शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

घरात मुले कंटाळली, शाळा कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:10 IST

श्याम नाडेकर लोकमत न्यूज नेटवर्क नरखेड : कोरोनाच्या संसर्गामुळे शहरासह ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा अद्याप सुरू झाल्या नाहीत. ...

श्याम नाडेकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नरखेड : कोरोनाच्या संसर्गामुळे शहरासह ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा अद्याप सुरू झाल्या नाहीत. तब्बल १८ महिन्यांपासून मुले घरातच बंदिस्त झाली आहेत. परंतु, आता मुलासह पालकही कंटाळले असून, त्यांना शाळा हवी आहे. परंतु, अजूनही कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे या शाळा कधी सुरू होणार याची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे कोरोना सुरक्षित शाळा सुरू करण्यास शासनाने प्राधान्य द्यावे, अशी मागणी आता पालकांकडून होऊ लागली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन सुविधा नसल्यामुळे ते विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत होते. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावामध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वी घेतला होता. त्यानुसार १५ जुलैपासून नरखेड तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनामुक्त गावामध्ये इयत्ता आठवी ते बारावीच्या वर्गांची दारे विद्यार्थ्यांकरिता उघडली. त्यानंतर शहरी भागातील शाळा सुरू करण्यासंदर्भातही शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर पुढे शाळा सुरू करण्यासंदर्भात कुठलीही हालचाल झाली नाही.

४७ शाळांची वाजली घंटा

राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावामधील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नरखेड तालुक्यातील ४७ शाळा उघडल्या आहेत. परंतु, नगरपरिषद क्षेत्रातील शाळा अजूनही बंदच आहेत.

सॅनिटायझेशन करा, पैसे देणार कोण?

खासगी अनुदानित शाळांना वेतनोत्तर अनुदान

मिळत नाही. कोरोनाच्या सद्य:स्थितीत शाळांमधील वर्गखोल्यांचे सॅनिटायझेशन करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने केल्या आहेत; पण त्याकरिता निधीची कोणतीही तरतूद केलेली नाही. त्यामुळे सॅनिटायझेशनचे पैसे देणार कोण, असा प्रश्न शाळा व्यवस्थापनासमोर निर्माण झाला आहे.

--

मुले घरी कंटाळली आहेत. पाल्य अभ्यास करीत नाहीत, अशी ओरड पालकांकडून होत आहे. कोरोनापासून विद्यार्थी सुरक्षित राहतील यासाठी संपूर्ण सुविधा शाळेत ठेवून वर्ग उघडले जाऊ शकतात. नियमित सॅनिटायझेशन करता येईल व एक दिवसाआड शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना अध्यापन केले जाईल. विद्यार्थी जास्त असतील तर दोन-तीन सत्रामध्ये शाळा भरविता येईल.

उन्मेष शेंबेकर, मुख्याध्यापक, नरखेड.

----

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे १८ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. कोरोना किती दिवस राहील सांगता येत नाही. पण, कोरोना सुरक्षित शाळा सुरू करण्यास प्राधान्य देण्यात यावे. आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून शाळा सुरू करता येतील. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण नियमसुद्धा पाळले जातील. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने शाळा नियमित सुरू करावी.

- हनुमंत रेवतकर

जीवनविकास विद्यालय, देवग्राम

तालुक्यातील वर्गनिहाय विद्यार्थी संख्या

इयत्ता मुले मुली एकूण

पहिली ९२५ ८०१ १७२६

दुसरी ९७३ ८६४ १८३७

तिसरी ८९० ७९७ १६८७

चौथी ९१४ ८४६ १७६०

पाचवी १०२५ ९०५ १९३०

सहावी १०१८ ९६६ १९८४

सातवी ९८० ९१३ १८९३

आठवी १०२५ ९५४ १९७९

नववी ८६८ ८६३ १७३१

दहावी ९०० ९०६ १८०६

अकरावी ९१० ८७९ १७८९

बारावी ९३० ८०६ १७३६