शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

कारगीलमुळे देशाचा खरा अर्थ समजला

By admin | Updated: July 26, 2016 02:36 IST

उंचावर बसलेला शत्रू नेमका कुठून वार करेल याची अनिश्चितता, हवामानाचे आव्हान आणि पुढे काय होईल याची काहीच शाश्वती नाही....

रणधुमाळीत सत्याचाच विजय : प्रतिकूल परिस्थितीत जवानांनी दाखविली जिगरआज कागरिल विजय दिवसनागपूर : उंचावर बसलेला शत्रू नेमका कुठून वार करेल याची अनिश्चितता, हवामानाचे आव्हान आणि पुढे काय होईल याची काहीच शाश्वती नाही. अशा स्थितीत आमच्यासोबत होते ते घरच्यांसोबतच कोट्यवधी भारतीयांचे आशीर्वाद. त्यांच्या आशांना पूर्ण करण्याची आमच्यावर जबाबदारी होती आणि आमच्या विश्वासाला साथ मिळाली ती बलशाली अशा बोफोर्स तोफांची. ज्यावेळी टायगर हिलवर तिरंगा फडकला तेव्हा खऱ्या अर्थाने देशाचा खरा अर्थ समजला. या भावना आहेत कारगीलच्या युद्धात लढलेल्या व सध्या नागपुरात कार्यरत असलेल्या एका जिगरबाज जवानाच्या. संबंधित जवानाने नाव न छापण्याच्या अटीवरच आपल्या भावना लोकमतजवळ व्यक्त केल्या. सुरुवातीला कारगील व द्रास येथे नेमके काय होत आहे याचा अंदाजच आला नाही. ज्यावेळी खरी परिस्थिती समोर आली तेव्हा खूप उशीर झाला होता. मृत्यू गोळी किंवा बॉम्बगोळ्याच्या रूपात कुठून येईल याचा कुठलाही भरवसा नव्हता. शिवाय कडाक्याची थंडी असल्यामुळे हातपायदेखील गारठत होते. सर्वच बाबी प्रतिकूल होत्या. परंतु तरीदेखील भारतीय जवानांचे धैर्य वाखाणण्याजोगे होते. प्राण पणाला लावून सैनिक वर चढण्याचा प्रयत्न करत होते. कपडे, पाणी, अन्न यांची सुरुवातीला कमतरता जाणवली. परंतु या परिस्थितीत सैनिकांना सर्वात जास्त आधार वाटला तो तोफगोळा पथक व बोफोर्स तोफांचा. या पथकामुळे खऱ्या अर्थाने भारतीय जवानांचा विजय साकार केला. ज्या वेळी युद्धात भारताचा विजय झाला तेव्हा मनातील भावना व्यक्त होत नव्हत्या. मनाला समाधान होते देशाची सेवा केल्याचे, परंतु दु:ख होते एकाहून एक जिगरबाज जवान व अधिकारी गमाविल्याचे. आज कारगील युद्धाला वर्ष झाले. परंतु प्रत्येक क्षण मनात ताजा आहे, असे सांगत असताना जवानाच्या चेहऱ्यावर अभिमानाचे भाव होते. (प्रतिनिधी)डोळ्यातील अश्रू हिंमत द्यायचेआमच्या समोर अनेक भारतीय जवान शहीद झाले. तर अनेक जण जखमीदेखील झाले. जखमी सैनिकांना सुरक्षितस्थळी नेण्याचेदेखील मोठे आव्हान होते. परंतु हे आव्हानदेखील प्राणांची पर्वा न करता जवानांनी पार पाडले. शहीद जवानांना पाहून काही क्षणांसाठी डोळ्यात अश्रू यायचे. परंतु यामुळे शत्रूला सडेतोड उत्तर देण्याचे बळ मिळायचे, असे या शूरवीराने सांगितले.