शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कळमना रिंग रोड बनला ‘अपघातप्रवण स्थळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ऑटोमोटिव्ह चौकाकडून कळमन्याकडे जाणाऱ्या बायपास रिंग रोडवरील एकता कॉलनी चौक अपघातप्रवण स्थळ बनले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ऑटोमोटिव्ह चौकाकडून कळमन्याकडे जाणाऱ्या बायपास रिंग रोडवरील एकता कॉलनी चौक अपघातप्रवण स्थळ बनले आहे. या चौकात अपघाताची संख्या प्रचंड वाढली आहे. त्याच शृंखलेत रविवारी रात्री जवळपास ११.३० वाजताच्या सुमारास या चौकात एका ट्रकच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अशा जीवघेण्या अपघाताने नागरिकांमध्ये भयाचे वातावरण पसरले आहे. मात्र, प्रशासन मूग गिळून बसल्याच्या अवस्थेत आहे. समस्यांचे निवारण करण्याच्या दृष्टिकोनातून कुठलेही पाऊल उचलले जात नसून, रहदारी विभागही ही बाब गांभीर्याने घेत नसल्याचे स्पष्ट होत आहे. गरज असतानाही या चौकात ट्रॅफिक पोलीस कधीच तैनात नसल्याचे दिसते. थोड्याच अंतरावरील ऑटोमोटिव्ह चौकात पोलीस चालान वसूल करण्यात व्यस्त असतात, हे विशेष.

एकता कॉलनी, यादवनगर ते पिवळी नदी क्षेत्राला जोडणाऱ्या रिंग रोडचे सिमेंटीकरण झाले आहे. परंतु, चौकात अद्याप ट्रॅफिक सिग्नल उभारण्यात आलेले नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना येथून वहिवाट करताना संकटाचा सामना करावा लागतो. या रस्त्यावरून सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत अवजड वाहनांचा राबता असतो. विशेषत: हायवेकडे निघणाऱ्या ट्रकांची गर्दी मोठी असते. सिग्नल नसल्याने ट्रक वेगाने या चौकातून निघतात. याच कारणाने येथे अपघाताची संख्या वाढली आहे.

वडिलांचा मृत्यू, मुलगा गंभीर

यशोधरानगर ठाण्यातील नोंदीनुसार, रविवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास रिंगरोडच्या या चौकात अपघात झाला. आसीनगर निवासी मो. अनिस अन्सारी (६०) आणि मो. अकील अन्सारी (२०) हे दोघेही पिता-पुत्र दुचाकीने घराकडे जात होते. तेवढ्यात वीटभट्टी चौकाकडून येणाऱ्या ट्रक क्रमांक आर.जे. ४२, जी.ए. १८८८ ने त्यांना जबर धडक दिली. या घटनेने परिसरात खळबळ माजली. मेयो इस्पितळात उपचारादरम्यान अनिस अन्सारी यांचा मृत्यू झाला तर गंभीर अवस्थेतील मुलगा अकील अन्सारीवर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. यशोधरानगर पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात कलम ३०४ (ए), ३३८, १३४, १७७ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनीही घटनास्थळावर पूर्वी अनेक अपघात झाल्याचे सांगितले.

विरुद्ध दिशेने शिरतात ट्रक

रिंग रोडवर म्हाडा क्वॉर्टरला लागून एका शृंखलेत ट्रक उभे केले जातात. या दिशेने जाण्यासाठी ट्रकचालक विरुद्ध दिशेने ट्रक आणतात. त्यामुळे अपघाताचा प्रसंग ओढवला जातो. रात्रीच्या वेळी मनमानी पद्धतीने ट्रक उभे केले जातात. अंधारात ट्रक दिसत नसल्याने बऱ्याचदा योग्य दिशेने जाणारी वाहने धडकतात. परंतु, या घटनांना रोखण्याचे उपाय योजले जात नाहीत. याच तऱ्हेने पंतप्रधान गृह योजना म्हाडा क्वॉर्टरसाठी रस्त्यावरच टिनचे शेड उभारण्यात आले आहे. यामुळेही दोन्ही बाजूंनी जाणाऱ्या वाहनांना रिंग रोडकडे दोन्ही दिशेने येणारी वाहने दिसत नाहीत. यामुळेही अपघात वाढले आहेत.

.........