शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

केजरीवाल आपचा देशभरात विस्तार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:09 IST

शीलेष शर्मा लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुजरातमधील यशानंतर आता गोव्यासह संपूर्ण देशात विस्तार ...

शीलेष शर्मा

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुजरातमधील यशानंतर आता गोव्यासह संपूर्ण देशात विस्तार करण्याची तयारी करत आहेत. केजरीवाल यांनी आपल्या मनातील ही बाब ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांना दिल्लीत आयोजित ‘महाराष्ट्रीयन ऑफ द ईअर’ पुरस्कार सोहळ्यादरम्यान सांगितली.

दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नांची केजरीवाल यांनी उत्तरे दिली. सरकारच्या लोकप्रियतेचे गमक काय आहे, याबाबत सांगताना ते म्हणाले की, आम्ही नेहमी सामान्य व्यक्तीच्या मुद्द्यांना प्राधान्य दिले. जनतेचे शिक्षण, आरोग्य, वीज-पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांना पूर्ण करण्यासाठी सरकारी आस्थापनांचा सदुपयोग केला. अगोदरच्या शासनकर्त्यांकडून या गोष्टींकडे दुर्लक्ष होत होते. दिल्लीच्या अर्थसंकल्पातील २५ टक्के निधी शिक्षण व १५ टक्के निधी आरोग्यावर खर्च करण्याचा निर्णय घेतला. सरकारी शाळांना खासगी शाळांहून उत्कृष्ट बनविले व प्रत्येक दिल्लीकरासाठी मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली. सरकारी शाळांच्या शिक्षकांना दर्जेदार प्रशिक्षणासाठी जगातील इतर देशांमध्ये पाठ‌विले. सोबतच त्यांनी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण द्यावे, यासाठी आयआयएम-अहमदाबादसारख्या देशातील अग्रणी व्यवस्थापन संस्थेतून प्रशिक्षण मिळण्याचीही व्यवस्था केली. जर दुसऱ्या राज्यांतील शासनांनी लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण केल्या, तर तेही दिल्ली सरकारप्रमाणे लोकप्रिय होऊ शकतात, असे केजरीवाल यांनी सांगितले.

खासदार दर्डा इथेच थांबले नाहीत व त्यांनी केजरीवाल यांच्या आयुष्यातील खासगी बाबींबाबतही विचारणा केली. केजरीवाल बॅड बॉयपासून गुड बॉय कसे झाले, अशा प्रश्न त्यांनी केला. यावर केजरीवाल यांनी हसत, मीडियानेच मला बॅड बॉय म्हणून पाहिले, असे उत्तर दिले.

यावेळी केजरीवाल यांनी ‘लोकमत’ची प्रशंसा केली. आज लोकमत महाराष्ट्राचा पर्याय झाला आहे. ज्या सामान्य व्यक्तींच्या सेवाकार्यांना लोकमत शोधतो, त्यांना त्यानंतर देशभरात ओळख मिळते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिक कुमार पांडे व राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने यांना ‘महाराष्ट्रीयन ऑफ द ईअर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खा.कुमार केतकर, श्रीनिवास पाटील, इम्तियाज जलील, सुनील मेंढे व रामदास तडस हेही उपस्थित होते.