शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
"प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
4
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
5
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
6
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
7
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
8
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
9
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
10
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
11
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
12
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
13
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
14
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
15
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
16
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
17
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ
18
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
19
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
20
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल

यंदाचाच कांदा ठेवा जपून; बियाणे दीड हजारावरून तीन हजारांवर, क्षेत्रही घटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2022 21:31 IST

Nagpur News यावर्षी जिल्ह्यात अंदाजे १०० हेक्टरमध्ये कांद्याची लागवड करण्यात आली असून, मागील वर्षीच्या तुलनेत कांद्याचे लागवड क्षेत्र घटले आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यात रब्बी कांद्याचे उत्पादनउत्पादन घटण्याची शक्यता

नागपूर : मुळात नागपूर जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन फार कमी घेतले जाते. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी त्यांच्या गरजेपुरत्या कांद्याची दरवर्षी लागवड करतात. यावर्षी जिल्ह्यात अंदाजे १०० हेक्टरमध्ये कांद्याची लागवड करण्यात आली असून, मागील वर्षीच्या तुलनेत कांद्याचे लागवड क्षेत्र घटले आहे. याला कांदा साठवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रभावी यंत्रणेचा अभाव, प्रतिकूल वातावरणामुळे घटत असलेले उत्पादन, बाजारात मिळणारा कमी भाव आणि बियाण्यांचे वाढते दर या बाबी कारणीभूत असल्याची माहिती काही कांदा उत्पादकांनी दिली.

जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी त्यांच्या कुटुंबाची गरज भागविण्यासाठी अर्धा-एक गुंठा शेतात दरवर्षी कांद्याची लागवड करतात. शिवाय, चांगले उत्पादन झाल्यास अतिरिक्त कांद्याची बाजारात विक्री करतात. एकर, दीड एकर किंवा एका हेक्टरमध्ये कांद्याची लागवड करणारे शेतकरी जिल्ह्यात बाेटावर माेजण्याइतकेच आहेत. जिल्ह्यात पांढऱ्या कांद्याला प्रथम पसंती दिली जात असल्याने शेतकरी पांढऱ्या कांद्याचीच लागवड करतात. मागील काही वर्षांत एकात्मिक फलाेत्पादन विकास अभियानांतर्गत नागपूर जिल्ह्यात १० कांदाचाळी उभारण्यात आल्या आहेत, अशी माहिती अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी दिली.

कांदा बियाणे दीड हजारावरून तीन हजारांवर

कांद्याचे बियाणे महागात खरेदी करावे लागत असल्याची माहिती काही कांदा उत्पादकांनी दिली. मागील वर्षी आपण कांद्याचे १,६०० ते १,८०० रुपये प्रतिकिलाेने खरेदी केले हाेते. यावर्षी मात्र त्याच बियाण्यांचे दर २,७०० ते २,९९५ रुपये प्रति किलाे झाल्याचे त्यांनी सांगितले. कांदा उत्पादनासाठी लागणाऱ्या इतर कृषी निविष्ठांचे दर प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे कांद्याचा उत्पादन खर्च ३५ रुपये प्रति किलाेपेक्षा अधिक असून, बाजारात मात्र तेवढा दर मिळत नाही. त्यामुळे कांद्याचे उत्पादन घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे कांदा उत्पादकांनी सांगितले.

कांदा लागवडीचे क्षेत्र घटले

नागपूर जिल्ह्यात कांद्याचे लागवड फारच कमी क्षेत्रात केली जाते. कांदा नाशिवंत असल्याने तसेच ताे व्यवस्थित साठवून ठेवण्याची प्रभावी साेय नसल्याने आपण कांद्याची माेठ्या प्रमाणात लागवड करीत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मागणी वर्षी जिल्ह्यात अंदाजे १६५ हेक्टरमध्ये कांद्याची लागवड करण्यात आली हाेती. यावर्षी हे क्षेत्र १०० हेक्टरवर आले आहे.

गतवर्षी कांदा उत्पादक, ग्राहकांना फटका

कांदा महत्त्वाचे पीक असले तरी केंद्र सरकार वेळावेळी दर नियंत्रित करण्यासाठी निर्यातबंदीसह इतर बंधने लादते. त्यामुळे कांद्याचे दर पडतात. अनेकदा कांदा विक्रीतून उत्पादनखर्च देखील भरून निघत नाही. त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे कांद्याचे लागवड क्षेत्र आणि उत्पादन कमी हाेत असून, त्याचा फटका ग्राहकांना बसताे.

व्यापारी करतात माेठी गुंतवणूक

नागपूर जिल्ह्यात महाराष्ट्रातील अकाेला व नाशिक जिल्ह्यासह गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यांमधून कांदा विक्रीसाठी येताे. या कांद्याच्या वाहतूक व साठवणुकीवर माेठा खर्च करावा लागताे. वेअरहाऊसमध्ये साठवून ठेवलेला कांदा मागणीनुसार टप्प्याटप्प्याने बाजारात विक्रीसाठी काढला जाताे. त्यासाठी माेठी गुंतवणूक करावी लागत असून, प्रसंगी त्यावरील व्याजाचा भरणा करावा लागताे. मात्र, या सर्व प्रक्रियेत व्यापाऱ्यांनाच दाेष दिला जात असून, ते मालामाल हाेत असल्याचे सांगितले जाते. वास्तव वेगळे असल्याचे काही कांदा व्यापाऱ्यांनी सांगितले.

नुकसान भरपाईबाबत आग्रही नाही

जिल्ह्यात कांद्याचे लागवड क्षेत्र नगण्य आहे. शिवाय, रब्बीचे एकमेव पीक घेतले जाते. मागील वर्षी रब्बी हंगामात कांद्याचे फारसे नुकसान झाले नाही. अवकाळी पावसामुळे कांद्याच्या पिकाचे नुकसान झाल्यास क्षेत्र कमी असल्याने नुकसानीची तीव्रता व प्रमाणही कमी असते. त्यामुळे आपण नुकसानभरपाई मिळावी, यासाठी आग्रही नसताे, असे शेतकऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यात कांद्याचे खरीप हंगामात पीक घेतले जात नसल्याने नुकसानग्रस्त पिकांच्या यादीत कांद्याचा समावेश नसताे, असे कृषी विभागातील काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.

शहरी ग्राहकांना कमी दरात कांदा व इतर भाजीपाला हवा असताे. कृषी निविष्ठा आणि वाहतुकीचे दर वाढल्याने कांद्याचा उत्पादन खर्च भरून निघेल, एवढाही दर मिळत नाही. त्यामुळे आपण कांद्याचे माेठ्या प्रमाणात पीक घेत नाही.

- विनायक वाडबुदे, शेतकरी

शेतमालाचे दर वाढल्यास महागाई वाढल्याच्या बाेंबा ठाेकल्या जातात. त्यातून केंद्र व राज्य सरकार वाढलेले दर कमी करण्यासाठी शेतमालावर विविध बंधने लादते. याला कांदाही अपवाद नाही. त्यामुळे आपण स्वत:च्या गरजेपुरते कांद्याचे उत्पादन घेताे.

- संजय वानखेडे, शेतकरी.

टॅग्स :agricultureशेती