शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

‘खैरलांजी’ ची जखम अजूनही ओलीच

By admin | Updated: September 29, 2015 04:34 IST

संपूर्ण देशालाच नव्हे तर जगाला हादरवणारी घटना म्हणजे खैरलांजी हत्याकांड होय. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या

आनंद डेकाटे ल्ल नागपूरसंपूर्ण देशालाच नव्हे तर जगाला हादरवणारी घटना म्हणजे खैरलांजी हत्याकांड होय. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या हत्याकांडाच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन झाले. नागपूरपासून दिल्लीपर्यंत संताप व्यक्त करण्यात आला. जगातही त्याचे पडसाद उमटले. आज या घटनेला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु या हत्याकांडाच्या निषेधार्थ जे लढले, पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाल्ल्या ते अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन शासनाने दिले. परंतु कार्यकर्त्यांवरील खटले अजूनही सुरूच आहे. प्रत्येक शहरात असे शेकडो कार्यकर्ते असून, त्यांना न्याय केव्हा मिळणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. २९ सप्टेंबर २००६ रोजी भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी या गावातील भोतमांगे कुटुंबीयांची निर्घृण हत्या करण्यात आली. जातीय मानसिकतेतून करण्यात आलेला हा खून मानवतेला काळीमा फासणारा होता. या हत्याकांडाच्या निषेधार्थ दलित आंबेडकरी समाजाच्या संतप्त भावना उमटल्या होत्या. महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश पेटून उठला होता. नागपुरात ठिकठिकाणी तीव्र आंदोलने झाली. संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे लोन पसरले. या आंदोलनाने राष्ट्रीय रूप घेतले. इतकेच नव्हे तर जगातही त्याचे पडसाद उमटले होते. पोलिसांनी आंदोलकांना चांगलेच झोडपूनही काढले होते. इतकेच नव्हे तर आंदोलकांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील बहुतांश गुन्हे हे खोटे असून जाणीवपूर्वक लावण्यात आले होते. अनेक कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक गोवण्यात आले होते. पुढे ही बाब स्पष्ट झाली. तेव्हा तत्कालीन शासनाने खैरलांजी आंदोलनातील आंदोलकांवरील खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला. १८ आॅक्टोबर २००७ रोजी राज्याच्या गृह विभागाने तसे शासन परिपत्रकही काढले. परंतु त्यात एक अट घालण्यात आली. ती म्हणजे आंदोलनादरम्यान कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाला असेल आणि पाच लाखापेक्षा जास्त रकमेचे नुकसान झाले असेल असे प्रकरण वगळण्यात आले होते. परिणामी आजही नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात हजारो कार्यकर्त्यांवर आंदोलनादरम्यानचे खटले सुरू आहेत. आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्यावे खैरलांजीच्या आंदोलनातील घटना आठवल्या तरी अंगावर शहारे येतात. व्यक्तिस्वातंत्र्य नावाची गोष्ट या देशात आहे की नाही, असा प्रश्न पडायचा. आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांवर तत्कालीन शासनाने व पोलिसांनी सूड उगवला होता. त्यांच्याविरुद्ध जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल केले होते, याचे मूर्तिमंत उदाहरण मीच आहे. माझ्याविरुद्ध एमपीडीए लावण्यात आला. शहरातील २० पोलीस ठाण्यापैकी तब्बल १९ पोलीस ठाण्यात माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकाचवेळी मी १९ ठिकाणी कसे काय आंदोलन करू शकेल, हा प्रश्नच आहे. तरीही गुन्हा दाखल झाला. नंतर एमपीडीएसह माझ्याविरुद्धचे सर्वच गुन्हे मागे घेण्यात आले. याच प्रकारे नागपूरसह महाराष्ट्रातील बहुतांश कार्यकर्त्यांसोबत असाच प्रकार झालेला आहे. यात शंका नाही, त्यामुळे या आंदोलकांवर झालेला अन्याय सध्याच्या सरकारने दूर करावा. खैरलांजी आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्यावे. त्यात कुठलीही अट नको. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांनाही एक पत्र लिहिले आहे. - आ. डॉ. मिलिंद माने