शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आझाद मैदानावर आंदोलन करावे, इतर कुठेही बसू नये; मुंबई पोलिसांचे आंदोलकांना आवाहन
3
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
4
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
5
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
6
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
7
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!
8
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
9
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
12
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
14
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?
15
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
16
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
17
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
18
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
19
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
20
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार

कन्हानमध्ये दोन गटात गोळीबार

By admin | Updated: March 26, 2015 02:39 IST

खंडणी वसुलीच्या वादातून दोन गटात गोळीबार झाल्याची घटना कन्हान शहरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली.

कन्हान : खंडणी वसुलीच्या वादातून दोन गटात गोळीबार झाल्याची घटना कन्हान शहरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. रेतीघाटावर खंडणी वसुलीचा वाद उफाळल्याने दोन गटात हाणामारी झाली. या घटनेनंतर दोन्ही गटात देशीकट्ट्याने गोळीबार व जोरदार हाणामारी झाली.कन्हानलगत असलेल्या सिहोरा रेतीघाटावर मंगळवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास कमलेश मेश्राम गटाचे पाच-सहा व्यक्ती शस्त्रांसह पोहोचले व तेथील रॉयल्टी वसुलीच्या झोपडीत असलेला फैजाम इजहार अहमद (३५, रा. गुजरीबाजार, कामठी) यांना धमकी दिली. चारचाकी वाहनाने आलेल्या सर्व आरोपींनी तेथील उभ्या ट्रकचे लाईट व काचा फोडल्या, तसेच ट्रकचालकाला काठीने मारहाण केली. याबाबत फिर्यादी फैजाम अहमद यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी कमलेश व इतर पाच जणांविरुद्ध भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३२४, ४२७ नुसार गुन्हा नोंदविला आहे.दरम्यान, हे सर्व आरोपी रेतीघाटावरून कन्हान शहरातील विवेकानंदनगर येथील योगेश यादव यांच्या घरी गेले. योगेश यादव व कमलेश मेश्राम या दोघांमध्ये आपसी वाद असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, शहरातील नारायणा शाळेलगत रात्री १०.३० ते १२.३० वाजताच्या सुमारास दोन्ही गटामध्ये तणाव निर्माण झाल्याने धारदार शस्त्रे व देशीकट्ट्याचा वापर झाल्याचे समजते. गोळीबाराच्या आवाजाने परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणात योगेश यादव (२३) याच्या तक्रारीनुसार तो रेती सप्लायरचा व्यवसाय करीत असून कमलेशने त्याला खंडणीची मागणी केली होती. ती नाकारल्याने कमलेश व त्याच्या साथीदारांनी योगेश व त्यांच्या वडिलांच्या घरात शिरून तोडफोड केली. तसेच धारदार शस्त्राने मारहाण केली व देशीकट्ट्याने गोळीबार करून त्याच्या कुटुंबीयांना जखमी केले. याबाबत कन्हान पोलिसांनी कमलेश मेश्राम, उमेश यादव, विक्की यादव, नीलेश यादव, आकाश मेहतो, मनोज रॉच, मुकेश शर्मा, मोनू मनपिया, ताज, आकाश चांभारे, दादा मुळे यांच्याविरुद्ध भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ४२७ व आरडब्ल्यू ३/२५ अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.या घटनेनंतर योगेश यादव गटाने कमेलश मेश्राम याच्या चिकन सेंटर व घरावर हल्ला केल्याचे वृत्त आहे. कमलेशचा भाऊ नीलेश हरीचंद मेश्राम (३०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मंगळवारी रात्री ११.३० वाजता योगेशने आपल्या साथीदारांसह त्यांच्या घराचे दार तोडून आत प्रवेश केला. घरातील नीलेश व त्याचा भाऊ अकलेश, आई बारुबाई यांना धारदार शस्त्राने मारहाण करुन जखमी केले. तसेच कमेलशवर गोळीबार केला. यात पोलिसांनी योगेश यादव, राजा यादव, विपीन गोंडाने, गोलू यादव, राहुल व अन्य दोघांविरुद्ध भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ४५२, ४२७, ३२४, ३०७ नुसार गुन्ह्यांची नोंद केली.या घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी शहरात अतिशिघ्र कृती पोलीस दल तैनात केले. दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमित काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी कंत्तेवार यांनी भेट दिली. या प्रकरणात पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केली नसून ठाणेदार सुभाष माकोडे तपास करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)घटनेची पुनरावृत्तीकन्हान परिसरातील खदान भागात १७ नोव्हेंबर २०११ ला शीतलसिंह ऊर्फ मिठू याच्यावर गोळीबार झाला होता. त्यानंतर मागील वर्षी दिवाळीच्या दिवशी त्याची निर्घृण हत्या झाली. तसेच कन्हान येथील मोनिष रेड्डीवरही एकदा तारसा चौकात तर दुसऱ्यांदा ८ एप्रिल २०१३ ला एका जीममध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. त्यानंतर २४ जानेवारी २०१४ ला त्याच्या राहत्या घरी त्याची हत्या करण्यात आली. कन्हान व खदान भागात अशा घटनांची पुनरावृत्ती होत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रसाठा असून या भागात ‘सर्च आॅपरेशन’ सुरू करण्याची मागणी आहे. मात्र पोलीस विभागाच्या दुर्लक्षामुळे या भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून शहरात गॅगवारसारख्या घटना घडत आहेत.