शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
2
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
3
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
4
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
5
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
8
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
9
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
10
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
11
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
12
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
13
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
14
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
15
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
16
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
17
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
18
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
19
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
20
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!

कुशच्या मारेकऱ्याची तिहेरी जन्मठेप कायमच

By admin | Updated: March 12, 2016 03:13 IST

बहुचर्चित नंदनवन येथील कुश कटारिया या शाळकरी मुलाच्या अपहरण व निर्घृण हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायायालयाचे न्यायमूर्ती ...

सर्वोच्च न्यायालय : आयुष पुगलियाची याचिका फेटाळली नागपूर : बहुचर्चित नंदनवन येथील कुश कटारिया या शाळकरी मुलाच्या अपहरण व निर्घृण हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायायालयाचे न्यायमूर्ती पी. सी. घोष आणि न्या. अमितवा रॉय यांच्या खंडपीठाने आरोपीची विशेष अनुमती याचिका फेटाळून उच्च न्यायालयाने सुनावलेली तिहेरी जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. आयुष नरेश पुगलिया (२५), असे आरोपीचे नाव असून तो नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवरी ले-आऊट शांतीनाथ अपर्टमेंट येथील रहिवासी आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. जे. अकर्ते यांच्या न्यायालयाने ४ एप्रिल २०१३ रोजी आयुष पुगलिया याला भादंविच्या ३६४ कलमांतर्गत जन्मठेप, एक हजार रुपये दंड, ३०२ कलमांतर्गतही जन्मठेप आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. भादंविच्या २०१ (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत दोन वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. जन्मठेपेच्या दोन्ही शिक्षा एकामागे एक भोगाव्या लागतील, असेही न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले होते. या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान म्हणून आरोपी आयुष पुगलिया याने फौजदारी अपील दाखल केले होते. सरकार पक्ष आणि फिर्यादीकडून आरोपीच्या शिक्षेत वाढ करून फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी यासाठी अपील दाखल करण्यात आले होते. २२ जून २०१५ रोजी न्यायालयाने दोन्ही अपील फेटाळून लावत सत्र न्यायालयाने आरोपीला सुनावलेली शिक्षा कायम ठेवली. या शिवाय भादंविच्या ३६४-ए कलमांतर्गत आणखी एका जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आरोपी आयुष पुगलिया याला तिहेरी जन्मठेप सुनावण्यात आली होती.आयुष पुगलिया याने उच्च न्यायालयाने सुनावलेल्या तिहेरी जन्मठेपेच्या शिक्षेविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. राज्य सरकारने आणि फिर्यादी प्रशांत कटारिया यांनी आरोपीच्या शिक्षेत वाढ करून फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, यासाठी विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. या सर्व विशेष अनुमती याचिकांवर सुनावणी होऊन फेटाळण्यात आल्या.अपहरण करून केली होती कुशची हत्याकुशच्या मारेकऱ्याची तिहेरी जन्मठेप कायमचनागपूर : आरोपी आयुष नरेश पुगलिया आणि आठ वर्षीय शाळकरी मुलगा कुश प्रशांत कटारिया हे नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवरी ले-आऊट येथील शांतिनाथ अपार्टमेंट या एकाच वसाहतीत राहत होते. दोघांचेही फ्लॅट आमोरासमोर होते. कुशचे वडील प्रशांत कटारिया हे कळमना येथे मिरची दलाल आहेत. आयुषने दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी ११ आॅक्टोबर २०११ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास खाऊचे आमिष दाखवून कुशचे अपहरण केले होते. अपहरणानंतर आरोपीने कुशची आई छाया हिला फोनवर दोन कोटीच्या खंडणीची मागणी करून कुशला ठार मारण्याची धमकी दिली होती. आयुषने निष्पाप कुशला कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सूर्यनगर येथील लता मंगेशकर उद्यानानजीकच्या अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीमध्ये नेले होते. या ठिकाणी कुशच्या डोक्यावर विटेने प्रहार करून त्याचा निर्घृणपणे खून केला होता. त्यानंतर मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून आरोपी पसार झाला होता. १२ आॅक्टोबर २०११ रोजी प्रशांत कटारिया यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात आपला मुलगा कुशच्या अपहरणाची तक्रार नोंदवली होती. त्यानुसार नंदनवन पोलिसांनी आयुषविरुद्ध भादंविच्या ३६३, ३६४-ए, ३६८, १२०-ब कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. लागलीच आयुषला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्याने दिलेल्या कबुलीवरून १४ आॅक्टोबर रोजी कुशचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला होता. त्यानंतर भादंविच्या ३०२, २०१ या कलमांची वाढ करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक सुनील जयस्वाल यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सत्र न्यायालयात हा खटला विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम तसेच फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी चालविला होता. (प्रतिनिधी)