शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

काेराेनाने हिरावले कुणाचे बाबा तर कुणाची आई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:07 IST

वेदना कोरोनाच्या नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेक कुटुंबे उद‌्ध्वस्त केली आहेत. या लाटेत तरुणांचेही जीव गेले आहेत. जिल्ह्याच्या ...

वेदना कोरोनाच्या

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेक कुटुंबे उद‌्ध्वस्त केली आहेत. या लाटेत तरुणांचेही जीव गेले आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत २२५०च्या वर मृत्यू झाले आहेत. कोरोनाने जिल्ह्यातील ४७० बालकांच्या भविष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या बालकांचे कोरोनामुळे आई अथवा वडील गेले आहेत; तर ६ बालकांच्या नशीबी अनाथपण आले. त्यांचे आई आणि वडील दोघेही देवाघरी गेले.

घरातील कर्ता पुरुष, स्त्री यांचा मृत्यू कोरोनाने झाला. जीव गमावलेल्यांपैकी अनेकांची मुले १८ वर्षांखालील आहेत. आई-वडिलांपैकी कुणी एक असेल तर त्यांना थोडाफार आधार तरी आहे; पण ज्या बालकांनी आई-वडील दोघेही गमावले, त्यांचे संगोपन व संरक्षणाचा प्रश्न आहे. बालकांच्या या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने सु-मोटो याचिका दाखल करून घेतली. न्यायालयाने सरकारला काही निर्देश दिले. न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने जिल्हास्तरावर कृती दल स्थापन करण्याचे निर्देश दिले. यात जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त व ग्रामीणचे अधीक्षक, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव, जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचा समावेश केला. जिल्हाधिकारी या कृती दलाचे अध्यक्ष असून, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी हे समन्वयक आहेत. प्रत्येक सदस्याला त्याचे कर्तव्य व जबाबदाऱ्या दिल्या आहेत.

- कृती दल काय करणार

१) ज्या मुलांचे दोन्ही पालक कोरोनाने हिरावले, अशा बालकांना बालगृहात ठेवले जाणार.

२) मुलांच्या संगोपनासह शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी शासनाकडून उचलली जाणार.

३) बालगृहात ठेवलेल्या मुलांच्या आरोग्याची नियमित तपासणी केली जाणार.

४) मुलांची जबाबदारी बाल संरक्षण विभागातील कर्मचाऱ्यांवर सोपविली जाणार.

५) या बालकांचे आर्थिक व मालमत्ताविषयक हक्क अबाधित राहतील याची दक्षता घेतली जाणार.

- जिल्ह्यात निराधार झालेले बालके

आईला गमावलेले - ८७

वडिलांना गमावलेले - ३८३

दोघांनाही गमावलेले - ६