शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
3
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
4
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
5
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
6
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
7
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
8
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
9
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
10
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
11
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
12
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
13
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
14
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
15
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
16
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
17
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
18
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
19
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
20
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला

नागपूर विभागात १९.३५ लाख हेक्टर क्षेत्राचे खरीप नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:08 IST

नागपूर : नागपूर विभागामध्ये १९.३५ लाख हेक्टर क्षेत्राचे खरीप नियोजन यंदा करण्यात आले आहे. कृषिमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी ...

नागपूर : नागपूर विभागामध्ये १९.३५ लाख हेक्टर क्षेत्राचे खरीप नियोजन यंदा करण्यात आले आहे. कृषिमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी नागपुरात या नियोजनाचा आढावा घेतला. जनप्रतिनिधींकडून आलेल्या सूचनांनुसार खरीप नियोजनात फेरबदल करण्याच्या सूचना केल्या.

यंदाच्या खरीप हंगामासाठी बियाणे व खते उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून तालुकानिहाय नियोजन करण्यात आले असल्यामुळे, शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार खते व बियाण्यांचा पुरेसा पुरवठा केला जाईल. बफर साठ्यातून नागपूर विभागासाठी १८,९६० मेट्रिक टन युरिया संरक्षित करण्यात आला आहे. प्रक्रिया उद्योगाची साखळी निर्माण करण्यासाठी शेतकरी बचत गटांना प्रोत्साहन, तसेच प्रत्येक मोठ्या गावात शेतमाल साठवणुकीची व्यवस्था निर्माण करण्याला कृषी विभागाने प्राधान्य देण्याचे आदेश त्यांनी दिले.

कृषी विभाग यंदा उत्पादकता वर्ष म्हणून पाळणार असून, जिल्हा व तालुका स्तरावरील नियोजनात खरिप हंगामामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत उत्पादनात वाढ होणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे, असे आदेश त्यांनी दिले. यावेळी कृषिरत्न पुरस्कारप्राप्त सुनंदा सालोडकर यांचा गौरव करण्यात आला.

बैठकीला मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विकासमंत्री सुनील केदार, दूरदृश्यप्रणालीद्वारे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, खा.कृपाल तुमाने, आ.आशिष जयस्वाल, आ.दुष्यंत चतुर्वेदी, राजू पारवे, विनोद अग्रवाल, तसेच जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, प्रामुख्याने उपस्थित होते.

...

नागपूर विभागातील खरिप नियोजन

पीक - खरीप क्षेत्र - आवश्यक बियाणे

कापूस -६,३०,६०० हेक्टर - १४,९३० क्विंटल

भात - ८,३०,००० हेक्टर - १,१९,७०० क्विंटल

सोयाबिन - ३,०४,००० हेक्टर - ९८,५४५ क्विंटल

...

गडचिरोलीसाठी स्ट्रॉबेरीचा प्रस्ताव

एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीला सेंद्रिय शेतीचा जिल्हा म्हणून प्राधान्य देण्याची मागणी केली. पारंपरिक शेतीऐवजी स्ट्रॉबेरीसारखे उत्पादन घेण्याचा प्रस्ताव कृषिमंत्र्यांकडे ठेवला. सुनील केदार यांनी महाबीजतर्फे वर्धा व नागपूर जिल्ह्यात बीजनिर्मिती क्षेत्रांमध्ये वाढ करावी, शेतकऱ्यांची रिसोर्स बँक तयार करण्यावर भर दिला. विजय वडेट्टीवार यांनी करडईसारख्या पिकाची क्लस्टर पद्धतीने लागवड करून प्रोत्साहन देण्याची, तसेच भात उत्पादक शेतकऱ्यांना नवीन वाण निर्माण करण्यासह, त्यावर संशोधनाला प्रोत्साहन देण्याची सूचना केली. नितीन राऊत यांनी मनरेगामधून लहान शेतकऱ्यांसोबतच मोठ्या शेतकऱ्यांनाही सिंचनाच्या योजनांसाठी लाभ द्यावा, अशी मागणी केली.