शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

नागपूर जिल्हा बँकेच्या पैशावर केदारांनी कमावले ६ ते ७ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 11:19 IST

कुठल्याही बँकेचा अध्यक्ष हा बँकेतील सार्वजनिक पैशांचा रखवालदार असतो, ही बाब सुनील केदार विसरले व त्यांनी नागपूर जिल्हा बँकेच्या पैशावर स्वत:ची तुंबडी भरणे सुरू केले व शेवटी बँकेला १५० कोटीच्या खड्ड्यात लोटले. 

सोपान पांढरीपांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुठल्याही बँकेचा अध्यक्ष हा बँकेतील सार्वजनिक पैशांचा रखवालदार असतो, ही बाब सुनील केदार विसरले व त्यांनी नागपूर जिल्हा बँकेच्या पैशावर स्वत:ची तुंबडी भरणे सुरू केले व शेवटी बँकेला १५० कोटीच्या खड्ड्यात लोटले. 

सरकारी कर्जरोख्यांचे व्यवहार कसे होतात?सरकारी कर्जरोखे हे कमी व्याज मिळणारे व दीर्घ मुदतीचे गुंतवणूक रोखे असतात. बँकांनी तरलता निधीची (एसएलआर) पूर्तता समजली जाते म्हणून बँका हे रोखे विकत घेत असतात. हे रोखे विकत घेण्यासाठी बँका रिझर्व्ह बँकेला पैसे देतात व रिझर्व्ह बँक त्या रोख्यांची नोंद बँकेच्या नावाने कान्स्टिट्यूअ‍ेंट सब्सिडिअरी जनरल लेजर (सीएसजीएल) या रजिस्टरमध्ये करते. हा संपूर्ण व्यवहार डीमॅट स्वरूपात असल्याने बँकेच्या अध्यक्ष वा अधिकाऱ्यांना यात पैशाची अफरातफर करता येत नाही.केदारांनी सीएसजीएल डावललेसुनील केदार यांना बँकेचा पैसा वापरून स्वत:चे खिसे भरायचे असल्याने, त्यांनी सरकारी कर्जरोखे सीएसजीएलमार्फत खरेदी न करता दलालांमार्फत खरेदी करणे सुरू केले. यात फायदा असा होता की, बँकेच्या पैशावर दलाल शेअर बाजारातून सरकारी कर्जरोखे प्रत्यक्ष स्वरूपात खरेदी करत. स्वस्तात घेतलेले हे रोखे अधिक किमतीला विकून दलाल व सुनील केदार नफा कमवत असत. अशाप्रकारे दोन ते तीनवेळा बँकेच्या पैशावर नफा कमवून झाला की मग दलाल रोखे बँकेत जमा करत असत.संपूर्ण २००१ व २००२ असे दोन वर्ष सुनील केदार नागपूर जिल्हा बँकेच्या पैशावर स्वत:ची तुंबडी भरत होते. २००१ साली बँकेला या व्यवहारात पाच कोटी नफा झाला, तर २००२ साली २० कोटी नफा झाला. यापैकी सहा ते सात कोटी केदारांच्या खिशात गेल्याचा अंदाज आहे.कर्जरोख्यांच्या या गोरखधंद्यात सुनील केदार इतके गाफील झाले होते की बँकेला रोखे मिळाले किंवा नाही, हे ते तपासूनही बघत नव्हते.सुनील केदार बीएस्सी (कृषी) व एमबीए शिकलेले आहेत. त्यांच्या याच फाजील आत्मविश्वासाचा फायदा दलालांनी रोखे बँकेला देण्यात टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे जानेवारी/फेब्रुवारी २००२ मध्ये दिलेल्या १५० कोटींचे रोखे बँकेला एप्रिल २००२ मध्येही मिळाले नव्हते व त्याबद्दल केदार पूर्णत: गाफील होते. शेवटी बँकेला १५० कोटींचे कर्जरोखे मिळालेच नाही व केदारांवर जेलयात्रा करण्याची वेळ आली. पण एवढे होऊनही केदार मात्र निर्ढावलेल्या गुन्हेगारासारखे दर विधानसभा निवडणुकीत उभे राहत आहेत व सावनेरची आमदारकी उपभोगत आहेत.

टॅग्स :MONEYपैसा