शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

एकच दिवस बंद ठेवा, दुकानाची वेळ वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:09 IST

उमरेड : गत नऊ दिवसांपासून तालुक्यात एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. शिवाय बऱ्याच दिवसांपासूनही तालुक्यातील परिस्थिती आटोक्यात आली ...

उमरेड : गत नऊ दिवसांपासून तालुक्यात एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. शिवाय बऱ्याच दिवसांपासूनही तालुक्यातील परिस्थिती आटोक्यात आली आहे. दुसरीकडे कोविड सेंटर सुद्धा कंत्राटी मनुष्यबळाअभावी कुलूपबंद अवस्थेत आहे. अशावेळी आता शासन-प्रशासनाने व्यवसाय, प्रतिष्ठाने आठवड्यातून एकच दिवस बंद ठेवावे. सोबतच वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी उमरेड येथील व्यापारी वर्गातून केली जात आहे. शासनाच्या सध्याच्या वेळापत्रकामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. शिवाय बाजारपेठेचे दिवस आणि वेळ कमी करण्यात आल्याने बाजारपेठेत गर्दी उसळत आहे.

सध्या उमरेड तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीच्या निर्देशानुसार नगरपालिका स्तरावर आठवड्यातून शनिवार आणि रविवार अशी तब्बल दोन दिवस दुकाने, प्रतिष्ठाने पूर्णत: (अत्यावश्यक सेवा वगळता) बंद ठेवली जात आहेत. शिवाय सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दुकानांची, प्रतिष्ठानांची वेळ निश्चित करण्यात आली आहे.

शनिवार आणि रविवार अशी सलग दोन दिवस बाजारपेठ बंद राहत असल्याने आठवडी बाजाराच्या दिवशी सोमवारी ग्राहकांची गर्दी उसळते. मंगळवार आणि बुधवारी सुद्धा गर्दीचाच दिवस असतो. पुढील दोन दिवसांत दुकाने बंद राहणार असल्याच्या कारणावरून गुरुवार आणि शुक्रवारी सुद्धा सर्वत्र गर्दीच दिसून येते. शिवाय सायंकाळी ४ वाजताची अपुरी वेळ असल्याने दुकानात गर्दीचे प्रमाण वाढत आहे.

नागरिकांची गर्दी कमी करण्यासाठी आता आठवड्यातून केवळ एक दिवस (बुधवार) बंद ठेवण्यात यावा. तसेच सायंकाळी ४ वाजताऐवजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकानांची वेळ नव्याने निश्चित करावी, अशी मागणी अशोक मने, सुधाकर खानोरकर, अनिल गोविंदानी, दामोधर मुधंडा, रामकुमार सारडा, चंद्रशेखर अग्रवाल, गोविंद सहजरामानी, घनश्याम सारडा, संजय मुंडले, अनंता अड्याळवाले, जगदीश हरडे, किशोर बेगानी, सुरेश चिचमलकर आदींनी केली आहे. येत्या काही दिवसांत बदल करण्यात न आल्यास आंदोलन करू, असा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला आहे.

---

मास्कचा पडला विसर

उमरेड तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या शून्य येत आहे. असे असले तरी काही नागरिक नियमावलींचे उल्लंघन करीत आहेत. मास्क, ठराविक अंतर आणि सॅनिटायझर याचा वापर शक्य त्याठिकाणी केलाच पाहीजे. शिवाय गर्दी टाळली पाहीजे, असे असतानाही असंख्य नागरिक मास्कचा सुद्धा वापर करताना दिसत नाहीत. कोरोना संपला की काय, अशा आविर्भावात अनेकांना मास्कचा विसर पडला आहे.

--

दंडात्मक कारवाई करा

नियमावलींचा भंग करणाऱ्यांवर पालिकेने आतापर्यंत दंडात्मक कारवाई केलेली आहे. अलीकडे ही कारवाई बंद करण्यात आल्याचे चित्र आहे. यामुळे दंडात्मक कारवाईची मोहीम पुन्हा सुरू करावी, अशी सुज्ञ नागरिकांची मागणी आहे.

-