शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

कौतिकराव म्हणतात, दिल्लीने तेव्हा का नकार दिला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:18 IST

प्रवीण खापरे : लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित आयोजनावरून नाशिक विरुद्ध दिल्ली ...

प्रवीण खापरे : लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित आयोजनावरून नाशिक विरुद्ध दिल्ली असा सामना रंगला आहे. मराठीच्या विकासासाठी एक पक्ष दिल्लीसाठी तर राजकीय कृतज्ञतेपोटी एक पक्ष नाशिकसाठी अडून बसला आहे. आता या सामन्यात शब्दच्छलाचाही वापर व्हायला लागला आहे. दिल्लीसाठी आग्रह धरणाऱ्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी टोला लगावला आहे. दिल्लीला दिल्लीकर नाही तर पुणेकर संमेलन मागत आहेत. ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ अशाच प्रकारची भावना ते काहीही न बोलता व्यक्त करत आहेत.

९४ व्या साहित्य संमेलनाच्या नियोजित स्थळाबाबत संवैधानिक प्रक्रिया पार न पाडता, हेकेखोरपणा दाखविला जात असल्याचा आरोप साहित्य वर्तुळातून महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्यावर लावला जात आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना पाटील यांनी आपल्याच शैलीत विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. दोन वर्षांपूर्वी दिल्लीला संमेलन देण्यात आले होते. तेव्हा दिल्लीकरांनी विधिवत पत्र पाठवून महामंडळाकडे आयोजनासंदर्भात नकार दर्शवला होता. जेव्हा दिले तेव्हा नकार दर्शवला आणि आता इतका अट्टहास का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दिल्लीत संमेलनासाठी अडून बसलेले पुण्याचे संजय नाहर हे आमचे चांगले मित्र आहेत. मात्र, दिल्लीत संमेलन मागण्यासाठी दिल्लीकडून पुढाकार नाहीच. अशा स्थितीत पुण्याच्या माणसाने हा आग्रह का धरावा, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

कौतिकराव ठाले-पाटील यांच्या एकूणच वक्तव्यावरून महामंडळ नाशिकलाच संमेलन आयोजित करण्यासाठी अडून बसल्याचे स्पष्ट होत आहे. यात राजकीय कृतज्ञता क्षणोक्षणी न बोलता व्यक्त केली जात आहे, हे विशेष.

कोरोनापासून कोण संरक्षण करणार?

भारतातून कोरोना संक्रमण कमी होत असताना दिल्लीत त्याचा प्रकोप संपता संपेना, अशी स्थिती आहे. संक्रमणाच्या काळात सर्वप्रथम दिल्लीत संमेलनासाठी परवानगी कशी मिळेल, हा प्रश्न आहे. त्यातच संमेलनात सहभागी होण्यासाठी देशभरातून विशेषत: महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने मराठी सारस्वत, साहित्य रसिक प्रवास करून येणार आहेत. ताप, खोकला, सर्दी ही लक्षणे सामान्य आहेत. तेव्हा त्यांच्या क्वारंटाईनची व सुरक्षेची खात्री दिल्ली देईल का, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

हा सगळा कट मोदी, गडकरींना खूश करण्यासाठीचा

दिल्लीचा आग्रह धरून बसणारे हे मोदी व गडकरी यांच्या जवळचे आहेत. त्यांना खूश करण्यासाठीचा हा सगळा कट असल्याचा गंभीर आरोपही कौतिकराव पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना लावला आहे. दिल्लीला विशेष संमेलन देण्याचा आमचा निर्णय आहे. मात्र, त्यास ते स्पष्ट नकार देत आहेत. यावरून नेमका प्रकार काय, हे स्पष्ट होत असल्याचेही ते म्हणाले.