शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

खैरलांजी ते चैत्यभूमी संदेशयात्रा

By admin | Updated: June 20, 2014 00:55 IST

महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जाती अंताचा विचार घेऊन खैरलांजी ते चैत्यभूमी अशा मोटारसायकल रॅलीला बुधवारपासून खैरलांजीतून प्रारंभ झाला असून ही रॅली बुधवारी

जाती अंतासाठी सत्यशोधक जनआंदोलन : मोटारसायकल रॅलीनागपूर : महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जाती अंताचा विचार घेऊन खैरलांजी ते चैत्यभूमी अशा मोटारसायकल रॅलीला बुधवारपासून खैरलांजीतून प्रारंभ झाला असून ही रॅली बुधवारी नागपुरात पोहोचली. दीक्षाभूमीला अभिवादन करून ती अमरावतीकडे रवाना झाली. बुधवारी खैरलांजीतून सुरू झालेली ही संदेश यात्रा भंडारा, मौदा, रामटेक, कन्हान, कामठी या मार्गाने नागपुरात पोहोचली. सत्यशोधक जनआंदोलनाच्यावतीने काढण्यात आलेल्या या रॅलीचे नेतृत्व किशोर जाधव, सिद्धार्थ जगदेव, देवेंद्र इंगळे, नजूबाई गावित, ज्वाला मोरे, शैलेश सोनवणे करीत आहेत. तसेच रमेश बिजेकर, निर्भय बागडे, प्रवीण पाटील, अ‍ॅड. महेश बनसोड यांच्यासह २५० कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले आहेत. अमरावती, अकोला, नाशिक मार्गे ही रॅली मुंबईला २६ जून रोजी पोहोचणार आहे. इंदोरा चौकात झालेल्या सभेत कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. जातीनिर्मूलनासहित स्त्री-पुरुष समानता, वर्गीय विषमता नष्ट होईल तेव्हाच देश महासत्ता होईल. लिंगभेद, वर्गभेद ही दोन विषमतेची केंद्रे आहेत. जाती अंताचा लढा सांस्कृतिक लढा असून त्याविरोधात आता विद्रोह करण्याची जबाबदारी आहे. आधुनिक युगात जातीवरून अन्याय कमी होण्यापेक्षा वाढत आहेत. ही राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी चिंताजनक बाब आहे. परंतु याचा विचार होत नाही. यामुळे जातीय अत्याचार वाढत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. (प्रतिनिधी)