शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
6
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
7
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
8
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
9
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
10
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
11
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
12
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
13
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
14
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
15
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
16
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
17
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
18
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
19
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
20
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...

नायब तहसीलदारांना अखेर न्याय

By admin | Updated: July 4, 2014 01:07 IST

१६ नायब तहसीलदारांना तहसीलदार संवर्गात पदोन्नती देण्यात यावी या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष करीत असलेल्या नायब तहसीलदारांना शासनाने अखेर न्याय दिला असून संघटनेने दोन

पदोन्नतीचा प्रश्न सुटला : संप मागेनागपूर : १६ नायब तहसीलदारांना तहसीलदार संवर्गात पदोन्नती देण्यात यावी या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष करीत असलेल्या नायब तहसीलदारांना शासनाने अखेर न्याय दिला असून संघटनेने दोन दिवसांपासून सुरू असलेला संप मागे घेतला आहे.तांत्रिक त्रुटींमुळे १६ नायब तहसीलदार पदोन्नतीपासून वंचित होते. त्यासाठी नायब तहसीलदार-तहसीलदार संघटना गेल्या दोन वर्षांपासून आंदोलन करीत होती. विभागीय आयुक्तांपासून तर संबंधित खात्यांच्या मंत्र्यांपर्यत संघटनेने या मागणीचा पाठपुरावा केला. मात्र त्यांना न्याय मिळाला नाही. या दरम्यान वेळोवेळी आंदोलनेही करण्यात आली. प्रत्येकवेळी फक्त आश्वासने देऊन त्यांची बोळवण केली जात होती. अखेरचा उपाय म्हणून नायब तहसीलदार-तहसीलदार संघटनेने १ जुलैपासून कामबंद आंदोलन सुरू केले. पूर्व विदर्भातील तहसीलदार, नायब तहसीलदार यात सहभागी झाले. त्यामुळे कामकाजावर अंशत: परिणामही झाला होता. दोन दिवसांनंतर गुरुवारी या आंदोलनाची दखल विभागीय आयुक्तांनी घेतली. सकाळी १० वाजता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी चर्चेसाठी निमंत्रित केले.मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून नायब तहसीलदारांच्या पदोन्नतीबाबत तत्काळ निर्णय घेण्याचे आश्वासन विभागीय आयुक्तांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर संप मागे घेण्यात आला. नागपूर विभागातील सर्व नायब तहसीलदार आणि तहसीलदारांनी नियमितपणे कामकाजात सहभागी होण्याचे,आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले. विभागीय आयुक्तांशी चर्चा करण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष दिलीप फुलसुंगे, मनोहर पोटे, मोहन टिकले, भास्कर बांबोळे आणि गजानन निशानकर आदींचा समावेश होता. संपावर तोडगा काढल्याबद्दल संघटनेने शासनाचे आभार मानले आहे. (प्रतिनिधी)