शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
3
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
4
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
5
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
6
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
7
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
8
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
9
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
10
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
11
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
12
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
13
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
14
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
15
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
16
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
17
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
18
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
19
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
20
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...

बाबासाहेबांच्या विचारांतूनच कामगार चळवळ सक्षम

By admin | Updated: January 30, 2016 03:16 IST

देशात कामगार चळवळ ही सध्या सर्वात दुर्लक्षित असून ती सक्षम करायची असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन १९३६ च्या विचारांतून प्रेरणा घेऊन करण्याची गरज आहे,

रूपा कुळकर्णी : स्मारक समिती दीक्षाभूमीतर्फे जयंती महोत्सव नागपूर : देशात कामगार चळवळ ही सध्या सर्वात दुर्लक्षित असून ती सक्षम करायची असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन १९३६ च्या विचारांतून प्रेरणा घेऊन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कामगार चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या आणि मोलकरीण संघटनेच्या नेत्या डॉ. रूपा कुळकर्णी-बोधी यांनी येथे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीतर्फे जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे याअंतर्गत दीक्षाभूमी येथील आंबेडकर महाविद्यालयाच्या ना.ह. कुंभारे सभागृहात आयोजित व्याख्यानमालेत त्या मार्गदर्शन करीत होत्या. अध्यक्षस्थानी समाजवादी विचारवंत लीलाताई चितळे होत्या. स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, सचिव सदानंद फुलझेले, सदस्य व्ही.टी. चिकाटे, एन.आर. सुटे, विलास गजघाटे, डॉ. सुधीर फुलझेले, प्राचार्य डॉ. पी.सी. पवार, संचालिका डॉ. मालती रेड्डी, डॉ. प्रकाश खरात व्यासपीठावर होते. डॉ. कुळकर्णी म्हणाल्या, कामगार वर्गामध्ये सम्यक क्रांती करण्याची ताकद आहे हे सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच जाणले. त्यांच्या कामगार चळवळीत आजच्या व असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याचे उपायसुद्धा सापडतात. त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये देशातील सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रश्नांची उत्तरे होती. आज अशा कृतींची देशाला गरज आहे. बाबासाहेबांनी आपल्या हयातीत आदर्श अशी मजूर संघटना चालवून दाखविली. कामगार चळवळ आणि जाती निर्मूलन यापैकी जाती निर्मूलन हा पर्याय त्यांना जीवनकार्य म्हणून प्राधान्याने निवडावा लागला. तरी कामगार चळवळीमध्ये त्यांचे योगदान कुणापेक्षाही कमी नाही. डॉ. गौतम कांबळे, डॉ. मोहन वानखेडे यांनी संयोजन केले. डॉ. शैलेश बहादुरे यांनी संचालन तर प्रा. विकास सिडाम यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)बाबासाहेबांचा लढा हा सर्वंकष क्रांतीचा लीलाताई चितळे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या, देशाला मिळालेले स्वातंत्र्य ही अजरामर सामूहिक कृती आहे. बाबासोहबांच्या समताधिष्ठित विचाराने हा देश आज उभा झाला हे लक्षात घेणे आवश्यक आहे. आपण बाबासाहेबांना केवळ पुतळ्यांमध्ये अडकवून न ठेवता संविधानाप्रत समाज निर्माण करण्याची कास धरली पाहिजे अन्यथा जातीवादाचा व धर्मांधतेचा गढूळ प्रवाह सहजासहजी जाणार नाही. बाबासाहेबांचा लढा हा कार्ल मार्क्सच्या पुढच्या क्रांतीचा म्हणजेच सर्वंकष क्रांतीचा होता. तो जेवढा भोतिक होता तेवढाच तो सांस्कृतिक होता. म्हणजे समाजामध्ये माणुसकी निर्माण करणारा होता.