शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दहावीत काव्या गुप्ता, बारावीत ओम बरीक विभागातून टाॅपर

By निशांत वानखेडे | Updated: May 13, 2023 06:21 IST

यंदाही मुलींचाच डंका वाणिज्य शाखेत महिता गुप्ता, मानव्यशास्त्र शाखेत अभिनव साेमानी प्रथम

नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) ने शुक्रवारी दहावी व बारावीचे निकाल जाहीर केले. दाेन्ही परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली. दहावी परीक्षेत काेराडी राेडवरील पाेद्दार वर्ल्ड स्कूलची काव्या गुप्ता ९९.६ टक्के गुणांसह नागपूरात टाॅपर ठरली आहे. बारावीच्या विज्ञान विभागात स्कूल ऑफ स्काॅलर, अत्रे ले-आउटचा ओमप्रकाश बरीक हा ९८.२० टक्के गुणांसह अव्वल आला आहे.

बारावीच्या परीक्षेत नागपूर क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळविले आहे. विज्ञान, वाणिज्य व मानव्यशास्त्र विषयात ९० टक्क्याच्या वर निकाल लागला. अनेक महाविद्यालयांनी शंभरीही गाठली आहे. विज्ञान शाखेत ओमप्रकाश बरीक शिवाय वाणिज्य शाखेत भवन्स, सिव्हील लाईन्सची महिता गुप्ता प्रथम आणि हर्षिता शर्माने संभाव्य द्वितीय स्थान प्राप्त केले आहे. मानव्यशास्त्र शाखेत सेंटर पाॅइंट स्कूल, वर्धमाननगरचा अभिनव साेमानी यांनी अव्वल स्थान पटकाविले आहे. श्रीकृष्णनगर भवन्स येथील कनकलता विष्णू बांबल हिने ९७.२ टक्के गुणांसह संभाव्य दुसरे स्थान प्राप्त केले आहे.

दहावीच्या परीक्षेत काव्या गुप्ता नंतर आष्टी भवन्सचा देवांश डोका हा विद्यार्थी ९९.४ टक्के गुण घेऊन संभाव्य द्वितीय स्थान मिळविले. तर सेंट पॉल शाळेचा साहील सोनी हा ९९ टक्के गुण घेऊन संभाव्य तिसरा राहिला. नारायणाची आरोही उके आणि सांदिपनीचा चक्रवर्ती हे सुद्धा ९९ टक्के गुण घेऊन संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी आहेत.

१२ वीच्या परीक्षेत ४४ हजारावर विद्यार्थ्यांनी ९५ टक्केपेक्षा अधिक गुण प्राप्त केेले. एकूण निकालाचा विचार केला तर ८७..३३ टक्के विद्यार्थ्यांनी १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण केली. परीक्षेत ८४.६७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर ९०.६८ टक्के विद्यार्थिनी यशस्वी ठरल्या. तसेच १.१२ लाख विद्यार्थ्यांनी ९० टक्के गुण प्राप्त केले. दुसरीकडे दहावीच्या परीक्षेत २१ लाख ८६ हजार ९४० विद्यार्थी सहभागी झाले होते. या परीक्षेत ९३.१२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींची टक्केवारी चांगली राहिली. ९४.२५ टक्के मुली तर ९२.७२ टक्के मुलं या परीक्षेत यशस्वी ठरले. म्हणजेच मुलांच्या तुलनेत मुली १.९८ टक्के अधिक उत्तीर्ण झाल्या.

- आचानक लागल्याने शाळांचा गोंधळ

सीबीएसई दहावी आणि बारावीच्या निकालाच्या संदर्भात गेल्या चार पाच दिवसांपासून चर्चा होतीच. पण शुक्रवारी अचानक दुपारी बारावीचा निकाल जाहीर झाला आणि त्या पाठोपाठच दहावीचाही निकाल सीबीएसईने जाहीर केला. अचानक लागलेल्या निकालामुळे टक्केवारी काढण्यात शाळांचा गोंधळ उडाला होता. विद्यार्थ्यांनाही अचानकच निकालाची माहिती मिळाल्याने ते ही आश्चर्यचकित होते. रात्री उशीरापर्यंत शाळेतील शिक्षक निकालाच्या गडबडीतच होते.