शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विभागात कपाशीचे क्षेत्र वाढणार!

By admin | Updated: June 17, 2016 03:01 IST

मागील काही वर्षांपासून नागपूर विभागातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाने चांगलाच दगा दिला आहे. सोयाबीनची उत्पादकता कमालीची घटली आहे.

सोयाबीनचे क्षेत्र घटणार : ६ लाख १५ हजार हेक्टरचे लक्ष्यांक नागपूर : मागील काही वर्षांपासून नागपूर विभागातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाने चांगलाच दगा दिला आहे. सोयाबीनची उत्पादकता कमालीची घटली आहे. त्यामुळे या पिकाचे लागवड क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. २०१५-१६ मध्ये सोयाबीनचे लागवड क्षेत्र ३ लाख ६० हजार हेक्टर निश्चित करण्यात आले होते. परंतु त्यातुलनेत केवळ ३ लाख ७ हजार २०० हेक्टरवरच लागवड झाली होती. त्याचवेळी ५ लाख ७९ हजार ५४० हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. यंदा पुन्हा सोयाबीनच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर दुसरीकडे कपाशीचे क्षेत्र ६ लाख १५ हजार ५०० हेक्टरपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावर्षी महाबीजने सोयाबीनसह सर्वच बियाण्यांच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. शिवाय त्याचवेळी केंद्र सरकारने बीटी बियाण्यांच्या किमती मात्र कमी केल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत ८५० रुपये प्रति पाकीट (४५० ग्रॅम बीटी + १२० ग्रॅम नॉन बीटी) भावाने मिळणारे बियाणे यंदा शेतकऱ्यांना ८३० रुपये प्रति पाकीट दराने उपलब्ध होत आहे. याचाही कपाशीचे लागवड क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. त्यानुसार कृषी विभागाने अगोदरच बियाणे उत्पादक कंपन्यांकडे २६ लाख ८६ हजार ९०० पाकीट बियाण्यांची मागणी केली आहे. यात १३ हजार ५०० बीजी -१, २६ लाख ७३ हजार १५० बीजी -२ आणि २५० नॉन बीटी पाकिटांचा समावेश आहे. कपाशीच्या या लागवड क्षेत्राचा जिल्हानिहाय विचार करता, नागपूर जिल्ह्यात २ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्राचे लक्ष्यांक निश्चित करण्यात आले आहे. मागील वर्षी जिल्ह्यात १ लाख ९६ हजार ९७० हेक्टरवर लागवड झाली होती. याशिवाय वर्धा जिल्ह्यात २ लाख २७ हजार हेक्टर, चंद्रपूर १ लाख ५५ हजार हेक्टर व गडचिरोली जिल्ह्यात ८ हजार ५०० हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)‘नॉन बीटी’ लावण्याचे आवाहन शेतकऱ्यांना दरवर्षी बियाणे खरेदी करताना ४५० ग्रॅम बीटी बियाण्यांसोबत १२० ग्रॅमचे रेफ्युज (नॉन बीटी) बियाणे दिल्या जाते. कृषी तज्ज्ञांच्या मते, शेतात बीटी बियाण्यांसोबत या नॉन बीटीची लागवड करणेसुद्धा आवश्यक असते. कारण नॉन बीटी कपाशीच्या पिकाचे किडीपासून संरक्षण करते. मात्र शेतकरी याकडे दुर्लक्ष करतो. नॉन बीटी बियाण्यांची लागवड न करता ते फेकून देतो. बऱ्याच शेतकऱ्यांचा असा समज आहे की, नॉन बीटी लावल्यामुळे त्यांचे लागवड क्षेत्र कमी होऊन उत्पादन घटते. मात्र तो चुकीचा समज आहे. नॉन बीटीमुळे उत्पादन कमी होत नसून, उलट उत्पादन वाढीस मदत होते. त्यामुळे खरीप हंगामात सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी बीटी बियाण्यांसह नॉन बीटीचीसुद्धा लागवड करावी, असे आवाहन विभागीय गुण नियंत्रण अधिकारी गावंडे यांनी केले आहे.