शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
3
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
4
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
5
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
6
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
7
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
8
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
9
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
10
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
11
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
12
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
13
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
14
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
15
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
16
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
17
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
18
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
19
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
20
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स

बिनविरोध की रंगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:08 IST

जिल्ह्यातील १३० ग्रा.पं.साठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात : गावागावात राजकीय मोर्चेबांधणी नागपूर : जिल्ह्यातील १३० ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज ...

जिल्ह्यातील १३० ग्रा.पं.साठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात : गावागावात राजकीय मोर्चेबांधणी

नागपूर : जिल्ह्यातील १३० ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला बुधवारपासून सुरुवात झाली. निवडून येऊ शकणाऱ्या उमेदवाराची चाचपणी करण्यासाठी गावगाड्यात ऐन थंडीत राजकीय पारा चढला आहे. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी ग्रा.पं.ची निवडणूक बिनविरोध करा, असे आवाहन उमरेडचे आ. राजू पारवे यांनी केले आहे. मात्र ५ जानेवारीनंतरच जिल्ह्यातील किती ग्रा.पं.मध्ये निवडणूक बिनविरोध होणार, हे स्पष्ट होईल.

जिल्ह्यात निवडणूक होऊ घातलेल्या सर्वाधिक ग्रा.पं. उमरेड विधानसभा क्षेत्रातील आहेत. यात उमरेड तालुक्यातील १४, कुही तालुक्यातील २५ आणि भिवापूर तालुक्यातील ३ ग्रा.पं.चा समावेश आहे. या ४२ ही ग्रा.पं.मध्ये यापूर्वी बिनविरोधाची परंपरा नाही.

कामठी तालुक्यात नऊ ग्रा.पं.साठी निवडणूक होऊ घातली आहे. पूर्वीच्या टर्ममध्ये या सर्वच ग्रा.पं.साठी निवडणूक झाली होती. यावेळीही येथे काँग्रेस विरुद्ध भाजपा असाच सामना रंगण्याची शक्यता आहे. तालुक्यात २०१७ मध्ये गादा ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध झाली होती, हे विशेष.

सावनेर तालुक्यातील १२ ग्रा.पं.साठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. गतवेळी यात जटामखोरा ग्रा.पं.ची निवडणूक बिनविरोध झाली होती. मात्र यावेळी येथे काँग्रेस समर्थक आणि अपक्षांनी एकमेकांविरोधात दंड थोपटले आहेत.

हिंगणा तालुक्यात एकूण पाच ग्रा.पं.साठी निवडणूक होऊ घातली आहे. आधी तालुक्यातील ४८ ग्रा.पं.साठी निवडणूक झाली होती. तीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असाच सामना रंगला होता. त्यामुळे निवडणूक होऊ घातलेल्या पाच ग्रा.पं.मध्ये राजकीय समर्थक मैदानात उतरले.

जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यात एकाही ग्रा.पं.मध्ये सध्या तरी बिनविरोध निवडणूक होणार नसल्याचे चित्र आहे. सर्वच ठिकाणी महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात सामना रंगण्याची स्थिती आहे.

जामगाव (बुजुर्ग) आदर्श

नरखेड तालुक्यात २०१८ मध्ये झालेल्या ३० ग्रामपंचायत निवडणुकीत येनिकोनी ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूक पार पडली होती. तालुक्यातील जामगाव (बुजुर्ग) ग्रामपंचायतची निवडणूक स्वातंत्र्य मिळाल्यापासून बिनविरोध होत आहे. अपवाद फक्त २०१८ चा आहे. या गावात प्रत्येक पक्षाचे तालुकास्तरीय नेते आहेत. गावातील पंचायत समिती नरखेडचे माजी सभापती वसंत चांडक यांनी सांगितले की, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वोदयी विचारसरणीचे माजी आमदार स्व. जीवनलाल चांडक व काँग्रेस विचारसरणीचे पंचायत समिती माजी सभापती स्व. वसंतराव काळमेघ यांनी गावात स्थानिक राजकारणावरून वादावादी होऊ नये याकरिता सर्वांना प्रतिनिधित्व देण्याचे ठरवून, ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरविले होते. यानंतर ही परंपरा सुरू झाली. शासनाने अनेकदा बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींकरिता विशेष अनुदान जाहीर केले, परंतु जामगाव बुजुर्गला आजवर विशेष अनुदान मिळाले नाही.

---

लोकशाहीत मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र गावाच्या विकासासाठी गावकरी एकत्र येत ग्रा.पं.ची निवडणूक बिनविरोध करीत असतील तर अशा गावातील विकास कामांना गती मिळते. तिथे खऱ्या अर्थाने ग्राम अभियानाला लोकांचे पाठबळ मिळते. त्यामुळे इलेक्शनपेक्षा सामंजस्याने सिलेक्शन झाल्यास गावात विकासाचे राजकारण शक्य आहे.

- डॉ. राजेश ठाकरे, जिल्हाध्यक्ष, ग्रामविकास आघाडी, भाजपा

---------

गावाच्या विकासासाठी गावकरी एकत्र येत निवडणूक बिनविरोध करीत असतील तर ही स्वागतार्ह बाब आहे. निवडणूक म्हटली तर मनभेद आलेच. त्यामुळे ग्रा.पं.ची निवडणूक बिनविरोध झाल्यास त्या गावाच्या विकासाला गती मिळते. गावाची समाजात प्रतिष्ठा वाढते.

प्रा. अवंतिका लेकुरवाळे

कामठी विधानसभा प्रमुख, काँग्रेस, महिला आघाडी

-

प्रत्येक गावाचे राजकारण वेगळे असते. या राजकारणामुळे गावात नेहमीच दोन गटात तेढ निर्माण होत असते. अशा वेळी गावाच्या विकासासाठी गावकऱ्यांनी एकत्र येत ग्रा.पं.ची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतल्यास लोकशाहीला खऱ्या अर्थाने ताकद मिळते. गावाच्या विकासाला गती मिळते.

समीर उमप, जि.प. सदस्य (शेकाप)

-

निवडणुका जाहीर झालेल्या प्रमुख ग्रा.पं.

भोरगड, जलालखेडा, उमठा, महेंद्री, खुबाळा, खुर्सापार, टेंभूरडोह, पाटणसावंगी, कोहळी, सोनपूर (अदासा), किरणापूर, देवलापार, खेडी, माहुली, नवेगाव, निमखेडा, कोराडी, कळमना (बेला), राजोला, दवलामेटी, द्रुगधामना, सुराबर्डी.