शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

कारगीलमुळे देशाचा खरा अर्थ समजला

By admin | Updated: July 26, 2016 02:36 IST

उंचावर बसलेला शत्रू नेमका कुठून वार करेल याची अनिश्चितता, हवामानाचे आव्हान आणि पुढे काय होईल याची काहीच शाश्वती नाही....

रणधुमाळीत सत्याचाच विजय : प्रतिकूल परिस्थितीत जवानांनी दाखविली जिगरआज कागरिल विजय दिवसनागपूर : उंचावर बसलेला शत्रू नेमका कुठून वार करेल याची अनिश्चितता, हवामानाचे आव्हान आणि पुढे काय होईल याची काहीच शाश्वती नाही. अशा स्थितीत आमच्यासोबत होते ते घरच्यांसोबतच कोट्यवधी भारतीयांचे आशीर्वाद. त्यांच्या आशांना पूर्ण करण्याची आमच्यावर जबाबदारी होती आणि आमच्या विश्वासाला साथ मिळाली ती बलशाली अशा बोफोर्स तोफांची. ज्यावेळी टायगर हिलवर तिरंगा फडकला तेव्हा खऱ्या अर्थाने देशाचा खरा अर्थ समजला. या भावना आहेत कारगीलच्या युद्धात लढलेल्या व सध्या नागपुरात कार्यरत असलेल्या एका जिगरबाज जवानाच्या. संबंधित जवानाने नाव न छापण्याच्या अटीवरच आपल्या भावना लोकमतजवळ व्यक्त केल्या. सुरुवातीला कारगील व द्रास येथे नेमके काय होत आहे याचा अंदाजच आला नाही. ज्यावेळी खरी परिस्थिती समोर आली तेव्हा खूप उशीर झाला होता. मृत्यू गोळी किंवा बॉम्बगोळ्याच्या रूपात कुठून येईल याचा कुठलाही भरवसा नव्हता. शिवाय कडाक्याची थंडी असल्यामुळे हातपायदेखील गारठत होते. सर्वच बाबी प्रतिकूल होत्या. परंतु तरीदेखील भारतीय जवानांचे धैर्य वाखाणण्याजोगे होते. प्राण पणाला लावून सैनिक वर चढण्याचा प्रयत्न करत होते. कपडे, पाणी, अन्न यांची सुरुवातीला कमतरता जाणवली. परंतु या परिस्थितीत सैनिकांना सर्वात जास्त आधार वाटला तो तोफगोळा पथक व बोफोर्स तोफांचा. या पथकामुळे खऱ्या अर्थाने भारतीय जवानांचा विजय साकार केला. ज्या वेळी युद्धात भारताचा विजय झाला तेव्हा मनातील भावना व्यक्त होत नव्हत्या. मनाला समाधान होते देशाची सेवा केल्याचे, परंतु दु:ख होते एकाहून एक जिगरबाज जवान व अधिकारी गमाविल्याचे. आज कारगील युद्धाला वर्ष झाले. परंतु प्रत्येक क्षण मनात ताजा आहे, असे सांगत असताना जवानाच्या चेहऱ्यावर अभिमानाचे भाव होते. (प्रतिनिधी)डोळ्यातील अश्रू हिंमत द्यायचेआमच्या समोर अनेक भारतीय जवान शहीद झाले. तर अनेक जण जखमीदेखील झाले. जखमी सैनिकांना सुरक्षितस्थळी नेण्याचेदेखील मोठे आव्हान होते. परंतु हे आव्हानदेखील प्राणांची पर्वा न करता जवानांनी पार पाडले. शहीद जवानांना पाहून काही क्षणांसाठी डोळ्यात अश्रू यायचे. परंतु यामुळे शत्रूला सडेतोड उत्तर देण्याचे बळ मिळायचे, असे या शूरवीराने सांगितले.