शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कोराडी पर्यावरण जनसुनावणी; विराेधकांना टार्गेट करण्यासाठी आणले भाड्याने लाेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2023 19:47 IST

Nagpur News काेराडी वीज केंद्रात नव्याने प्रस्तावित दाेन प्रकल्पांच्या जनसुनावणीत विराेधकांना टार्गेट करण्यासाठी व प्रकल्पाला समर्थन दर्शविण्यासाठी भाड्याने लाेकांना आणण्यात आल्याचा गंभीर आराेप पर्यावरणवाद्यांनी केला.

नागपूर : काेराडी वीज केंद्रात नव्याने प्रस्तावित दाेन प्रकल्पांच्या जनसुनावणीत विराेधकांना टार्गेट करण्यासाठी व प्रकल्पाला समर्थन दर्शविण्यासाठी भाड्याने लाेकांना आणण्यात आल्याचा गंभीर आराेप पर्यावरणवाद्यांनी केला. सकाळपासून सुनावणीस्थळी आलेल्या या लाेकांनी समाेर गर्दी केली. पर्यावरणवाद्यांना जागा मिळू दिली नाही, त्यांना बाेलू दिले गेले नाही. काहींना बाेलण्याची संधी मिळाली पण त्यावेळी समर्थक म्हणून आलेल्या या आणलेल्या कार्यकर्त्यांनी ‘हुटिंग’ करून बाेलण्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला.

विविध पर्यावरण संस्थांमधून आलेले सुधीर पालिवाल, लीना बुद्धे, अनसूया काळे-छाबरानी, नितीन राेंघे, संदेश सिंगलकर, दिनेश नायडू यांनी मंगळवारी पत्रपरिषदेच्या माध्यमातून सुनावणीदरम्यान झालेल्या प्रकाराचा निषेध केला. आणलेले कार्यकर्ते कंत्राटदाराचे हाेते की कुणाचे, हे सामान्य लाेकांना माहिती आहे. मात्र महिलांना शिविगाळ करणे, प्रकल्पाचा विराेधात मते मांडणाऱ्यांची हुटिंग करण्याचा प्रकार सुनावणीत झाल्याचे अनसूया काळे यांनी सांगितले. याबाबत जिल्हाधिकारी व पाेलिसांना तक्रारही केली पण त्यांच्यावर कारवाई झाली नाही. ही सर्व यंत्रणा कुठल्या तरी दबावात कार्य करीत असल्याचा आराेप छाबरानी यांनी केला.जनसुनावणी पर्यावरणाच्या विषयावर हाेती आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आयाेजित केली हाेती. मात्र प्रदूषण व पर्यावरणाचे मुद्दे सुनावणीतून गायब हाेते. पर्यावरण असेसमेंटचा अहवाल तयार करणारे व्यक्ती सुनावणीत हजर झाले नाही. महाजेनकाेचे प्रतिनिधी उपस्थित झाले नाहीत. पर्यावरणाच्या सुनावणीत राेजगाराच्या मुद्द्याला हवा देण्यात आली. आधीच्या प्रकल्पात राेजगार मिळाला नसताना या प्रकल्पातून राेजगार मिळण्याचे आमिष दाखवून प्रकल्पाच्या समर्थनासाठी त्यांची दिशाभूल करण्यात आल्याचा आराेप दिनेश नायडू यांनी केला.

सुनावणी बेकायदेशीर का?

- पर्यावरणावरील सुनावणी वीज प्रकल्पाच्या परिसरात घेता येत नाही. मात्र नियम डावलून काेराडी प्रकल्पाच्या परिसरात सुनावणी घेतली.- सुनावणी करताना नागपूर शहराचे मनपा आयुक्त, नासुप्र चेअरमन, एनएमआरडीएचे अधिकारी व सर्व प्रभावित ग्रामपंचायच्या पदाधिकाऱ्यांना बाेलाविणे गरजेचे हाेते. मात्र तसे केले नाही.

- जनसुनावणीची माहिती सामान्य जनतेपर्यंत पाेहचविण्यासाठी प्रचार-प्रसार करण्यात आला नाही.- नवतपा किंवा अधिक तापमान हे विदर्भावरील संकट आहे व संकटाच्या काळात सुनावणी घेता येत नाही, तरीही ती घेण्यात आली.

- प्रकल्पाचा अहवाल तयार करणारे उपस्थित नव्हते व कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्यात आले नाही.- त्यामुळे ही सुनावणी बेकायदेशीर असून ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी नितीन राेंघे व संदेश सिंगलकर यांनी केली. याविराेधात न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला.

विराेधात बाेलणारे समर्थनात आले कसे?

लीना बुद्धे यांनी सांगितले, वर्षभरापूर्वी संस्थेने वीज प्रकल्पामुळे झालेल्या प्रदूषणाचा अभ्यास करण्यासाठी सर्वेक्षण केले तेव्हा अनेक ग्रामस्थ व विविध गावच्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी प्रदूषणामुळे प्रचंड त्रास हाेत असल्याच्या भावना मांडल्या हाेत्या. त्याचे व्हिडीओसुद्धा आहेत. मात्र तेच लाेक सुनावणीत प्रकल्पाच्या समर्थनात उभे झाल्याचे आश्चर्य बुद्धे यांनी व्यक्त केले. या लाेकांवर कुठलातरी दबाव टाकण्यात आल्याची शंका त्यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :koradi damकोराडी प्रकल्पPoliticsराजकारण