शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

बाजारपेठा स्वयंपूर्ण बंद ठेवणे हाच कोरोना संसर्ग नियंत्रणावर ठोस उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 20:50 IST

आता कोरोनाची भीती व्यापाऱ्यांनाही सतावत असून संसर्ग होऊ नये म्हणून काही बाजारपेठा ठराविक कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय काही व्यापारी संघटनांनी घेतला आहे.

ठळक मुद्देकाही बाजारपेठा आठवड्यातून तीन दिवस बंदलॉकडाऊनसाठी चेंबरने पुढाकार घ्यावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आता कोरोनाची भीती व्यापाऱ्यांनाही सतावत असून संसर्ग होऊ नये म्हणून काही बाजारपेठा ठराविक कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय काही व्यापारी संघटनांनी घेतला आहे. त्यामुळे ग्राहक आणि व्यापारी यांचा थेट संपर्क येणार नसल्याने कोरोना संसर्ग वाढण्यावर काही प्रमाणात प्रतिबंध येईल. नागपुरात सर्वच बाजारपेठांमध्ये काही दिवस लॉकडाऊन करण्यासाठी नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सने पुढाकार घ्यावा, असे मत काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.बाजारपेठा काही दिवसांसाठी स्वयंपूर्ण बंद करण्यासाठी गांधीबाग होलसेल क्लॉथ मार्केटसह काही व्यापारी संघटनांनी नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सला पत्र लिहिले आहे. या संदर्भात चेंबर मनपा आयुक्तांशी चर्चा करणार असून त्यावर अंमलबजावणी झाल्यास नागपुरात वाढत्या संसर्गावर निश्चितच आळा बसेल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.गांधीबाग होलसेल क्लॉथ अ‍ॅण्ड यार्न मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष अजय मदान म्हणाले, मार्केटमध्ये जवळपास पाच हजार कर्मचारी काम करतात. दुकाने बंद केली तर कर्मचारी घरी बसणार नाहीत. ते बाजारात फेरफटका मारतील. त्यामुळे संसर्ग जास्त वाढण्याची शक्यता आहे. याकरिता सर्व बाजारपेठांच्या संघटनांनी स्वयंपूर्ण बाजार बंद केले तर कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल. मार्केटमध्ये मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येत आहे. याशिवाय ग्राहकांनाही मास्क घालण्यास आणि सॅनिटायझर वापरण्यास बंधनकारक केले आहे. त्यामुळे संसर्गावर काही प्रमाणात आळा येत आहे. सर्वच बाजारपेठा एकाचवेळी बंद झाल्यास आम्हीही त्यात सहभागी होऊ, असे मदान म्हणाले.इतवारी होलसेल किराणा असोसिएशनचे सचिव शिवप्रताप सिंह म्हणाले, इतवारी आणि मस्कासाथ येथील किराणा बाजारात दररोज किरकोळ व्यापारी आणि ग्राहकांची गर्दी होते. पण त्यावर प्रतिबंध घालणे कठीण आहे. ही बाब संसर्ग वाढण्यास कारणीभूत असून बाजारपेठा बंद करून त्यावर आवर घालणेही शक्य नाही. दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा झाल्यास लोकांची ओरड होईल. मुख्य म्हणजे नागपुरातील सर्वच बाजारपेठा काही दिवसांसाठी बंद केल्यास कोरोना संसर्गाची साखळी तुटण्यास निश्चितच मदत होईल.कोरोनाची साखळी तुटण्यासाठी कळमन्यात होलसेल न्यू ग्रेन मार्केट आणि फ्रूट मार्केट असोसिएशनने आठवड्यातून चार दिवस मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही बाब निश्चितच प्रशंसनीय आहे. याच धर्तीवर नागपुरातील सर्वच बाजारपेठा आठवड्यातून काही दिवस स्वयंपूर्ण बंद असाव्यात, असे मत ग्रेन मार्केटचे सचिव प्रताप मोटवानी यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार