शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

नागपूर विभागात १९.३५ लाख हेक्टर क्षेत्राचे खरीप नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:08 IST

नागपूर : नागपूर विभागामध्ये १९.३५ लाख हेक्टर क्षेत्राचे खरीप नियोजन यंदा करण्यात आले आहे. कृषिमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी ...

नागपूर : नागपूर विभागामध्ये १९.३५ लाख हेक्टर क्षेत्राचे खरीप नियोजन यंदा करण्यात आले आहे. कृषिमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी नागपुरात या नियोजनाचा आढावा घेतला. जनप्रतिनिधींकडून आलेल्या सूचनांनुसार खरीप नियोजनात फेरबदल करण्याच्या सूचना केल्या.

यंदाच्या खरीप हंगामासाठी बियाणे व खते उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून तालुकानिहाय नियोजन करण्यात आले असल्यामुळे, शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार खते व बियाण्यांचा पुरेसा पुरवठा केला जाईल. बफर साठ्यातून नागपूर विभागासाठी १८,९६० मेट्रिक टन युरिया संरक्षित करण्यात आला आहे. प्रक्रिया उद्योगाची साखळी निर्माण करण्यासाठी शेतकरी बचत गटांना प्रोत्साहन, तसेच प्रत्येक मोठ्या गावात शेतमाल साठवणुकीची व्यवस्था निर्माण करण्याला कृषी विभागाने प्राधान्य देण्याचे आदेश त्यांनी दिले.

कृषी विभाग यंदा उत्पादकता वर्ष म्हणून पाळणार असून, जिल्हा व तालुका स्तरावरील नियोजनात खरिप हंगामामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत उत्पादनात वाढ होणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे, असे आदेश त्यांनी दिले. यावेळी कृषिरत्न पुरस्कारप्राप्त सुनंदा सालोडकर यांचा गौरव करण्यात आला.

बैठकीला मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विकासमंत्री सुनील केदार, दूरदृश्यप्रणालीद्वारे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, खा.कृपाल तुमाने, आ.आशिष जयस्वाल, आ.दुष्यंत चतुर्वेदी, राजू पारवे, विनोद अग्रवाल, तसेच जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, प्रामुख्याने उपस्थित होते.

...

नागपूर विभागातील खरिप नियोजन

पीक - खरीप क्षेत्र - आवश्यक बियाणे

कापूस -६,३०,६०० हेक्टर - १४,९३० क्विंटल

भात - ८,३०,००० हेक्टर - १,१९,७०० क्विंटल

सोयाबिन - ३,०४,००० हेक्टर - ९८,५४५ क्विंटल

...

गडचिरोलीसाठी स्ट्रॉबेरीचा प्रस्ताव

एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीला सेंद्रिय शेतीचा जिल्हा म्हणून प्राधान्य देण्याची मागणी केली. पारंपरिक शेतीऐवजी स्ट्रॉबेरीसारखे उत्पादन घेण्याचा प्रस्ताव कृषिमंत्र्यांकडे ठेवला. सुनील केदार यांनी महाबीजतर्फे वर्धा व नागपूर जिल्ह्यात बीजनिर्मिती क्षेत्रांमध्ये वाढ करावी, शेतकऱ्यांची रिसोर्स बँक तयार करण्यावर भर दिला. विजय वडेट्टीवार यांनी करडईसारख्या पिकाची क्लस्टर पद्धतीने लागवड करून प्रोत्साहन देण्याची, तसेच भात उत्पादक शेतकऱ्यांना नवीन वाण निर्माण करण्यासह, त्यावर संशोधनाला प्रोत्साहन देण्याची सूचना केली. नितीन राऊत यांनी मनरेगामधून लहान शेतकऱ्यांसोबतच मोठ्या शेतकऱ्यांनाही सिंचनाच्या योजनांसाठी लाभ द्यावा, अशी मागणी केली.