शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनाने पुन्हा वाढविली प्लास्टिक कचऱ्याची डाेकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:06 IST

मेहा शर्मा नागपूर : महाराष्ट्र शासनाने एप्रिल २०१८ पासून प्लास्टिकवर निर्बंध लादले व त्यानुसार सुरू झालेल्या कारवाईने प्लास्टिकवर नियंत्रण ...

मेहा शर्मा

नागपूर : महाराष्ट्र शासनाने एप्रिल २०१८ पासून प्लास्टिकवर निर्बंध लादले व त्यानुसार सुरू झालेल्या कारवाईने प्लास्टिकवर नियंत्रण आले हाेते. मात्र मार्च २०२० पासून काेराेनाचा प्रकाेप वाढला तसे प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येने पुन्हा एकदा डाेके वर काढले आहे. त्यामुळे पुन्हा प्लास्टिक विराेधात कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. जगभरात ‘प्लास्टिक मुक्त जुलै’ ही माेहीम सुरू झाली आहे. त्यानुसार नागपूर महापालिकेनेसुद्धा या चळवळीचा भाग हाेण्याचा निर्धार केला आहे व येत्या दाेन-तीन दिवसात शहरात तशी माेहीम राबविली जात आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) २०१९ च्या सर्वेक्षणानुसार काेराेना काळात प्लास्टिकचा वापर वाढला आहे. नागपूर शहरात दरराेज दरराेज ४५.९६ टन प्लास्टिकचा कचरा निर्माण हाेताे. शहरातील एकूण घनकचऱ्यामध्ये प्लास्टिकचा ७ टक्के वाटा आहे. तसे सर्वाधिक प्लास्टिक कचरा निघणाऱ्या मुंबईच्या तुलनेत नागपूर शहर खाली आहे पण तेही काही कमी नाही. शहरातून दरराेज १००० ते १२०० टन घन कचरा बाहेर पडताे. शहरात प्रतिव्यक्ती दरवर्षी ५३ किलाे प्लास्टिकचा वापर करताे. याचा अर्थ दरवर्षी ३०० दशलक्ष टन प्लास्टिक कचरा निर्माण हाेताे. पर्यावरणवादी काैस्तुभ चटर्जी म्हणाले, प्लास्टिकवर लावलेले निर्बंध कागदावर आहेत. काेराेनापूर्व काळात प्रशासनाने प्लास्टिकवर निर्बंधासाठी केलेल्या प्रयत्नांचे परिणामही दिसत हाेते पण काेराेना नंतर सिंगल युज्ड प्लास्टिक वापराचे प्रमाण पुन्हा वाढले. प्रशासनातर्फे मधामधात प्लास्टिक विक्रेता व साठवण गाेदामामध्ये धाड टाकून कारवाई केली जाते पण खरी गरज प्लास्टिक उत्पादकांवर कारवाई करण्याची आहे तरच प्लास्टिक कचरा थांबविणे शक्य हाेईल. जाेपर्यंत सिंगल युज्ड प्लास्टिकचे उत्पादन हाेत राहील, ताेपर्यंत बाजारात त्याचा वापर सुरुच राहील, असे स्पष्ट मत चटर्जी यांनी व्यक्त केले. नागपूर किंवा काेणत्याही शहरात नाल्या व पाईपलाईन चाेक हाेण्यासाठी प्लास्टिकचा कचरा कारणीभूत ठरताे. नुकत्याच झालेल्या पावसानंतर ही स्थिती दिसूनही आली आहे.

दीड दाेन वर्षापासून सामना करीत असलेल्या काेराेना काळात मास्क आणि ग्लाेव्हजचा वापर प्रचंड वाढला आहे. या दाेन्हीमध्ये प्लास्टिकचे अंश असतात, ज्यांचे विघटन सहजासहजी हाेत नाही. मास्क व ग्लाेव्हज जैविक कचऱ्याचा भाग असले तरी दुर्दैवाने मनपातर्फे गाेळा हाेणाऱ्या घनकचऱ्यातच ताे जमा केला जाताे आणि भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये त्याचा भार वाढला आहे. या काळात महापालिकेची प्लास्टिकविराेधी माेहीम शिथिल पडली. मनपाचे अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे म्हणाले, काेराेनापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळ व न्युसेन्स कन्ट्राेल विभाग (एनसीडी) च्या सहकार्याने प्लास्टिकविराेधी कारवाई चालली हाेती मात्र काेराेनाचा परिणाम या कारवाईवर झाला. मात्र आम्ही पुन्हा एकदा ही माेहीम सुरू करणार असल्याचे निपाणे यांनी स्पष्ट केले.

प्लास्टिक मुक्त जुलै ही वैश्विक चळवळ आहे आणि लक्षावधी लाेक या माेहिमेचा भाग झाले आहेत. प्लास्टिक प्रदूषणापासून रस्ते, समुद्र मुक्त करायची आहेत, ज्यामुळे चांगला समाज निर्माण हाेईल. या माेहिमेद्वारे घरी, शाळेत व प्रत्येक ठिकाणी प्लास्टिक वापर बंद करण्याच्या कल्पनांना चालना मिळेल.