शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
4
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
5
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
6
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
7
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
8
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
9
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
10
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
11
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
12
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
13
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
14
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
15
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
16
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
17
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
18
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
19
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
20
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...

कळमना रिंग रोड बनला ‘अपघातप्रवण स्थळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ऑटोमोटिव्ह चौकाकडून कळमन्याकडे जाणाऱ्या बायपास रिंग रोडवरील एकता कॉलनी चौक अपघातप्रवण स्थळ बनले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ऑटोमोटिव्ह चौकाकडून कळमन्याकडे जाणाऱ्या बायपास रिंग रोडवरील एकता कॉलनी चौक अपघातप्रवण स्थळ बनले आहे. या चौकात अपघाताची संख्या प्रचंड वाढली आहे. त्याच शृंखलेत रविवारी रात्री जवळपास ११.३० वाजताच्या सुमारास या चौकात एका ट्रकच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अशा जीवघेण्या अपघाताने नागरिकांमध्ये भयाचे वातावरण पसरले आहे. मात्र, प्रशासन मूग गिळून बसल्याच्या अवस्थेत आहे. समस्यांचे निवारण करण्याच्या दृष्टिकोनातून कुठलेही पाऊल उचलले जात नसून, रहदारी विभागही ही बाब गांभीर्याने घेत नसल्याचे स्पष्ट होत आहे. गरज असतानाही या चौकात ट्रॅफिक पोलीस कधीच तैनात नसल्याचे दिसते. थोड्याच अंतरावरील ऑटोमोटिव्ह चौकात पोलीस चालान वसूल करण्यात व्यस्त असतात, हे विशेष.

एकता कॉलनी, यादवनगर ते पिवळी नदी क्षेत्राला जोडणाऱ्या रिंग रोडचे सिमेंटीकरण झाले आहे. परंतु, चौकात अद्याप ट्रॅफिक सिग्नल उभारण्यात आलेले नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना येथून वहिवाट करताना संकटाचा सामना करावा लागतो. या रस्त्यावरून सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत अवजड वाहनांचा राबता असतो. विशेषत: हायवेकडे निघणाऱ्या ट्रकांची गर्दी मोठी असते. सिग्नल नसल्याने ट्रक वेगाने या चौकातून निघतात. याच कारणाने येथे अपघाताची संख्या वाढली आहे.

वडिलांचा मृत्यू, मुलगा गंभीर

यशोधरानगर ठाण्यातील नोंदीनुसार, रविवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास रिंगरोडच्या या चौकात अपघात झाला. आसीनगर निवासी मो. अनिस अन्सारी (६०) आणि मो. अकील अन्सारी (२०) हे दोघेही पिता-पुत्र दुचाकीने घराकडे जात होते. तेवढ्यात वीटभट्टी चौकाकडून येणाऱ्या ट्रक क्रमांक आर.जे. ४२, जी.ए. १८८८ ने त्यांना जबर धडक दिली. या घटनेने परिसरात खळबळ माजली. मेयो इस्पितळात उपचारादरम्यान अनिस अन्सारी यांचा मृत्यू झाला तर गंभीर अवस्थेतील मुलगा अकील अन्सारीवर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. यशोधरानगर पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात कलम ३०४ (ए), ३३८, १३४, १७७ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनीही घटनास्थळावर पूर्वी अनेक अपघात झाल्याचे सांगितले.

विरुद्ध दिशेने शिरतात ट्रक

रिंग रोडवर म्हाडा क्वॉर्टरला लागून एका शृंखलेत ट्रक उभे केले जातात. या दिशेने जाण्यासाठी ट्रकचालक विरुद्ध दिशेने ट्रक आणतात. त्यामुळे अपघाताचा प्रसंग ओढवला जातो. रात्रीच्या वेळी मनमानी पद्धतीने ट्रक उभे केले जातात. अंधारात ट्रक दिसत नसल्याने बऱ्याचदा योग्य दिशेने जाणारी वाहने धडकतात. परंतु, या घटनांना रोखण्याचे उपाय योजले जात नाहीत. याच तऱ्हेने पंतप्रधान गृह योजना म्हाडा क्वॉर्टरसाठी रस्त्यावरच टिनचे शेड उभारण्यात आले आहे. यामुळेही दोन्ही बाजूंनी जाणाऱ्या वाहनांना रिंग रोडकडे दोन्ही दिशेने येणारी वाहने दिसत नाहीत. यामुळेही अपघात वाढले आहेत.

.........