शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नागपूर जिल्हा बँकेच्या पैशावर केदारांनी कमावले ६ ते ७ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 11:19 IST

कुठल्याही बँकेचा अध्यक्ष हा बँकेतील सार्वजनिक पैशांचा रखवालदार असतो, ही बाब सुनील केदार विसरले व त्यांनी नागपूर जिल्हा बँकेच्या पैशावर स्वत:ची तुंबडी भरणे सुरू केले व शेवटी बँकेला १५० कोटीच्या खड्ड्यात लोटले. 

सोपान पांढरीपांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुठल्याही बँकेचा अध्यक्ष हा बँकेतील सार्वजनिक पैशांचा रखवालदार असतो, ही बाब सुनील केदार विसरले व त्यांनी नागपूर जिल्हा बँकेच्या पैशावर स्वत:ची तुंबडी भरणे सुरू केले व शेवटी बँकेला १५० कोटीच्या खड्ड्यात लोटले. 

सरकारी कर्जरोख्यांचे व्यवहार कसे होतात?सरकारी कर्जरोखे हे कमी व्याज मिळणारे व दीर्घ मुदतीचे गुंतवणूक रोखे असतात. बँकांनी तरलता निधीची (एसएलआर) पूर्तता समजली जाते म्हणून बँका हे रोखे विकत घेत असतात. हे रोखे विकत घेण्यासाठी बँका रिझर्व्ह बँकेला पैसे देतात व रिझर्व्ह बँक त्या रोख्यांची नोंद बँकेच्या नावाने कान्स्टिट्यूअ‍ेंट सब्सिडिअरी जनरल लेजर (सीएसजीएल) या रजिस्टरमध्ये करते. हा संपूर्ण व्यवहार डीमॅट स्वरूपात असल्याने बँकेच्या अध्यक्ष वा अधिकाऱ्यांना यात पैशाची अफरातफर करता येत नाही.केदारांनी सीएसजीएल डावललेसुनील केदार यांना बँकेचा पैसा वापरून स्वत:चे खिसे भरायचे असल्याने, त्यांनी सरकारी कर्जरोखे सीएसजीएलमार्फत खरेदी न करता दलालांमार्फत खरेदी करणे सुरू केले. यात फायदा असा होता की, बँकेच्या पैशावर दलाल शेअर बाजारातून सरकारी कर्जरोखे प्रत्यक्ष स्वरूपात खरेदी करत. स्वस्तात घेतलेले हे रोखे अधिक किमतीला विकून दलाल व सुनील केदार नफा कमवत असत. अशाप्रकारे दोन ते तीनवेळा बँकेच्या पैशावर नफा कमवून झाला की मग दलाल रोखे बँकेत जमा करत असत.संपूर्ण २००१ व २००२ असे दोन वर्ष सुनील केदार नागपूर जिल्हा बँकेच्या पैशावर स्वत:ची तुंबडी भरत होते. २००१ साली बँकेला या व्यवहारात पाच कोटी नफा झाला, तर २००२ साली २० कोटी नफा झाला. यापैकी सहा ते सात कोटी केदारांच्या खिशात गेल्याचा अंदाज आहे.कर्जरोख्यांच्या या गोरखधंद्यात सुनील केदार इतके गाफील झाले होते की बँकेला रोखे मिळाले किंवा नाही, हे ते तपासूनही बघत नव्हते.सुनील केदार बीएस्सी (कृषी) व एमबीए शिकलेले आहेत. त्यांच्या याच फाजील आत्मविश्वासाचा फायदा दलालांनी रोखे बँकेला देण्यात टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे जानेवारी/फेब्रुवारी २००२ मध्ये दिलेल्या १५० कोटींचे रोखे बँकेला एप्रिल २००२ मध्येही मिळाले नव्हते व त्याबद्दल केदार पूर्णत: गाफील होते. शेवटी बँकेला १५० कोटींचे कर्जरोखे मिळालेच नाही व केदारांवर जेलयात्रा करण्याची वेळ आली. पण एवढे होऊनही केदार मात्र निर्ढावलेल्या गुन्हेगारासारखे दर विधानसभा निवडणुकीत उभे राहत आहेत व सावनेरची आमदारकी उपभोगत आहेत.

टॅग्स :MONEYपैसा