शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

भूसंपादन केले अन् मोबदलाही परत घेतला

By admin | Updated: June 30, 2015 03:10 IST

‘भामटी- परसोड स्ट्रीट स्कीम’अंतर्गत टाकळी सीम आबादीतील चिंताहर मारोतराव डंभारे यांच्या मालकीचे खसरा क्रमांक २५/४ व

नासुप्रने न्याय द्यावा : भूखंड परत मिळविण्यासाठी ज्येष्ठ नागरिकाचा संघर्ष कमलेश वानखेडे ल्ल नागपूर‘भामटी- परसोड स्ट्रीट स्कीम’अंतर्गत टाकळी सीम आबादीतील चिंताहर मारोतराव डंभारे यांच्या मालकीचे खसरा क्रमांक २५/४ व २५ /५२ येथील भूखंड क्रमांक १, २ व ३ संपादित करण्यात आले. मात्र, संबंधित जागेवर महापालिकेने संरक्षण भिंत बांधल्याच्या कारणावरून नासुप्रने संबंधित भूखंड नियमित केलेले नाहीत. आपले भूखंड परत मिळविण्यासाठी धरमपेठच्या डॉ. आंबेडकरनगर येथील रहिवासी असलेले ज्येष्ठ नागरिक डंभारे नासुप्रच्या चकरा मारत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समाधान शिबिरातही त्यांनी दाद मागितली. मात्र, नासुप्रकडून त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. नासुप्रचे म्हणणे आहे की सध्या या भूखंडांवर महापालिकेने संरक्षण भिंत बांधली आहे व ही जमीन सध्या बुद्धविहाराच्या ताब्यात आहे. महापालिकेने या जागेवर भिंतीचे बांधकाम केले असल्यामुळे संबंधित भूखंड आता नियमित होऊ शकत नाही, असे नासुप्रचे म्हणणे आहे. महापालिकेच्या संरक्षण भिंतीमुळे संबंधित भूखंडांचे नियमितीकरण होऊ शकले नाही. मात्र, भूखंड नियमित करण्यास महापालिकेने कुठलाही आक्षेप घेतलेला नाही. उलट याबाबतचे सर्व अधिकार नासुप्रला दिलेले आहेत. डंभारे यांनी संबंधित भिंत तोडण्यासाठी महापालिकेचे कार्यकारी अभियंता (स्लम) यांच्याकडे नोव्हेंबर २०११ मध्ये विनंती अर्ज केला होता. त्यावार महापालिकेने या जागेचा ताबा नासुप्रकडे असल्याचे सांगत त्यांनी आपल्या स्तरावर तोडगा काढावा, मनपातर्फे काहीही हरकत राहणार नाही, असा अभिप्राय दिला होता. यानंतर २९ डिसेंबर २०१४ रोजी नासुप्रने टाकळी सीम बुद्धविहार कमिटीला वरील जागेचे मालकी हक्काबाबतचे पंजीबद्ध दस्तावेज सादर करण्यासाठी पत्राद्वारे कळविले. मात्र, बुद्धविहार कमिटीने अद्याप दस्तावेज सादर केलेले नाहीत. मात्र, यानंतरही नासुप्र संबंधित भूखंडांवर निर्णय घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. नासुप्र अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे त्यावेळी संबंधित भूखंड संपादित करण्यात आले. त्यामुळे संबंधित भूखंड ‘सी. एम. फाम्युर्ला’ अंतर्गत नियमित करून देण्यासाठी नासुप्रने १६ फेब्रुवारी १९८४ रोजी डंभारे यांना पत्र दिले. या पत्रातील अटीप्रमाणे डंभारे यांनी अवॉर्डवर स्वाक्षरी केली व भूखंडाचा ताबा नासुप्रला दिला. सोबतच मिळालेली मोबदल्याची रक्कमही नासुप्रमध्ये जमा करण्यात आली. त्याची पावतीही देण्यात आली. सद्यस्थितीत डंभारे यांच्या हातून त्यांचे तिन्ही भूखंडही गेले आहेत व या भूखंडांचा मिळालेला मोबदलाही गेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भूखंड परत मिळविण्यासाठी डंभारे यांचा संघर्ष सुरू आहे. मात्र, नासुप्रची यंत्रणा त्यांचे ‘समाधान’करण्यात पुढाकार घेताना दिसत नाही.