शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
भारत-सीरिया राजकीय संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात, भारताचा फायदा काय? समजून घ्या
4
भर रस्त्यात कारचं पार्किंग, स्टेअरिंगवर चक्क कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल...
5
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
6
पहिला श्रावण गुरुवार: ८ राशींना चौफेर लाभ, भाग्याची साथ; भरघोस भरभराट, स्वामींची अपार कृपा!
7
ज्योतिबा डोंगरावर चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा सुरू; पहा आईचे विलोभनीय रूप!
8
Kamchatka Tsunami : जगाचा छोटासा कोपरा बनला भूकंपाचा अड्डा, एका झटक्यात 'या' १२ देशांना हादरवलं! त्सुनामीचा अलर्ट जारी
9
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
10
महिलेचा कारनामा, एकाच वेळी २० युवकांना लावला चुना; प्रेमात फसवून प्रत्येकाकडून iPhone घेतले, मग...
11
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
12
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
13
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
14
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
15
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
16
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
17
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
18
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
19
ITR भरल्यानंतर आता तासाभरात परतावा! आयकर विभागाचा स्पीड पाहून नागरिक थक्क, जाणून घ्या कसं झालं शक्य?
20
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 

काश्मीर प्रश्न सोपा नाही, पण शांत होईल; हंसराज अहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 11:25 IST

काश्मीरचा प्रश्न हा सोपा नाही. हा प्रश्न सहजतेने सुटणारा नसला तरी काश्मीर शांत होईल आणि तो भारताचा अभिन्न अंग राहील, असा विश्वास देशाचे गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी येथे व्यक्त केला.

ठळक मुद्देसंजय नहार यांना राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काश्मीरचा प्रश्न हा सोपा नाही. तो जुना आजार आहे. त्यासाठी उपचारही वेगळ्या पद्धतीने करण्याची गरज आहे. काश्मीरबाबत सरकार सर्वच पातळीवर प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. एकीकडे सीझफायरही केले तर दुसरीकडे सर्जिकल स्ट्राईकही केले. हा प्रश्न सहजतेने सुटणारा नसला तरी काश्मीर शांत होईल आणि तो भारताचा अभिन्न अंग राहील, असा विश्वास देशाचे गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी येथे व्यक्त केला.सी.मो. झाडे फाऊंडेशनतर्फे चालविण्यात येणाऱ्या सत्यनारायण नुुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्रातर्फे देण्यात येणारा डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार काश्मीरी मुलांसाठी कार्य करणाऱ्या पुण्याचे संजय नहार यांच्या सरहद संस्थेला प्रदान करताना ते बोलत होते. मानपत्र, स्मृतिचिन्ह व एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी महापौर नंदा जिचकार, खा. कृपाल तुमाने, आ. बाळू धानोरकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, लोकमत दिल्ली आवृत्तीचे संपादक सुरेश भटेवरा, सर्वोदयी विचारवंत मा.म. गडकरी, रवी कालरा उपस्थित होते. यावेळी व्यसनमुक्तीसाठी कार्य करणाऱ्या मंगेश शनवारे व अभय लांजेवार यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.हंसराज अहीर म्हणाले, काश्मीरमध्ये देशभक्त नागरिकांची कमतरता नाही. परंतु काही गट आहेत. ज्यांना पाकिस्तानात प्रशिक्षण देऊन भारतात पाठवले जाते. त्यांना देशाच्या सीमेत घुसू न देता जागेवरच ठार मारणे हा उपाय आहे. सरकार ते करीत आहे. आतापर्यंत २१३ दहशतवादी मारल्या गेले. पहिली गोळी आपण चालवणार नाही, परंतु सीमेपलीकडून आली तर प्रत्युत्तरात दहा गोळ्या झाडा, असे आदेश देण्यात आले आहे. काश्मीरमध्ये सरकार स्थापन करणे हा सुद्धा एक प्रयोग म्हणूनच करण्यात आला होता. नॉर्थ ईस्टमध्येसुद्धा असाच प्रयोग केला. तेथे सरकारने निधी दिला. तेथील नक्षलवाद जवळपास संपला आहे. तेथे शांती प्रस्थापित करण्यात सरकारला यश आले. तेथील लोकांनी विकास करून घेतला आहे. परंतु काश्मीरमध्ये ते होऊ शकले नाही.नोटाबंदीमुळे नक्षलवादी व दहशतवाद्यांना होणारी फंडिंग थांबली होती. तीन महिन्यांपर्यंत त्यांच्या कारवाया बंद होत्या. त्यांना खाण्याचे लाले पडले होते. यादरम्यान हजारो दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले. परंतु तेथील दहशतवाद्यांना आता विदेशातून पैसा पुरवला जात आहे. सर्वात महत्त्वाचा त्रास ‘व्हॉट्सअ‍ॅप’ मॅसेज आहे. शुक्रवारी हा त्रास जास्तच असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.यशवंत मनोहर, महापौर नंदा जिचकार, खा. कृपाल तुमाने, आ. बाळू धानोरकर यांनीही विचार व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार विकास झाडे यांनी प्रास्ताविक केले. बाळ कुळकर्णी यांनी संचालन केले. नारायण समर्थ यांनी आभार मानले.

काश्मीर प्रश्न भावनिकतेतूनच सुटेल - सुरेश भटेवरासुरेश भटेवरा यांनी यावेळी काश्मीर प्रश्नावर सखोल विवेचन केले. काश्मीरचा प्रश्न मनातल्या सावत्र भावनेचा असून तो भावनिकतेतूनच सोडवावा लागेल, असे स्पष्ट केले.

हा देश काश्मिरींचा आहे - संजय नहारकाश्मिरी लोक हे भारताचेच आहेत. ते भारतातून कधीच जाणार नाहीत. परंतु काश्मिरींचे भारतावरील प्रेम कमी होण्याची काही कारणे आहेत. ती कारणे शोधली पाहिजेत. त्यासाठी काश्मीर आमचे आहे, असे म्हणण्याऐवजी हा देश काश्मिरींचा आहे, असे म्हणावे लागेल, असे संजय नहार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले. तसेच यावेळी पुरस्कार स्वरूप मिळालेली एक लाख रुपयाची रक्कम त्यांनी सी.मो.झाडे फाऊंडेशन या संस्थेलाच प्रदान केली.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर