शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

दहावीत काव्या गुप्ता, बारावीत ओम बरीक विभागातून टाॅपर

By निशांत वानखेडे | Updated: May 13, 2023 06:21 IST

यंदाही मुलींचाच डंका वाणिज्य शाखेत महिता गुप्ता, मानव्यशास्त्र शाखेत अभिनव साेमानी प्रथम

नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) ने शुक्रवारी दहावी व बारावीचे निकाल जाहीर केले. दाेन्ही परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली. दहावी परीक्षेत काेराडी राेडवरील पाेद्दार वर्ल्ड स्कूलची काव्या गुप्ता ९९.६ टक्के गुणांसह नागपूरात टाॅपर ठरली आहे. बारावीच्या विज्ञान विभागात स्कूल ऑफ स्काॅलर, अत्रे ले-आउटचा ओमप्रकाश बरीक हा ९८.२० टक्के गुणांसह अव्वल आला आहे.

बारावीच्या परीक्षेत नागपूर क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळविले आहे. विज्ञान, वाणिज्य व मानव्यशास्त्र विषयात ९० टक्क्याच्या वर निकाल लागला. अनेक महाविद्यालयांनी शंभरीही गाठली आहे. विज्ञान शाखेत ओमप्रकाश बरीक शिवाय वाणिज्य शाखेत भवन्स, सिव्हील लाईन्सची महिता गुप्ता प्रथम आणि हर्षिता शर्माने संभाव्य द्वितीय स्थान प्राप्त केले आहे. मानव्यशास्त्र शाखेत सेंटर पाॅइंट स्कूल, वर्धमाननगरचा अभिनव साेमानी यांनी अव्वल स्थान पटकाविले आहे. श्रीकृष्णनगर भवन्स येथील कनकलता विष्णू बांबल हिने ९७.२ टक्के गुणांसह संभाव्य दुसरे स्थान प्राप्त केले आहे.

दहावीच्या परीक्षेत काव्या गुप्ता नंतर आष्टी भवन्सचा देवांश डोका हा विद्यार्थी ९९.४ टक्के गुण घेऊन संभाव्य द्वितीय स्थान मिळविले. तर सेंट पॉल शाळेचा साहील सोनी हा ९९ टक्के गुण घेऊन संभाव्य तिसरा राहिला. नारायणाची आरोही उके आणि सांदिपनीचा चक्रवर्ती हे सुद्धा ९९ टक्के गुण घेऊन संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी आहेत.

१२ वीच्या परीक्षेत ४४ हजारावर विद्यार्थ्यांनी ९५ टक्केपेक्षा अधिक गुण प्राप्त केेले. एकूण निकालाचा विचार केला तर ८७..३३ टक्के विद्यार्थ्यांनी १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण केली. परीक्षेत ८४.६७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर ९०.६८ टक्के विद्यार्थिनी यशस्वी ठरल्या. तसेच १.१२ लाख विद्यार्थ्यांनी ९० टक्के गुण प्राप्त केले. दुसरीकडे दहावीच्या परीक्षेत २१ लाख ८६ हजार ९४० विद्यार्थी सहभागी झाले होते. या परीक्षेत ९३.१२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींची टक्केवारी चांगली राहिली. ९४.२५ टक्के मुली तर ९२.७२ टक्के मुलं या परीक्षेत यशस्वी ठरले. म्हणजेच मुलांच्या तुलनेत मुली १.९८ टक्के अधिक उत्तीर्ण झाल्या.

- आचानक लागल्याने शाळांचा गोंधळ

सीबीएसई दहावी आणि बारावीच्या निकालाच्या संदर्भात गेल्या चार पाच दिवसांपासून चर्चा होतीच. पण शुक्रवारी अचानक दुपारी बारावीचा निकाल जाहीर झाला आणि त्या पाठोपाठच दहावीचाही निकाल सीबीएसईने जाहीर केला. अचानक लागलेल्या निकालामुळे टक्केवारी काढण्यात शाळांचा गोंधळ उडाला होता. विद्यार्थ्यांनाही अचानकच निकालाची माहिती मिळाल्याने ते ही आश्चर्यचकित होते. रात्री उशीरापर्यंत शाळेतील शिक्षक निकालाच्या गडबडीतच होते.