शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

कणखर ‘रॅम्बो’ नियतीपुढे हरला

By admin | Updated: October 23, 2016 02:35 IST

‘रॅम्बो’ हे त्याचे केवळ नावच नव्हते, तर तो त्याचा गुण झाला होता. आयुष्याच्या अखेरपर्यंत तो आपल्या नावाला जागला.

अपघातात जखमी झालेल्या उंटाचा मृत्यू : पोलिसांत तक्रार, गुन्हा दाखलनागपूर : ‘रॅम्बो’ हे त्याचे केवळ नावच नव्हते, तर तो त्याचा गुण झाला होता. आयुष्याच्या अखेरपर्यंत तो आपल्या नावाला जागला. प्राणांतिक जखमा असतानादेखील आठवडाभर त्याने मृत्यूशी झुंज दिली. मात्र अखेर नियतीसमोर त्याला शरण जावेच लागले. ही कणखर कहाणी कुठल्या हॉलिवूडपटातील हिरोची नसून नागपुरातील ‘रॅम्बो’ नावाच्या एका उंटाच्या जिद्दीची आहे. एका बेजबाबदार वाहनचालकाच्या वेगाच्या झिंगेने त्याचा बळी गेला. मागील रविवारी अमरावती मार्गावर नागपूरपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर एक उंट जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती प्राण्यांच्या उत्थानासाठी कार्यरत असणाऱ्या स्मिता मिरे यांना मिळाली. त्या तातडीने डॉ. पाटील या वैद्यकीय तज्ज्ञांसोबत तेथे पोहोचल्या. उंटाला चालण्यात अडचण येत होती व त्याचा मालक हताशपणे बसून होता. संबंधित उंट नागपुरातील एका ‘रिसॉर्ट’वर भाड्याने लावला होता असे त्याने सांगितले. ‘रिसॉर्ट’चालकांना याची माहिती कळल्यावर त्यांनी उंटावर उपचार सुरू केले. मात्र तेथे फार सोयी नसल्यामुळे मिरे यांनी उंटाला नागपुरातील पशुवैद्यकीय इस्पितळात आणले. उंटाला गाडीच्या मदतीने आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु ‘रॅम्बो’ त्याला तयारच नव्हता. जखमी असतानादेखील तो चालत इस्पितळापर्यंत आला. उंटाची सखोल तपासणी झाल्यावर इस्पितळातील वैद्यकीय तज्ज्ञांनी आश्चर्यच व्यक्त केले. ‘रॅम्बो’चा जबडा तुटला होता. त्याचा पाय ‘फ्रॅक्चर’ होता व त्याच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाला होता. अशा स्थितीत उंट जिवंतच कसा राहिला, असा प्रश्न त्यांना पडला. वैद्यकीय तज्ज्ञांनी त्याला वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र रक्तस्राव जास्त प्रमाणात झाल्यामुळे शनिवारी रात्री त्याने अखेरचा श्वास घेतला. (प्रतिनिधी) पोलिसांत तक्रार, आरोपीला अभय नकोदरम्यान, ‘रॅम्बो’चा मालक असलेल्या तरुणाचे घर या उंटावरच चालत होते. डोळ्यासमोर उंटाचा झालेला अपघात आणि नंतर झालेला मृत्यू यामुळे तो हताश झाला आहे. शनिवारी वाडी पोलीस ठाण्यात संबंधित वाहनचालकाविरोधात तक्रार करण्यात आली व पोलिसांनी कलम २७९, ४२९, १९६, १३४, १७७ अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वाहनाच्या क्रमांकावरुन त्याचा शोध सुरू आहे. संबंधित वाहनचालक नागपूर जिल्ह्यातीलच एका गावाचा सरपंच असून तो राजकीय दबाव आणत आहे. मात्र त्याच्या चुकीमुळे एका उंटाचा जीव गेला असून त्याच्यावर कठोर कारवाई व्हायलाच हवी, असे मत स्मिता मिरे यांनी व्यक्त केले.