शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

पाच लाख सात हजार हेक्टरवर ‘खरीप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 11:21 IST

येणाऱ्या खरीप हंगामाचे नियोजन कृषी विभागाने केले असून, यावर्षी ५ लाख ७ हजार ६०० हेक्टवर खरीपाची पेरणी होणार आहे.

ठळक मुद्देकापसाचे क्षेत्र दोन लाखावर ९६४५३ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येणाऱ्या खरीप हंगामाचे नियोजन कृषी विभागाने केले असून, यावर्षी ५ लाख ७ हजार ६०० हेक्टवर खरीपाची पेरणी होणार आहे. यात सर्वाधिक क्षेत्र कापसाने व्यापले असून, सोयाबीनचे क्षेत्र गेल्यावर्षी इतकेच कायम आहे.खरीपाचे नियोजन करताना लागणाऱ्या बियाण्यांचेही नियोजन करण्यात आले आहे. या हंगामासाठी जिल्ह्यात ९६४५३ क्विंटल बियाणे लागणार आहे. यातील ३०१७६ क्विटंल बियाणे महाबीज व ६६२७७ क्विंटल बियाणे खासगी कंपन्यांकडून उपलब्ध होणार आहे. कापसासाठी ५०६३ क्विंटल, सोयाबीनसाठी ६३४५० क्विंटल, तूर ३१२० क्विंटल व भातासाठी २११५० क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. तसेच १,४३,४५० मेट्रिक टन खतांची आवश्यकता भासणार आहे. यात ४८७५० मेट्रिक टन युरिया, डीएपी २००५० मेट्रिक टन, एसएसपी २५,८०० मेट्रिक टन, एमओपी ७३२० मेट्रिक टन व संयुक्त खते ४१५३० मेट्रिक टन लागणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. शेतकऱ्यांनी खत आणि बियाण्यांची खरेदी परवानाधारक विक्रेत्यांकडून करावी, खरेदी करताना पावती घ्यावी व ती संग्रही ठेवावी. तसेच पेरणीच्या वेळी पाकिटातील काही बियाणेही जतन करून ठेवावे. अनाधिकृत कापूस बियाणे व इतर पिकांचे अनाधिकृत बियाणे शेतकºयांनी खरेदी करू नये, असा सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी दिला आहे. सोयाबीनची पेरणी ७५ ते १०० मिमी पर्जन्यमान झाल्यावरच करावी. सर्वच पिकांच्या बियाण्यावर जंतू संवर्धकाचा वापर करण्याचा सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी दिला. जिथे जमीन हलकी आहे, सिंचनाची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी कमी दिवसात होणारे पीक घेण्याचा सल्ला कृषी अधिकाºयांनी दिला.

टॅग्स :agricultureशेती