शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

आॅटोचालकाचे अपहरण करून हत्या

By admin | Updated: April 18, 2017 01:44 IST

अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान एका तरुणाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात झाले.

मृतदेह विहिरीत फेकला : आठ दिवसांपासून होता बेपत्ता नागपूर : अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान एका तरुणाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात झाले. निकेश विजय साठवणे (वय २५) असे मृताचे नाव असून, नंदनवन पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली. आॅटोचालक असलेला निकेश वाठोड्यातील पवनशक्तीनगर येथे राहत होता. गेल्या ९ एप्रिलपासून बेपत्ता होता. त्याचा ठिकठिकाणी शोध घेऊनही तो आढळला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्याची आई शालू विजय साठवणे (वय ३८) यांनी नंदनवन ठाण्यात ‘मिसिंग‘ची तक्रार नोंदवली. पालक आणि पोलीस निकेशचा शोध घेत असतानाच, काही जणांनी वाठोड्यातीलच गोपाल बिसेनसोबत ९ एप्रिलच्या रात्री निकेश जातना दिसल्याचे सांगितले. ही माहिती निकेशच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितली. त्यावरून पोलिसांनी गोपाल आणि त्याची मैत्रीण जया शर्मा यांना रविवारी चौकशीसाठी ठाण्यात बोलावले. बरीच विचारपूस करूनही आरोपींनी निकेशबाबत कसलीही माहिती असल्याचा इन्कार केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना मोकळे केले. मात्र, त्यांच्या संशयास्पद हालचाली पाहून पोलिसांनी सोमवारी सकाळी गोपालला पुन्हा ठाण्यात नेले. चौकशीत त्याने निकेशच्या हत्येची कबुली दिली आणि मृतदेह वाठोड्यातील एका विहिरीत फेकल्याचे सांगितले.त्यानंतर गोपालसह पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह विहिरीबाहेर काढला. तो निकेश साठवणेचा असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या शरीरावर तीक्ष्ण शस्त्राने भोसकल्याच्या खुणा होत्या. मृतदेह रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी निकेशची शस्त्राचे घाव घालून हत्या झाल्याचा अंदाज वर्तविला. दोन महिन्यांपूर्वीच्या भांडणाचा सूड आरोपी जया शर्मा हिचे व्यक्तिमत्त्व वादग्रस्त आहे. तिचे आणि निकेशचे दोन महिन्यांपूर्वी अनैतिक संबंधाच्या कारणावरून जोरदार भांडण झाले. त्यामुळे जयाने आरोपी बिसेन आणि त्याच्या एका मित्राला निकेशची हत्या करण्यासाठी उकसवले. तिने दाखविलेल्या आमिषाला बळी पडून गोपाल आणि त्याच्या एका महाविद्यालयीन विद्यार्थी असलेल्या मित्राने ९ एप्रिलच्या रात्री १० वाजता निकेशला त्याच्या घरून बोलवून नेले. त्यानंतर त्याचे अपहरण करून हत्या करण्यात आली आणि मृतदेह विहिरीत फेकण्यात आला. हा घटनाक्रम उघड झाल्यानंतर आज रात्री नंदनवनचे पोलीस उपनिरीक्षक जी. ए. गोटके यांनी गोपाल बिसेन, जया शर्मा आणि त्यांच्या एका साथीदाराविरुद्ध दाखल केला. बिसेनला अटक करण्यात आली. जया घराला कुलूप लावून पळून गेली तर महाविद्यालयीन विद्यार्थी असलेला आरोपी दोन दिवसांपासूनच फरार आहे. पोलीस जया आणि त्याचा शोध घेत आहेत.(प्रतिनिधी)