शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
3
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
4
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
5
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
6
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
7
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
8
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
9
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
10
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
11
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
12
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
13
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
14
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
15
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
16
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
17
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
18
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
19
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
20
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ

दहावीत काव्या गुप्ता, बारावीत ओम बरीक विभागातून टाॅपर

By निशांत वानखेडे | Updated: May 13, 2023 06:21 IST

यंदाही मुलींचाच डंका वाणिज्य शाखेत महिता गुप्ता, मानव्यशास्त्र शाखेत अभिनव साेमानी प्रथम

नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) ने शुक्रवारी दहावी व बारावीचे निकाल जाहीर केले. दाेन्ही परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली. दहावी परीक्षेत काेराडी राेडवरील पाेद्दार वर्ल्ड स्कूलची काव्या गुप्ता ९९.६ टक्के गुणांसह नागपूरात टाॅपर ठरली आहे. बारावीच्या विज्ञान विभागात स्कूल ऑफ स्काॅलर, अत्रे ले-आउटचा ओमप्रकाश बरीक हा ९८.२० टक्के गुणांसह अव्वल आला आहे.

बारावीच्या परीक्षेत नागपूर क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळविले आहे. विज्ञान, वाणिज्य व मानव्यशास्त्र विषयात ९० टक्क्याच्या वर निकाल लागला. अनेक महाविद्यालयांनी शंभरीही गाठली आहे. विज्ञान शाखेत ओमप्रकाश बरीक शिवाय वाणिज्य शाखेत भवन्स, सिव्हील लाईन्सची महिता गुप्ता प्रथम आणि हर्षिता शर्माने संभाव्य द्वितीय स्थान प्राप्त केले आहे. मानव्यशास्त्र शाखेत सेंटर पाॅइंट स्कूल, वर्धमाननगरचा अभिनव साेमानी यांनी अव्वल स्थान पटकाविले आहे. श्रीकृष्णनगर भवन्स येथील कनकलता विष्णू बांबल हिने ९७.२ टक्के गुणांसह संभाव्य दुसरे स्थान प्राप्त केले आहे.

दहावीच्या परीक्षेत काव्या गुप्ता नंतर आष्टी भवन्सचा देवांश डोका हा विद्यार्थी ९९.४ टक्के गुण घेऊन संभाव्य द्वितीय स्थान मिळविले. तर सेंट पॉल शाळेचा साहील सोनी हा ९९ टक्के गुण घेऊन संभाव्य तिसरा राहिला. नारायणाची आरोही उके आणि सांदिपनीचा चक्रवर्ती हे सुद्धा ९९ टक्के गुण घेऊन संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी आहेत.

१२ वीच्या परीक्षेत ४४ हजारावर विद्यार्थ्यांनी ९५ टक्केपेक्षा अधिक गुण प्राप्त केेले. एकूण निकालाचा विचार केला तर ८७..३३ टक्के विद्यार्थ्यांनी १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण केली. परीक्षेत ८४.६७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर ९०.६८ टक्के विद्यार्थिनी यशस्वी ठरल्या. तसेच १.१२ लाख विद्यार्थ्यांनी ९० टक्के गुण प्राप्त केले. दुसरीकडे दहावीच्या परीक्षेत २१ लाख ८६ हजार ९४० विद्यार्थी सहभागी झाले होते. या परीक्षेत ९३.१२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींची टक्केवारी चांगली राहिली. ९४.२५ टक्के मुली तर ९२.७२ टक्के मुलं या परीक्षेत यशस्वी ठरले. म्हणजेच मुलांच्या तुलनेत मुली १.९८ टक्के अधिक उत्तीर्ण झाल्या.

- आचानक लागल्याने शाळांचा गोंधळ

सीबीएसई दहावी आणि बारावीच्या निकालाच्या संदर्भात गेल्या चार पाच दिवसांपासून चर्चा होतीच. पण शुक्रवारी अचानक दुपारी बारावीचा निकाल जाहीर झाला आणि त्या पाठोपाठच दहावीचाही निकाल सीबीएसईने जाहीर केला. अचानक लागलेल्या निकालामुळे टक्केवारी काढण्यात शाळांचा गोंधळ उडाला होता. विद्यार्थ्यांनाही अचानकच निकालाची माहिती मिळाल्याने ते ही आश्चर्यचकित होते. रात्री उशीरापर्यंत शाळेतील शिक्षक निकालाच्या गडबडीतच होते.