शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

तज्ज्ञ समिती अभावी रखडलेय मराठी भाषा विद्यापीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:09 IST

- मराठी भाषा दिवस : विद्यापीठाचा ठराव ८ वर्षांपूर्वीच झाला होता पारित - २५ वर्षांचा मराठी भाषाविषयक आराखडा कधी ...

- मराठी भाषा दिवस : विद्यापीठाचा ठराव ८ वर्षांपूर्वीच झाला होता पारित

- २५ वर्षांचा मराठी भाषाविषयक आराखडा कधी होणार कार्यान्वित?

प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कुसुमाग्रस उपाख्य वि. वा. शिरवाडकर यांची जयंती (२७ फेब्रुवारी) ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ नुसार घेतला गेला. त्याहीपूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा व मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ असावे, असा प्रस्ताव ८५-८६ वर्षांपूर्वी नागपुरात पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पारित झाला होता. त्यानंतर शासकीयदृष्ट्या न्यायमूर्ती चपळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या तज्ज्ञांच्या भाषा सल्लागार समितीत १ फेब्रुवारी २०१३ रोजी मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेचा ठराव पारित झाला. मात्र, या ठरावाला अडथळा पडला आहे तो मराठी भाषा विद्यापीठ तज्ज्ञ समितीच्या नेमणुकीचा. उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत मिळालेल्या या निर्देशांची अंमलबजावणी गेल्या ८ वर्षांपासून खुद्द विभागानेच केलेली नाही. या समितीअभावी मराठी भाषा विद्यापीठ रखडले आहे.

संस्कृत, हिंदी, ऊर्दूसोबतच देशात प्रादेशिक भाषांची स्वतंत्र अशी विद्यापीठे आहेत. भाषा विद्यापीठांच्या स्थापनेचा हेतू भावीपिढीला भाषा साहित्यासोबतच, भाषेशी संबंधित तत्त्वज्ञान, कला व संस्कृतीचे अध्ययन करण्याचे हक्काचे केंद्र निर्माण व्हावे, हा आहे. मात्र, शासन-प्रशासनाला या हेतूचे वावडे असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा, ही मागणी मोठी आहे. केंद्र सरकारच्या भात्यात हा विषय अडकला आहे. त्याला जबाबदार कोण, हा विषय आगळा. मात्र, मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेकडे कानाडोळा करणे किंवा अडथळे निर्माण करण्यामागे काय साधले जात आहे, हा प्रश्न अनुत्तरित आहे. सन २०१३ नंतर मराठी भाषा विद्यापीठाचा विषय भाषा सल्लागार समितीच्या प्रत्येक सभेत चर्चिला गेला. विद्यापीठाच्या स्थापनेसाठी त्याचा लेखाजोखा, अर्थसंकल्प, स्वरूप याबाबत तज्ज्ञ समितीची नेमणूक करावी, असा आदेशही निर्गमित झाला. त्यासाठी वेळोवेळी महाराष्ट्रभरातील भाषातज्ज्ञांची नावे सुचविली गेली. मात्र, दिरंगाईच्या वृत्तीने ही नावे कधीच अंतिम धरण्यात आली नाही. त्याचा फटका मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेला बसतो आहे. विशेष म्हणजे, २०१४ मध्ये भाषा विभागाच्या सूचनेनुसार नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समितीने २५ वर्षांसाठीचा मराठी भाषाविषयक आराखडा सादर केला आहे. त्यात मराठी विद्यापीठाला महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, तज्ज्ञांची समितीच नेमली गेली नसल्याने हा आराखडा अडगळीत पडल्याचे दिसून येते.

----------------

समितीने भाषा धोरण कधीचेच सादर केले. मराठी विद्यापीठ स्वतंत्ररित्या उभारणे गरजेचे आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई त्यासाठी अनुकूल आहेत. आता तो निर्णय शासन-प्रशासन स्तरावर लवकरच घेतला जाईल, अशी अपेक्षा आहे.

- डॉ. दिलीप धोंडगे, अध्यक्ष - भाषा सल्लागार समिती, भाष संचालनालय

-------------

देशभरातील भाषा विद्यापीठांना भेटी देऊन त्यांचा कारभार कसा चालतो, आराखडा कसा असतो आणि सर्व बाबींचा अभ्यास करण्यासाठी मराठी भाषा विद्यापीठ तज्ज्ञ समितीची नेमणूक करायची होती. ही समिती नंतर विद्यापीठासंदर्भात बृहद आराखडा राज्य शासनाकडे सादर करणार होती. मात्र, अद्याप ही समितीच गठीत झालेली नाही.

- डॉ. राजेंद्र नाईकवाडे, सदस्य - भाषा सल्लागार समिती, भाष संचालनालय

-----------

समितीवर विदर्भातून चार सदस्य

मराठी भाषा सल्लागार समितीची नवी नियुक्ती २६ डिसेंबर २०१८ रोजी झाली. २ फेब्रुवारी २०१९ रोजी या नवनियुक्त समितीची पहिली सभा पार पडली. या सभेतही मराठी विद्यापीठाचा मुद्दा जोरकसपणे मांडण्यात आला होता. या ३६ जणांच्या समितीवर अमरावतीचे विष्णू सोळंकी, यवतमाळचे विवेक कवठेकर, नागपूरचे डॉ. कुमार शास्त्री व डॉ. राजेंद्र नाईकवाडे सदस्य म्हणून आहेत.

............