शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

किडनी ट्रान्सप्लांटचा मुहूर्त कधी ?

By admin | Updated: December 8, 2015 04:14 IST

गेल्या हिवाळी अधिवेशनात नागपूरच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात लवकरच मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र (किडनी

गेल्या अधिवेशनात केली होती घोषणा : आरोग्य विभागाची उदासीनतासुमेध वाघमारे ल्ल नागपूरनागपूर : गेल्या हिवाळी अधिवेशनात नागपूरच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात लवकरच मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र (किडनी ट्रान्सप्लांट सेंटर) सुरू होईल, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली होती, तर मेडिकलच्या अभ्यागत मंडळाच्या बैठकीत मंडळाचे अध्यक्ष व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी तीन दिवसांत किडनी ट्रान्सप्लांट सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र सार्वजनिक आरोग्य विभागाला देण्याची सूचना केली होती. परंतु आरोग्य विभागाच्या उदासीनतेमुळे अद्यापही हे केंद्र सुरूच झाले नाही. विशेष म्हणजे, किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत यातना सहन करीत असलेले गरीब रुग्ण आणि त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करीत असलेले नातेवाईक अडचणीत सापडले आहेत.राज्यातील हजारो रु ग्ण डायलिसिसवर जगत आहेत. यातील हजाराहून अधिक रु ग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. याला घेऊन राज्यात प्रथमच नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयांत किडनी प्रत्यारोपण केंद्र सुरू करण्याची घोषणा २०१४ च्या हिवाळी अधिवेशनात विनोद तावडे यांनी केली होती. तीन महिन्यात हे केंद्र सुरू करा, असे निर्देशही मेडिकल प्रशासनाला दिले होते. परंतु घोषणेच्या सात महिन्यानंतर ४ जुलै २०१५ रोजी झालेल्या अभ्यागत मंडळात हा विषय समोर आला. अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी किडनी प्रत्यारोपण केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमाणपत्राला घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाला धारेवर धरले. ‘मुहूर्त शोधत आहात का’, असा थेट सवाल करीत तीन दिवसांत प्रमाणपत्र देण्याची सूचना केली. परंतु आरोग्य विभागाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मंजुरी नसल्याचे कारण पुढे करीत प्रमाणपत्र राखून ठेवले. याची दखल मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे व सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी घेऊन काही दिवसांतच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आवश्यक दस्तऐवज सादर केले. परंतु तब्बल तीन महिन्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या मंडळाने मंजुरी दिल्याचे मिनिटस् मेडिकलला प्राप्त झाले. सुपर स्पेशालिटी रुग्णालय प्रशासनाने हे मिनिटस् आणि प्रत्यारोपण केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र देण्याचे पत्र आरोग्य विभागाला पाठविले. परंतु पाच दिवसांचा कालावधी होऊनही प्रमाणपत्राची प्रतीक्षाच आहे. सात टक्के रुग्ण किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेतबदलत्या जीवन शैलीमुळे मूत्रपिंड (किडनी) निकामी होण्याचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. शंभरपैकी १० जणांना मूत्रपिंडाचे आजार आहेत. त्यातील सात टक्के लोकांचे मूत्रपिंड अत्यंत खराब झालेले आहे. किडनी निकामी होण्याचे युवकांमधील प्रमाणही गेल्या दहा वर्षांत दुपटीने वाढले आहे. मूत्रपिंडाच्या विकाराच्या रुग्णासमोर डायलिसिस किंवा मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे हाच पर्याय असतो. यातील प्रभावी उपचारपद्धती प्रत्यारोपण हीच आहे. परंतु खासगी रुग्णालयातील भरमसाठ शुल्कामुळे अनेकांकडे दाते असतानाही ते या शस्त्रक्रियेपासून वंचित आहे.