शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

खैरलांजी ते चैत्यभूमी संदेशयात्रा

By admin | Updated: June 20, 2014 00:55 IST

महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जाती अंताचा विचार घेऊन खैरलांजी ते चैत्यभूमी अशा मोटारसायकल रॅलीला बुधवारपासून खैरलांजीतून प्रारंभ झाला असून ही रॅली बुधवारी

जाती अंतासाठी सत्यशोधक जनआंदोलन : मोटारसायकल रॅलीनागपूर : महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जाती अंताचा विचार घेऊन खैरलांजी ते चैत्यभूमी अशा मोटारसायकल रॅलीला बुधवारपासून खैरलांजीतून प्रारंभ झाला असून ही रॅली बुधवारी नागपुरात पोहोचली. दीक्षाभूमीला अभिवादन करून ती अमरावतीकडे रवाना झाली. बुधवारी खैरलांजीतून सुरू झालेली ही संदेश यात्रा भंडारा, मौदा, रामटेक, कन्हान, कामठी या मार्गाने नागपुरात पोहोचली. सत्यशोधक जनआंदोलनाच्यावतीने काढण्यात आलेल्या या रॅलीचे नेतृत्व किशोर जाधव, सिद्धार्थ जगदेव, देवेंद्र इंगळे, नजूबाई गावित, ज्वाला मोरे, शैलेश सोनवणे करीत आहेत. तसेच रमेश बिजेकर, निर्भय बागडे, प्रवीण पाटील, अ‍ॅड. महेश बनसोड यांच्यासह २५० कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले आहेत. अमरावती, अकोला, नाशिक मार्गे ही रॅली मुंबईला २६ जून रोजी पोहोचणार आहे. इंदोरा चौकात झालेल्या सभेत कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. जातीनिर्मूलनासहित स्त्री-पुरुष समानता, वर्गीय विषमता नष्ट होईल तेव्हाच देश महासत्ता होईल. लिंगभेद, वर्गभेद ही दोन विषमतेची केंद्रे आहेत. जाती अंताचा लढा सांस्कृतिक लढा असून त्याविरोधात आता विद्रोह करण्याची जबाबदारी आहे. आधुनिक युगात जातीवरून अन्याय कमी होण्यापेक्षा वाढत आहेत. ही राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी चिंताजनक बाब आहे. परंतु याचा विचार होत नाही. यामुळे जातीय अत्याचार वाढत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. (प्रतिनिधी)