शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

‘किसान रेल्वे’तून विदर्भातील ६ हजार टन माल निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक कमी वेळेत व्हावी यासाठी ‘ऑपरेशन ग्रीन’अंतर्गत किसान रेल्वे सुरू करण्यात आली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक कमी वेळेत व्हावी यासाठी ‘ऑपरेशन ग्रीन’अंतर्गत किसान रेल्वे सुरू करण्यात आली आहे. यामुळे विदर्भातील शेतकरी व विशेषत: संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी सोय झाली. अडीच महिन्यांतच किसान रेल्वेच्या माध्यमातून विदर्भातील ६ हजार टनांहून अधिक माल निर्यात करण्यात आला व केवळ संत्र्याच्या मालवाहतुकीतून रेल्वेला सुमारे दोन कोटींचा महसूल प्राप्त झाला. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मध्य रेल्वेला विचारणा केली होती. ‘ऑपरेशन ग्रीन’अंतर्गत नागपुरातून किती माल बाहेर पाठविण्यात आला, रेल्वे वाहतुकीतून किती महसूल प्राप्त झाला आदी प्रश्न त्यांनी विचारले होते. मध्य रेल्वेकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयातर्फे ‘ऑपरेशन ग्रीन’ सुरू करण्यात आले. किसान रेल्वेतून माल पाठविल्यास शेतकऱ्यांना वाहतूक खर्चात ५० टक्के सवलत मिळेल, असे १३ ऑक्टोबर रोजीच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले. लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे १४ ऑक्टोबरपासून किसान रेल्वे सुरू झाली. त्यानंतर ३१ डिसेंबरपर्यंत ६ हजार १७९ टन मालाची वाहतूक करण्यात आली. मध्य रेल्वेला त्यातून १ कोटी ९९ लाखांचा महसूल प्राप्त झाला.

नागपूर, अमरावती, वर्धा या तीन जिल्ह्यांतील हजारो हेक्टर क्षेत्रांवर संत्र्याचे पीक घेतले जाते. याशिवाय, विदर्भात फळे व भाज्यांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते. हा माल एरवी प्रामुख्याने ट्रकद्वारे राज्यात व देशात विविध ठिकाणी पाठवला जातो. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत ‘ऑपरेशन ग्रीन’ हाती घेण्यात आले व त्यात किसान रेल्वेची व्यवस्था करण्यात आली होती.