शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

खोब्रागडे यांची मृत्यूशी झुंज संपली

By admin | Updated: May 24, 2014 01:07 IST

गोंदिया जिल्ह्यातील कवलेवाडा येथे पेट्रोल टाकून जिवंत पेटविलेल्या संजय खोब्रागडे यांची अखेर मृत्यूशी झुंज संपली. शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता मेडिकलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पेट्रोल टाकून जिवंत पेटविल्याचे प्रकरण : मृतदेह घेण्यास नातेवाईकांचा नकार

नागपूर/गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील कवलेवाडा येथे पेट्रोल टाकून जिवंत पेटविलेल्या संजय खोब्रागडे यांची अखेर मृत्यूशी झुंज संपली. शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता मेडिकलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. खोब्रागडे यांचा मृतदेह शवविच्छेदन गृहात आणला असता विविध आंबेडकरी संघटनांनी जोरदार नारेबाजी केली. खोब्रागडे यांचा मुलगा प्रदीप याने शवविच्छेदनाला लागणार्‍या पंचनाम्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. पोलिसांच्या कस्टडीत असलेली त्याची आई देविकाबाई निर्दोष असून तिनेच पंचनाम्यावर सही करावी, अशी मागणी त्याने आणि संघटनांनी लावून धरल्याने सायंकाळपर्यंत तणावाचे वातावरण होते. गोंदिया जिल्ह्यात गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा येथील रहिवासी खोब्रागडे यांच्यावर १६ मे रोजी मध्यरात्री पेट्रोल टाकून पेटवून दिले. शनिवारी सायंकाळी खोब्रागडे यांना अत्यवस्थ अवस्थेत मेडिकलमध्ये आणले. वॉर्ड क्रमांक १९ मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू झाले. ९४ टक्के जळालेल्या खोब्रागडेंचे पाय सोडून सर्वांग जळाले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना दुसर्‍याच दिवशी वॉर्ड क्र. ४ मध्ये हलविण्यात आले. शर्तीचे उपचार सुरू असताना आज त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह मेडिकलच्या शवविच्छेदन गृहात आणण्यात आला. यावेळी विविध आंबेडकरी सामाजिक संघटनांनी शासनाच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. त्यांच्या मते पोलीस करीत असलेला तपास चुकीचा आहे. शासनाने पोलिसांकडून हा तपास काढून सीबीआयकडे सोपवावा, तसेच शवविच्छेदनाकरिता पोलिसांच्या पंचनाम्यावर देविकाबाईच स्वाक्षरी करेल, अशी या मागणीला करीत त्यांचा मुलगा व संघटनेचे कार्यकर्ते अडून बसले होते. रात्री उशिरापर्यंत पंचनाम्यावर स्वाक्षरी झालेली नव्हती. दरम्यान, या प्रकरणाची सीबीआय किंवा विशेष पथकाकडून चौकशी करावी अशी मागणी करीत आंबेडकरी संघटनांनी ‘गोंदिया शहर बंद’चे आवाहन केले होते. यासाठी दिवसभर कार्यकर्ते गटागटांनी शहराच्या व्यापार लाईनमध्ये घोषणा देत फिरत होते. तहसील कार्यालयासमोर धरणेही देण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. खोब्रागडे यांना त्यांची पत्नी व तिच्या प्रियकराने जाळल्याचा पोलीस केवळ देखावा करीत असून यात आधी अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींना वाचविण्यासाठीच पोलिसांनी या प्रकरणाला वळण दिल्याचा आरोप आंबेडकरवादी संघटनांंनी केला. (प्रतिनिधी)