शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
3
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
6
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
7
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
8
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
9
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
10
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
11
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
12
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
13
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
14
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
15
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
16
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
17
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
18
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
19
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
20
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद

३ मार्चपासून किसान ब्रिगेडची विदर्भात किसान जागृती यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:07 IST

नागपूर : देशातील दिल्लीपासून दूर असलेली राज्ये आणि तेथील शेतकरी व सर्वसामान्य जनता दिल्लीतील आंदोलनासोबत आहे. मात्र कोरोनाचा बागुलबुवा ...

नागपूर : देशातील दिल्लीपासून दूर असलेली राज्ये आणि तेथील शेतकरी व सर्वसामान्य जनता दिल्लीतील आंदोलनासोबत आहे. मात्र कोरोनाचा बागुलबुवा दाखवीत रेल्वे आणि सर्व वाहतूक बंद ठेवून सरकार जनतेला आंदोलनापासून दूर ठेवू पाहत आहे. केंद्राने पारित केलेल्या तीन कायद्याची शेतकरी विरोधी बाजू सांगण्यासाठी ३ मार्चपासून किसान ब्रिगेड विदर्भात किसान जनजागृती सायकल यात्रा काढणार आहे.

किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अविनाश काकडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी किसान ब्रिगेडचे प्रकाश पोहरे प्रामुख्याने उपस्थित होते. काकडे म्हणाले, सिंदखेडराजाहून ही यात्रा प्रारंभ होईल. यात युवक, शेतकरी सहभागी असतील. या काळामध्ये सरकारने राज्यात लॉकडाऊन लावले तरी यात्रा थांबणार नाही, हवे तर सरकारने आम्हाला अटक करावी, असा इशारा त्यांनी दिला. ९० दिवस लोटूनही सरकार कायदे मागे घ्यायला तयार नाही. उलट शेतकऱ्यांची नाकाबंदी करीत आहे. खलिस्तानी व देशद्रोह्यांचे आंदोलन म्हणत बदनाम करीत आहे. ही बाजू सांगण्यासाठी ९०० किलोमीटरचा प्रवास १५ दिवस करत मार्गातील गावांमध्ये जनजागृती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला आरटीआय कार्यकर्ता मोनित जबलपुरे, निवृत्त सैनिक शेषराव मरोडिया आणि राजू मिश्रा उपस्थित होते.