शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

कारगीलमुळे देशाचा खरा अर्थ समजला

By admin | Updated: July 26, 2016 02:36 IST

उंचावर बसलेला शत्रू नेमका कुठून वार करेल याची अनिश्चितता, हवामानाचे आव्हान आणि पुढे काय होईल याची काहीच शाश्वती नाही....

रणधुमाळीत सत्याचाच विजय : प्रतिकूल परिस्थितीत जवानांनी दाखविली जिगरआज कागरिल विजय दिवसनागपूर : उंचावर बसलेला शत्रू नेमका कुठून वार करेल याची अनिश्चितता, हवामानाचे आव्हान आणि पुढे काय होईल याची काहीच शाश्वती नाही. अशा स्थितीत आमच्यासोबत होते ते घरच्यांसोबतच कोट्यवधी भारतीयांचे आशीर्वाद. त्यांच्या आशांना पूर्ण करण्याची आमच्यावर जबाबदारी होती आणि आमच्या विश्वासाला साथ मिळाली ती बलशाली अशा बोफोर्स तोफांची. ज्यावेळी टायगर हिलवर तिरंगा फडकला तेव्हा खऱ्या अर्थाने देशाचा खरा अर्थ समजला. या भावना आहेत कारगीलच्या युद्धात लढलेल्या व सध्या नागपुरात कार्यरत असलेल्या एका जिगरबाज जवानाच्या. संबंधित जवानाने नाव न छापण्याच्या अटीवरच आपल्या भावना लोकमतजवळ व्यक्त केल्या. सुरुवातीला कारगील व द्रास येथे नेमके काय होत आहे याचा अंदाजच आला नाही. ज्यावेळी खरी परिस्थिती समोर आली तेव्हा खूप उशीर झाला होता. मृत्यू गोळी किंवा बॉम्बगोळ्याच्या रूपात कुठून येईल याचा कुठलाही भरवसा नव्हता. शिवाय कडाक्याची थंडी असल्यामुळे हातपायदेखील गारठत होते. सर्वच बाबी प्रतिकूल होत्या. परंतु तरीदेखील भारतीय जवानांचे धैर्य वाखाणण्याजोगे होते. प्राण पणाला लावून सैनिक वर चढण्याचा प्रयत्न करत होते. कपडे, पाणी, अन्न यांची सुरुवातीला कमतरता जाणवली. परंतु या परिस्थितीत सैनिकांना सर्वात जास्त आधार वाटला तो तोफगोळा पथक व बोफोर्स तोफांचा. या पथकामुळे खऱ्या अर्थाने भारतीय जवानांचा विजय साकार केला. ज्या वेळी युद्धात भारताचा विजय झाला तेव्हा मनातील भावना व्यक्त होत नव्हत्या. मनाला समाधान होते देशाची सेवा केल्याचे, परंतु दु:ख होते एकाहून एक जिगरबाज जवान व अधिकारी गमाविल्याचे. आज कारगील युद्धाला वर्ष झाले. परंतु प्रत्येक क्षण मनात ताजा आहे, असे सांगत असताना जवानाच्या चेहऱ्यावर अभिमानाचे भाव होते. (प्रतिनिधी)डोळ्यातील अश्रू हिंमत द्यायचेआमच्या समोर अनेक भारतीय जवान शहीद झाले. तर अनेक जण जखमीदेखील झाले. जखमी सैनिकांना सुरक्षितस्थळी नेण्याचेदेखील मोठे आव्हान होते. परंतु हे आव्हानदेखील प्राणांची पर्वा न करता जवानांनी पार पाडले. शहीद जवानांना पाहून काही क्षणांसाठी डोळ्यात अश्रू यायचे. परंतु यामुळे शत्रूला सडेतोड उत्तर देण्याचे बळ मिळायचे, असे या शूरवीराने सांगितले.