शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणे अशक्य? चंद्रकांत पाटील म्हणाले...
2
Maratha Reservation: सर्वपक्षीय बैठक, अधिवेशन बोलावून २४ तासांत निर्णय घ्या- सुप्रिया सुळे
3
कुणबी नोंदीचे पुरावे शिंदे समितीला देणार, मराठा आरक्षण अभ्यासकांसोबत जरांगेंची दीड तास चर्चा
4
विशेष लेख: शिंक्याचे तुटले आणि (कोरियन) बोक्याचे फावले!
5
Maratha Morcha : मराठा आरक्षणाबाबत हालचालिंना वेग, मुख्यमंत्र्यांनी रात्रीच बोलावली बैठक; राधाकृष्ण विखे पाटील यांचीही उपस्थिती
6
रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू
7
Maratha Morcha : फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले...
8
Maratha Morcha : “गोंधळ घालणाऱ्यांना सरकारने पाठवले होते का?, सरकार दंगल ...”, सुप्रिया सुळेंना घेराव घालणाऱ्यांबाबत मनोज जरांगेंचं मोठं विधान
9
मोठी दुर्घटना! धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलनामुळे १९ कामगार अडकले
10
धावत्या ट्रॅव्हल्समध्ये जळून एकाचा मृत्यू; प्रवाशाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याचा संशय
11
राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..."
12
ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो स्थानिक लोक रस्त्यावर उतरले; नेमके काय घडले?
13
टाकळगावचे लढवय्या विजयकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आई, पत्नी अन् मुलांनी फोडला हंबरडा
14
Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?
15
चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले
16
अभिनेत्री प्रिया मराठे काळाच्या पडद्याआड, अंत्यदर्शनावेळी मराठी कलाकारांना अश्रू अनावर
17
राहुल गांधींच्या 'मतदार हक्क यात्रेत' वापरलेली बाईक गायब, मालक चिंतेत; बुलेटही लॉक अवस्थेत सापडली
18
Maratha Reservation : 'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येईल हे शरद पवारांनी जाहीर करावं'; राधाकृष्ण विखे- पाटलांनी स्पष्टच सांगितलं
19
Supriya Sule: मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला
20
बरे होण्यासाठी आलेल्या रुग्णांच्याच जीवाशी खेळ; सरकारी रुग्णालयातील जेवणात अळ्या, सोंडे

काेराेनाने पुन्हा वाढविली प्लास्टिक कचऱ्याची डाेकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:06 IST

मेहा शर्मा नागपूर : महाराष्ट्र शासनाने एप्रिल २०१८ पासून प्लास्टिकवर निर्बंध लादले व त्यानुसार सुरू झालेल्या कारवाईने प्लास्टिकवर नियंत्रण ...

मेहा शर्मा

नागपूर : महाराष्ट्र शासनाने एप्रिल २०१८ पासून प्लास्टिकवर निर्बंध लादले व त्यानुसार सुरू झालेल्या कारवाईने प्लास्टिकवर नियंत्रण आले हाेते. मात्र मार्च २०२० पासून काेराेनाचा प्रकाेप वाढला तसे प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येने पुन्हा एकदा डाेके वर काढले आहे. त्यामुळे पुन्हा प्लास्टिक विराेधात कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. जगभरात ‘प्लास्टिक मुक्त जुलै’ ही माेहीम सुरू झाली आहे. त्यानुसार नागपूर महापालिकेनेसुद्धा या चळवळीचा भाग हाेण्याचा निर्धार केला आहे व येत्या दाेन-तीन दिवसात शहरात तशी माेहीम राबविली जात आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) २०१९ च्या सर्वेक्षणानुसार काेराेना काळात प्लास्टिकचा वापर वाढला आहे. नागपूर शहरात दरराेज दरराेज ४५.९६ टन प्लास्टिकचा कचरा निर्माण हाेताे. शहरातील एकूण घनकचऱ्यामध्ये प्लास्टिकचा ७ टक्के वाटा आहे. तसे सर्वाधिक प्लास्टिक कचरा निघणाऱ्या मुंबईच्या तुलनेत नागपूर शहर खाली आहे पण तेही काही कमी नाही. शहरातून दरराेज १००० ते १२०० टन घन कचरा बाहेर पडताे. शहरात प्रतिव्यक्ती दरवर्षी ५३ किलाे प्लास्टिकचा वापर करताे. याचा अर्थ दरवर्षी ३०० दशलक्ष टन प्लास्टिक कचरा निर्माण हाेताे. पर्यावरणवादी काैस्तुभ चटर्जी म्हणाले, प्लास्टिकवर लावलेले निर्बंध कागदावर आहेत. काेराेनापूर्व काळात प्रशासनाने प्लास्टिकवर निर्बंधासाठी केलेल्या प्रयत्नांचे परिणामही दिसत हाेते पण काेराेना नंतर सिंगल युज्ड प्लास्टिक वापराचे प्रमाण पुन्हा वाढले. प्रशासनातर्फे मधामधात प्लास्टिक विक्रेता व साठवण गाेदामामध्ये धाड टाकून कारवाई केली जाते पण खरी गरज प्लास्टिक उत्पादकांवर कारवाई करण्याची आहे तरच प्लास्टिक कचरा थांबविणे शक्य हाेईल. जाेपर्यंत सिंगल युज्ड प्लास्टिकचे उत्पादन हाेत राहील, ताेपर्यंत बाजारात त्याचा वापर सुरुच राहील, असे स्पष्ट मत चटर्जी यांनी व्यक्त केले. नागपूर किंवा काेणत्याही शहरात नाल्या व पाईपलाईन चाेक हाेण्यासाठी प्लास्टिकचा कचरा कारणीभूत ठरताे. नुकत्याच झालेल्या पावसानंतर ही स्थिती दिसूनही आली आहे.

दीड दाेन वर्षापासून सामना करीत असलेल्या काेराेना काळात मास्क आणि ग्लाेव्हजचा वापर प्रचंड वाढला आहे. या दाेन्हीमध्ये प्लास्टिकचे अंश असतात, ज्यांचे विघटन सहजासहजी हाेत नाही. मास्क व ग्लाेव्हज जैविक कचऱ्याचा भाग असले तरी दुर्दैवाने मनपातर्फे गाेळा हाेणाऱ्या घनकचऱ्यातच ताे जमा केला जाताे आणि भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये त्याचा भार वाढला आहे. या काळात महापालिकेची प्लास्टिकविराेधी माेहीम शिथिल पडली. मनपाचे अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे म्हणाले, काेराेनापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळ व न्युसेन्स कन्ट्राेल विभाग (एनसीडी) च्या सहकार्याने प्लास्टिकविराेधी कारवाई चालली हाेती मात्र काेराेनाचा परिणाम या कारवाईवर झाला. मात्र आम्ही पुन्हा एकदा ही माेहीम सुरू करणार असल्याचे निपाणे यांनी स्पष्ट केले.

प्लास्टिक मुक्त जुलै ही वैश्विक चळवळ आहे आणि लक्षावधी लाेक या माेहिमेचा भाग झाले आहेत. प्लास्टिक प्रदूषणापासून रस्ते, समुद्र मुक्त करायची आहेत, ज्यामुळे चांगला समाज निर्माण हाेईल. या माेहिमेद्वारे घरी, शाळेत व प्रत्येक ठिकाणी प्लास्टिक वापर बंद करण्याच्या कल्पनांना चालना मिळेल.