शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

३ मार्चपासून किसान ब्रिगेडची विदर्भात किसान जागृती यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:07 IST

नागपूर : देशातील दिल्लीपासून दूर असलेली राज्ये आणि तेथील शेतकरी व सर्वसामान्य जनता दिल्लीतील आंदोलनासोबत आहे. मात्र कोरोनाचा बागुलबुवा ...

नागपूर : देशातील दिल्लीपासून दूर असलेली राज्ये आणि तेथील शेतकरी व सर्वसामान्य जनता दिल्लीतील आंदोलनासोबत आहे. मात्र कोरोनाचा बागुलबुवा दाखवीत रेल्वे आणि सर्व वाहतूक बंद ठेवून सरकार जनतेला आंदोलनापासून दूर ठेवू पाहत आहे. केंद्राने पारित केलेल्या तीन कायद्याची शेतकरी विरोधी बाजू सांगण्यासाठी ३ मार्चपासून किसान ब्रिगेड विदर्भात किसान जनजागृती सायकल यात्रा काढणार आहे.

किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अविनाश काकडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी किसान ब्रिगेडचे प्रकाश पोहरे प्रामुख्याने उपस्थित होते. काकडे म्हणाले, सिंदखेडराजाहून ही यात्रा प्रारंभ होईल. यात युवक, शेतकरी सहभागी असतील. या काळामध्ये सरकारने राज्यात लॉकडाऊन लावले तरी यात्रा थांबणार नाही, हवे तर सरकारने आम्हाला अटक करावी, असा इशारा त्यांनी दिला. ९० दिवस लोटूनही सरकार कायदे मागे घ्यायला तयार नाही. उलट शेतकऱ्यांची नाकाबंदी करीत आहे. खलिस्तानी व देशद्रोह्यांचे आंदोलन म्हणत बदनाम करीत आहे. ही बाजू सांगण्यासाठी ९०० किलोमीटरचा प्रवास १५ दिवस करत मार्गातील गावांमध्ये जनजागृती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला आरटीआय कार्यकर्ता मोनित जबलपुरे, निवृत्त सैनिक शेषराव मरोडिया आणि राजू मिश्रा उपस्थित होते.