शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

यंदाचाच कांदा ठेवा जपून; बियाणे दीड हजारावरून तीन हजारांवर, क्षेत्रही घटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2022 21:31 IST

Nagpur News यावर्षी जिल्ह्यात अंदाजे १०० हेक्टरमध्ये कांद्याची लागवड करण्यात आली असून, मागील वर्षीच्या तुलनेत कांद्याचे लागवड क्षेत्र घटले आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यात रब्बी कांद्याचे उत्पादनउत्पादन घटण्याची शक्यता

नागपूर : मुळात नागपूर जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन फार कमी घेतले जाते. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी त्यांच्या गरजेपुरत्या कांद्याची दरवर्षी लागवड करतात. यावर्षी जिल्ह्यात अंदाजे १०० हेक्टरमध्ये कांद्याची लागवड करण्यात आली असून, मागील वर्षीच्या तुलनेत कांद्याचे लागवड क्षेत्र घटले आहे. याला कांदा साठवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रभावी यंत्रणेचा अभाव, प्रतिकूल वातावरणामुळे घटत असलेले उत्पादन, बाजारात मिळणारा कमी भाव आणि बियाण्यांचे वाढते दर या बाबी कारणीभूत असल्याची माहिती काही कांदा उत्पादकांनी दिली.

जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी त्यांच्या कुटुंबाची गरज भागविण्यासाठी अर्धा-एक गुंठा शेतात दरवर्षी कांद्याची लागवड करतात. शिवाय, चांगले उत्पादन झाल्यास अतिरिक्त कांद्याची बाजारात विक्री करतात. एकर, दीड एकर किंवा एका हेक्टरमध्ये कांद्याची लागवड करणारे शेतकरी जिल्ह्यात बाेटावर माेजण्याइतकेच आहेत. जिल्ह्यात पांढऱ्या कांद्याला प्रथम पसंती दिली जात असल्याने शेतकरी पांढऱ्या कांद्याचीच लागवड करतात. मागील काही वर्षांत एकात्मिक फलाेत्पादन विकास अभियानांतर्गत नागपूर जिल्ह्यात १० कांदाचाळी उभारण्यात आल्या आहेत, अशी माहिती अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी दिली.

कांदा बियाणे दीड हजारावरून तीन हजारांवर

कांद्याचे बियाणे महागात खरेदी करावे लागत असल्याची माहिती काही कांदा उत्पादकांनी दिली. मागील वर्षी आपण कांद्याचे १,६०० ते १,८०० रुपये प्रतिकिलाेने खरेदी केले हाेते. यावर्षी मात्र त्याच बियाण्यांचे दर २,७०० ते २,९९५ रुपये प्रति किलाे झाल्याचे त्यांनी सांगितले. कांदा उत्पादनासाठी लागणाऱ्या इतर कृषी निविष्ठांचे दर प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे कांद्याचा उत्पादन खर्च ३५ रुपये प्रति किलाेपेक्षा अधिक असून, बाजारात मात्र तेवढा दर मिळत नाही. त्यामुळे कांद्याचे उत्पादन घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे कांदा उत्पादकांनी सांगितले.

कांदा लागवडीचे क्षेत्र घटले

नागपूर जिल्ह्यात कांद्याचे लागवड फारच कमी क्षेत्रात केली जाते. कांदा नाशिवंत असल्याने तसेच ताे व्यवस्थित साठवून ठेवण्याची प्रभावी साेय नसल्याने आपण कांद्याची माेठ्या प्रमाणात लागवड करीत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मागणी वर्षी जिल्ह्यात अंदाजे १६५ हेक्टरमध्ये कांद्याची लागवड करण्यात आली हाेती. यावर्षी हे क्षेत्र १०० हेक्टरवर आले आहे.

गतवर्षी कांदा उत्पादक, ग्राहकांना फटका

कांदा महत्त्वाचे पीक असले तरी केंद्र सरकार वेळावेळी दर नियंत्रित करण्यासाठी निर्यातबंदीसह इतर बंधने लादते. त्यामुळे कांद्याचे दर पडतात. अनेकदा कांदा विक्रीतून उत्पादनखर्च देखील भरून निघत नाही. त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे कांद्याचे लागवड क्षेत्र आणि उत्पादन कमी हाेत असून, त्याचा फटका ग्राहकांना बसताे.

व्यापारी करतात माेठी गुंतवणूक

नागपूर जिल्ह्यात महाराष्ट्रातील अकाेला व नाशिक जिल्ह्यासह गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यांमधून कांदा विक्रीसाठी येताे. या कांद्याच्या वाहतूक व साठवणुकीवर माेठा खर्च करावा लागताे. वेअरहाऊसमध्ये साठवून ठेवलेला कांदा मागणीनुसार टप्प्याटप्प्याने बाजारात विक्रीसाठी काढला जाताे. त्यासाठी माेठी गुंतवणूक करावी लागत असून, प्रसंगी त्यावरील व्याजाचा भरणा करावा लागताे. मात्र, या सर्व प्रक्रियेत व्यापाऱ्यांनाच दाेष दिला जात असून, ते मालामाल हाेत असल्याचे सांगितले जाते. वास्तव वेगळे असल्याचे काही कांदा व्यापाऱ्यांनी सांगितले.

नुकसान भरपाईबाबत आग्रही नाही

जिल्ह्यात कांद्याचे लागवड क्षेत्र नगण्य आहे. शिवाय, रब्बीचे एकमेव पीक घेतले जाते. मागील वर्षी रब्बी हंगामात कांद्याचे फारसे नुकसान झाले नाही. अवकाळी पावसामुळे कांद्याच्या पिकाचे नुकसान झाल्यास क्षेत्र कमी असल्याने नुकसानीची तीव्रता व प्रमाणही कमी असते. त्यामुळे आपण नुकसानभरपाई मिळावी, यासाठी आग्रही नसताे, असे शेतकऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यात कांद्याचे खरीप हंगामात पीक घेतले जात नसल्याने नुकसानग्रस्त पिकांच्या यादीत कांद्याचा समावेश नसताे, असे कृषी विभागातील काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.

शहरी ग्राहकांना कमी दरात कांदा व इतर भाजीपाला हवा असताे. कृषी निविष्ठा आणि वाहतुकीचे दर वाढल्याने कांद्याचा उत्पादन खर्च भरून निघेल, एवढाही दर मिळत नाही. त्यामुळे आपण कांद्याचे माेठ्या प्रमाणात पीक घेत नाही.

- विनायक वाडबुदे, शेतकरी

शेतमालाचे दर वाढल्यास महागाई वाढल्याच्या बाेंबा ठाेकल्या जातात. त्यातून केंद्र व राज्य सरकार वाढलेले दर कमी करण्यासाठी शेतमालावर विविध बंधने लादते. याला कांदाही अपवाद नाही. त्यामुळे आपण स्वत:च्या गरजेपुरते कांद्याचे उत्पादन घेताे.

- संजय वानखेडे, शेतकरी.

टॅग्स :agricultureशेती