शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कौतिकराव म्हणतात, दिल्लीने तेव्हा का नकार दिला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:18 IST

प्रवीण खापरे : लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित आयोजनावरून नाशिक विरुद्ध दिल्ली ...

प्रवीण खापरे : लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित आयोजनावरून नाशिक विरुद्ध दिल्ली असा सामना रंगला आहे. मराठीच्या विकासासाठी एक पक्ष दिल्लीसाठी तर राजकीय कृतज्ञतेपोटी एक पक्ष नाशिकसाठी अडून बसला आहे. आता या सामन्यात शब्दच्छलाचाही वापर व्हायला लागला आहे. दिल्लीसाठी आग्रह धरणाऱ्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी टोला लगावला आहे. दिल्लीला दिल्लीकर नाही तर पुणेकर संमेलन मागत आहेत. ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ अशाच प्रकारची भावना ते काहीही न बोलता व्यक्त करत आहेत.

९४ व्या साहित्य संमेलनाच्या नियोजित स्थळाबाबत संवैधानिक प्रक्रिया पार न पाडता, हेकेखोरपणा दाखविला जात असल्याचा आरोप साहित्य वर्तुळातून महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्यावर लावला जात आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना पाटील यांनी आपल्याच शैलीत विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. दोन वर्षांपूर्वी दिल्लीला संमेलन देण्यात आले होते. तेव्हा दिल्लीकरांनी विधिवत पत्र पाठवून महामंडळाकडे आयोजनासंदर्भात नकार दर्शवला होता. जेव्हा दिले तेव्हा नकार दर्शवला आणि आता इतका अट्टहास का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दिल्लीत संमेलनासाठी अडून बसलेले पुण्याचे संजय नाहर हे आमचे चांगले मित्र आहेत. मात्र, दिल्लीत संमेलन मागण्यासाठी दिल्लीकडून पुढाकार नाहीच. अशा स्थितीत पुण्याच्या माणसाने हा आग्रह का धरावा, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

कौतिकराव ठाले-पाटील यांच्या एकूणच वक्तव्यावरून महामंडळ नाशिकलाच संमेलन आयोजित करण्यासाठी अडून बसल्याचे स्पष्ट होत आहे. यात राजकीय कृतज्ञता क्षणोक्षणी न बोलता व्यक्त केली जात आहे, हे विशेष.

कोरोनापासून कोण संरक्षण करणार?

भारतातून कोरोना संक्रमण कमी होत असताना दिल्लीत त्याचा प्रकोप संपता संपेना, अशी स्थिती आहे. संक्रमणाच्या काळात सर्वप्रथम दिल्लीत संमेलनासाठी परवानगी कशी मिळेल, हा प्रश्न आहे. त्यातच संमेलनात सहभागी होण्यासाठी देशभरातून विशेषत: महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने मराठी सारस्वत, साहित्य रसिक प्रवास करून येणार आहेत. ताप, खोकला, सर्दी ही लक्षणे सामान्य आहेत. तेव्हा त्यांच्या क्वारंटाईनची व सुरक्षेची खात्री दिल्ली देईल का, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

हा सगळा कट मोदी, गडकरींना खूश करण्यासाठीचा

दिल्लीचा आग्रह धरून बसणारे हे मोदी व गडकरी यांच्या जवळचे आहेत. त्यांना खूश करण्यासाठीचा हा सगळा कट असल्याचा गंभीर आरोपही कौतिकराव पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना लावला आहे. दिल्लीला विशेष संमेलन देण्याचा आमचा निर्णय आहे. मात्र, त्यास ते स्पष्ट नकार देत आहेत. यावरून नेमका प्रकार काय, हे स्पष्ट होत असल्याचेही ते म्हणाले.