शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधीची जमीन गमावली

By admin | Updated: February 20, 2016 03:31 IST

कोट्यवधीच्या सरकारी जमीन घोटाळ्याप्रकरणी दिवाणी न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध राज्य सरकार अपिलात गेले नाही.

शासकीय यंत्रणेचा निष्काळजीपणा : तीन सूत्रधार दोषमुक्तनागपूर : कोट्यवधीच्या सरकारी जमीन घोटाळ्याप्रकरणी दिवाणी न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध राज्य सरकार अपिलात गेले नाही. फौजदारी न्यायालयाचा निर्णय दिवाणी न्यायालयाला बंधनकारक नाही, मात्र दिवाणी न्यायालयाचा निर्णय फौजदारी न्यायालयाला बंधनकारक असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा असल्याने तेरा वर्षांपूर्वी गाजलेल्या शासकीय जमीन घोटाळ्यातील तीन सूत्रधारांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयाने दोषमुक्त (डिस्चार्ज) केले. या निर्णयाविरुद्धही सरकारी यंत्रणेची कोणतीही हालचाल नसल्याने सरकारला या जमिनीवर पाणी फेरावे लागणार, असे दिसत आहे. नरेश ठाकरे रा. पांडे ले-आऊट खामला, नीलेश मेहता आणि मनीष मेहता दोन्ही रा. रामदासपेठ, अशी दोषमुक्त ठरवण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ६ जून २००३ रोजी सदर पोलीस ठाण्यात दाखल या सरकारी जमीन घोटाळ्यात एकूण १४ आरोपी होते. त्यापैकी महिपत तंत्रपाळे रा. राहुलनगर आणि कहीपत तंत्रपाळे रा. जाटतरोडी, हे मरण पावले. गंगाधर गाडगे हा अद्यापही फरार आहे. नरेश ठाकरेसह तिघे दोषमुक्त झाले. तलाठी राजेंद्र मेश्राम, राजश्री ठाकरे, तहसीलदार रवींद्र खजांजी, सहदेव खराबे, सचिन पाटोळे, श्याम सोनटक्के, विनोद दुबे आणि योगेश करडे, या आठ आरोपीविरुद्ध न्यायालयात खटला प्रलंबित आहे.तहसीलदार विजया बनकर यांच्या तक्रारीवरून या सर्व १४ आरोपींविरुद्ध भादंविच्या ४०९, ४२०, ४६८, ४७१, १२० (ब), ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरण असे की, मौजा अजनी येथील सर्वे ४६/१ मधील ०.२२ आराजी, ४७/१,४७/२, ४७/३ मधील ०.३२ आराजी, ५६/१ मधील ०.१४ आराजी, १०९/३ मधील ०.१५ आराजी, मौजा खामला येथील सर्वे ८४, ८५, ८६/२ मधील ०.४२ आराजी, ९७/२ मधील ०.२० आराजी, ३५/१, ३५/२ या झुडपी जंगलाचा पोट हिस्सा, सर्वे ३५/२३ मधील ०.२० आराजी, मौजा लेंढरा येथील सर्वे २६२/१ मधील ०.१४, या जमिनींचा सातबारा आणि अधिकार अभिलेखांमध्ये तसेच मालकी हक्काच्या मूळ अभिलेखांमध्ये मुख्य सूत्रधार नरेश ठाकरे याने तहसीलदार आणि तलाठ्यांच्या संगनमताने खोडतोड आणि ओव्हर लिखाण करून खोटे अभिलेख तयार केले. त्याने शासनाची आणि रघुजी राजे भोसले यांची एकूण २३ हजार ९०० चौरस मीटर जमीन हडपली. मनीष मेहता आणि नीलेश मेहता यांनी या जमिनींच्या खरेदीचा व्यवहार करून त्या स्वत:च्या नावे करून घेतल्या. त्यावेळी ही जमीन अंदाजे तीन कोटींची होती.२००० ते २००१ या काळात झालेल्या कोट्यवधीच्या सरकारी जमीन घोटाळ्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक टी.के. नितनवरे यांनी करून २९ जुलै २००५ रोजी आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात एकूण ४० साक्षीदार होते. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरूच असताना आरोपी नरेश ठाकरे याने २००३ मध्येच दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. १८ जानेवारी २०११ रोजी या दाव्याचा निकाल लागून न्यायालयाने नरेश ठाकरे याला या सर्व जमिनींचा अधिकृत मालक म्हणून घोषित केले होते. २०११ मध्ये ठाकरे याने दाखल केलेल्या अन्य एका दाव्याचा १५ डिसेंबर २०१४ रोजी त्याच्याच बाजूने निकाल लागून त्याला वादग्रस्त जमिनीचा मालक म्हणून घोषित करण्यात आले. राज्य सरकारची यंत्रणा महसूल विभागानेही २८ आॅक्टोबर २००९ रोजी वादग्रस्त जमिनीच्या नामांतरण संदर्भातील महसूल अपील मंजूर केले होते. सक्षम दिवाणी न्यायालयाने नरेश ठाकरे याला वादग्रस्त जमिनींचा मालक जाहीर करूनही राज्य सरकारने या निर्णयाला कोणत्याही न्यायालयात आव्हान दिले नाही. त्यामुळे दिवाणी न्यायालयाच्या निर्णयाला अंतिम स्वरूप प्राप्त झाले. दिवाणी न्यायालयाचा निर्णय फौजदारी न्यायालयाला बंधनकारक असल्याने न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयाने २३ डिसेंबर २०१५ रोजी नरेश ठाकरे याला दोषमुक्त केले. नरेश ठाकरे याने नीलेश मेहता आणि मनीष मेहता या दोघांना खरे आरोपी असल्याचे आणि त्यांनीच हा घोटाळा केल्याचे सांगितले. परंतु न्यायालयाला त्यांच्याविरुद्ध पुरावे न आढळल्याने केवळ समानतेच्या आधारावर न्यायालयाने त्यांनाही दोषमुक्त केले. राज्य सरकार आणि राजे भोसले यांच्या मालकीची कोट्यवधीची ही जमीन हडपली जात असताना सरकार गप्प का, असा सवाल निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)