शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

गुन्हेगारांवर खाकीचा दणका

By admin | Updated: January 30, 2016 03:02 IST

आक्रमक झालेल्या नागपूर पोलिसांनी गुन्हेगारांना जोरदार दणका दिला आहे.

३ दिवसात २३ गुंडांवर मकोका राजू भद्रे टोळीवरही कारवाई गुन्हेगारी विश्वाला जबर हादरा नागपूर : आक्रमक झालेल्या नागपूर पोलिसांनी गुन्हेगारांना जोरदार दणका दिला आहे. आधी संतोष आंबेकर, नंतर गोल्डी भुल्लर आणि शुक्रवारी राजू भद्रे टोळीवर पोलिसांनी मकोका लावला. अवघ्या तीन दिवसात शहरातील तीन मोठ्या गुंडांच्या टोळ्यांवर मकोकाची कारवाई झाल्यामुळे गुन्हेगारी विश्वाला जोरदार हादरा बसला आहे. राजू भद्रे तसेच त्याच्या टोळीतील आठ गुन्हेगारांवरील मकोकाची माहिती पोलीस उपायुक्त रंजन शर्मा यांनी दिली. ११ डिसेंबरला अजय राऊतचे अपहरण केल्यानंतर त्याला आणि त्याच्या परिवाराला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन १ कोटी ७५ लाखांची खंडणी गुंडांनी उकळली होती. अजय राऊतच्या मुलाचे अपहरण करण्याची धमकी दिल्यामुळे तो एवढी मोठी खंडणी दिल्यानंतरही गप्प बसला होता. मात्र, पोलिसांना वृत्तपत्रातून या प्रकरणाची माहिती कळली. त्यानंतर गुन्हेशाखेने राऊतची चौकशी सुरू केली. राऊतने दिलेल्या तक्रारीनंतर अपहरणकर्ते आणि खंडणी उकळणारांचा पोलिसांनी शोध घेतला. तेव्हा यात नितीन वाघमारे, आशिष नायडू, कार्तिक शिवरामक्रिष्णन तेवर आणि भरत ऊर्फ राहुल सुशिल दुबे हे गुंड गुन्हेशाखेच्या हाती लागले. त्यांनी या गुन्ह्याचे सूत्रधार दिवाकर कोतुलवार आणि राजू भद्रे असल्याचे सांगितले.१ कोटी ७५ लाखांची मागितली होती खंडणीनागपूर : अपहरण केल्यानंतर राऊतला मारहाण करून राजू भद्रेच्या घरामागच्या मठात नेले आणि तेथे त्याला मित्रांना फोन करायला लावून १ कोटी ७५ लाख रुपये मागवून घेतल्याचेही उघड झाले. ही पक्की माहिती उघड झाल्यामुळेच या टोळीविरुद्ध मकोकाची कारवाई करण्यात आल्याचे उपायुक्त शर्मा यांनी पत्रकारांना सांगितले. उपरोक्त चार आरोपी अटकेत आहेत. राजू भद्रे कारागृहात आहे तर दिवाकर कोतुलवार (वय ३१) त्याचा भाऊ आशिष कोतुलवार (वय २८), खुशाल ऊर्फ जल्लाद ऊर्फ पहेलवान थूल आणि नितीन मोहन पाटील हे फरार असल्याचे त्यांनी सांगितले.विधी अधिकाऱ्याचा वादग्रस्त मुद्दा मकोकाची केस लढविण्यासाठी पोलिसांनी १२ वकिलांचे पॅनल तयार केले आहे. त्यातील २ मुंबईचे तर १० नागपूरचे वकील असतील, असे शर्मा यांनी सांगितले. भद्रे टोळीने अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६० ते ७० कोटींच्या जमिनीवर काही वर्षांपूर्वी यवतमाळातील गुंडांच्या मदतीने कब्जा केला. यावेळी एका विधी अधिकाऱ्याची भूमिका भद्रे टोळीला मदत करणारी असल्याचा जोरदार आरोप झाला होता. हा प्रकार उपायुक्त शर्मा यांच्या लक्षात पत्रकारांनी आणून दिला. त्यामुळे वकिलाच्या नियुक्तीवरून वेगवेगळे प्रश्न उपस्थित झाले. उपायुक्त शर्मा यांनी विधी अधिकाऱ्यांबाबत तूर्त आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले. मात्र, हा मुद्दा पुढच्या काळात वादग्रस्त ठरू शकतो, अशी जोरदार चर्चा पत्रपरिषदेतनंतर गुन्हेशाखेत सुरू झाली. (प्रतिनिधी)