना या भूखंडाचे मूळ साक्षांकित कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. ते त्यांनी सादरही केले. जगताप यांनी स्वत:च त्यांचे बयाणही नोंदवून घेतले. परंतु दुर्दैवाने अद्यापही एफआयआरची नोंदच करण्यात आलेली नाही. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेने खुद्द सर्वोच्च न्यायालयाच्या एफआयआर नोंदवण्याच्या दिशानिर्देशांकडे दुर्लक्ष केल्याने एका गरिबावर स्वत:चा भूखंड गमावण्याची पाळी आली आहे.